Breaking News

Ramprahar Team

लग्नजल्लोषात हवेत गोळीबार; नवरदेवाच्या वडिलांचा मृत्यू

उजैन : वृत्तसंस्था उत्तर भारतात काही लग्न सोहळ्यांमध्ये हवेत गोळीबार करून आनंद व्यक्त केला जातो. सेलिब्रेशनसाठी केल्या जाणार्‍या या गोळीबारामध्ये काही वेळा निष्पाप व्यक्तीचा मृत्यू सु्द्धा होतो. उत्तर भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आता मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये लग्नसोहळ्यात सेलिब्रेशन म्हणून केलेल्या गोळीबारात नवरदेवाच्याच वडिलांचा मृत्यू झाला. उज्जैनपासून 30 किलोमीटर …

Read More »

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक प्रा. एन. डी. पाटील यांना जाहीर

मुंबई : प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी औद्योगिक समाजरचना, व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणार्‍या महाराष्ट्रातील व्यक्तीस, संस्थेला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. रोख रक्कम दोन लाख रुपये व मानपत्र असे या पारितोषिकाचे …

Read More »

आता मिशन चांद्रयान-3

नोव्हेंबर 2020चे लक्ष्य; ‘इस्रो’कडून तयारी सुरू बंगळुरू : वृत्तसंस्था पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. सप्टेंबर महिन्यात चांद्रयान-2 मधील विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. या अपयशाचा अनुभव गाठीशी घेऊन आता इस्रो चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा प्रयत्न करणार …

Read More »

स्थानिकांचं मरण

जिल्हाधिकारी यांची रीतसर परवानगी न घेता आणि सागरी किनारा नियंत्रण नियमावलीचे (सीआरझेड) उल्लंघन करून प्रभावशाली आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनार्‍यांवर अनधिकृतपणे बंगले बांधले आहेत. त्यावर कारवाई करण्यासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने यापुढे अलिबाग समुद्रकिनार्‍यावर एकही बेकायदा बंगला नको असे राज्य सरकारला बजावले आहे. हे चांगलेच झाले, परंतु …

Read More »

निष्कलंकतेचा निर्वाळा

राफेल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी अशी अजब मागणी देखील काँग्रेसने लावून धरली. वस्तुत: अशा चौकशीमुळे राफेल विमानाचे तंत्रज्ञान, त्यातील गोपनीय शस्त्रास्त्र सुविधा हे शत्रूच्या हातात विनासायास पडले असते. म्हणून अशाप्रकारची चौकशीची मागणी अनाठायी आहे हे कुठल्याही सामान्य बुद्धीच्या माणसासही कळेल. परंतु बालबुद्धीचे नेते आणि त्यांचे पाठिराखे यांना …

Read More »

विवाहितेची मित्राकडून हॉटेल रूममध्ये हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वाढदिवसाच्या पार्टीमध्ये वादावादी झाल्यानंतर मित्रानेच मैत्रिणीच हत्या केली. दिल्लीच्या अलीपूर भागातील ओयो हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. विक्की मान असे आरोपीचे नाव असून, मैत्रिणीची हत्या करुन तो पसार झाला होता. त्याला अलीपूर भागातून अटक करण्यात आली आहे. आरोपी विक्की 21 वर्षांचा आहे, तर महिलेचे वय …

Read More »

सांताक्रूझमध्ये स्कायवॉकला सरकते जिने

मुंबई : प्रतिनिधी सांताक्रूझमध्ये सरकत्या जिन्यांचा स्कायवॉकचे भूमिपूजन करण्यात आले. सांताक्रूझ पूर्वेला नेहरू रोड येथे असलेला हा मुंबईतील पहिलाच सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक असेल व त्यामुळे पादचार्‍यांचा त्रास वाचणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी स्कायवॉक बांधले असले तरी ते खूप उंचावर असल्याने त्याचे जिने चढून जाणे त्रासदायक ठरते. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, …

Read More »

लग्न मोडण्यासाठी नवरी मुलीनेचे पाठविले प्रियकराकरवी फोटो

चेन्नई : वृत्तसंस्था लग्न थांबवण्यासाठी नवरी मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आपले फोटो नवर्‍या मुलाच्या मोबाइलवर पाठवल्याची घटना समोर आली आहे. चेन्नईमध्ये ही घटना घडली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले असून, पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला समज दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. नवरी मुलीच्या …

Read More »

कारसेवकांवरील खटले मागे घ्या

हिंदू महासभेची मागणी नवी दिल्ली : वृत्तसंस्था कारसेवकांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याची मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. कारसेवकांवरील खटले मागे घेण्याव्यतिरिक्त …

Read More »

‘ई-नाम’चा वापर करावा : सीतारामन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कृषी मालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी राज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या (एपीएमसी) बंद करून ई-नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट) या व्यवहार पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. याद्वारे शेतकर्‍यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो, असे त्या म्हणाल्या. दिल्लीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास …

Read More »