Breaking News

Ramprahar Team

विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

सावरकर चौक-अमरधाम रस्त्याचे काँक्रीटीकरण पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या प्रभागात असलेल्या सावरकर चौक ते अमरधाम रस्त्याच्या काँक्रीटीकरणा संदर्भात महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. पनवेल शहरातील महत्वाच्या असलेल्या रस्त्यापैकी प्रमुख रस्ता म्हणजे अमरधाम ते सावरकर चौक हा …

Read More »

चाय से किटली गरम

निवडणुकीत राबराब राबणार्‍या कार्यकर्त्यांनी एखादे वेळी स्तुतीसुमनांची उधळण करताना मर्यादा ओलांडली तर त्यावर कठोर कारवाई करणे नेत्यांना देखील अवघड होते. काही दिवसांपूर्वी कुण्या एका कार्यकर्त्याने लिहिलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरील ग्रंथाबाबत असाच वाद उद्भवला. वास्तविक अशी पुस्तके आणि अन्य स्तुतीपर साहित्यसामग्री सदासर्वकाळ प्रसिद्ध होत असते. त्याकडे दुर्लक्ष करणे हा उत्तम …

Read More »

बहुजन क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करा -उदय काठे

रेवदंडा : प्रतिनिधी बहुजन क्रांती मोर्चातर्फे 8 जानेवारी रोजी अलिबागमध्ये मोर्चा काढला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणी  पंचायत समिती सदस्य व रायगड जिल्हा भाजप चिटणीस उदय काठे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल …

Read More »

अलिबागमध्ये अभिनव अभिवाचन स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधी अभिवाचन आनंद आणि आभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पीएनपी नाट्यगृहात एकल व सांघिक अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वयाच्या 13 वर्षापासून ते अगदी 65 वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांच्या अभिवाचनामुळे अलिबागकरांना  अभिवाचन मेजवानीचा आस्वाद घेता आला. या अभिवाचन स्पर्धेची संकल्पना श्रद्धा पोखरणकर यांची होती. अलिबाग तालुका तसेच पुणे …

Read More »

नेरळ रेल्वे फाटकातील रस्त्यामधील लोखंडी सळया बाहेर

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्टेशनच्या कर्जत बाजूकडे असलेल्या फाटकामधील  डांबरी रस्त्यामधून लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. त्या सळया फाटकातून रूळ ओलांडणार्‍या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या चाकात घुसत असून त्या गाड्यांचे टायर निकामी ठरत असल्याचे सातत्याने घडत आहे. नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेने याबाबत सातत्याने आवाज उठवूनदेखील त्या …

Read More »

वाहनधारकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन अलिबाग : जिमाका पेण येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व रायगड जिल्हा पोलीसदल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात बुधवारी (दि. 15) 31वा रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाहन चालविताना होणार्‍या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन धारकांनी नियमांचे …

Read More »

कर्जतमध्ये नॅपकीन, डायपरचे विघटन करण्यासाठी मशिन

कर्जत : प्रतिनिधी येथील नगर परिषदेने सॅनिटरी नॅपकीन व डायपरचे विघटन करण्यासाठी मशिन बसवली आहे. संपूर्ण कोकणात फक्त कर्जत नगर परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पाच कोटींचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे. त्यातील पहिले अडीच कोटी रुपयांचे अनुदान घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि …

Read More »

पालीत रस्ता सुरक्षा अभियान

विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून केली जनजागृती पाली : प्रतिनिधी पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि पाली पोलीस ठाणे, श्री बल्लाळेश्वर देवस्थान, शालोम मोटार ट्रेनिंग स्कूल आणि शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालय यांच्या सौजन्याने मंगळवारी (दि. 14) पालीमध्ये रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पाली पोलीस ठाण्याच्या …

Read More »

वंजारपाडा-देवपाडा मार्गाची दुरवस्था

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील पोशिर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वंजारपाडा-देवपाडा-वारे या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर वाहतूक करणे त्रासदायक झाले आहे. पोशिर परिसरातील ग्रामस्थांना बाजारहाट करण्यासाठी नेरळला जावे लागते. त्यांना नेरळपर्यंत पायी प्रवास करणे शक्य नसल्याने ते  टमटम किंवा रिक्षाचा वापर करतात, मात्र वंजारपाडा- देवपाडा-वारे या रस्त्याचा काही भाग इतका …

Read More »

1984चा गौरवशाली शेतकरी लढा

उरण परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी 16 जानेवारी 1984 रोजी राज्य सरकारविरोधात जोरदार लढा द्यावा लागला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी एकरी जमिनीला 40 हजार रुपये भाव देण्यास नकार दिलाच, उलट सक्तीचे धोरण अवलंबून शेतकर्‍यांच्या जमिनी अल्प किमतीत संपादन करण्यास सुरुवात केली. सरकारच्या सक्तीच्या धोरणाविरोधात शेतकर्‍यांमध्ये तीव्र …

Read More »