पनवेल : बातमीदार साईनगर येथील तहसील कार्यालयासमोर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अनेक चारचाकी वाहने अस्तावस्त पार्क करत असल्याने नागरिक वैतागले आहेत. तहसील कार्यालय व शहर पोलीस स्टेशन यामुळे साईनगर परिसर नेहमी गजबजलेला असतो. नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात येथे वर्दळ सुरू असते. येथे वाहने कशीही पार्क करत …
Read More »ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीच्या नवनिर्वाचित सरपंच रिया कोंडिलकर यांना शुभेच्छा
पनवेल : ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे नवनिर्वाचित सरपंच रिया रवींद्र कोंडिलकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांना विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग केणी, ग्रामपंचायत सदस्य अजय तेजे, माजी सरपंच योगेश लहाने, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, महिला अध्यक्षा शिल्पा म्हात्रे, प्रवीण काळबागे, कालुराम माळी, कृष्णा कोंडिलकर, …
Read More »मोनाली गायकवाड हिचा वाढदिवस
पनवेल : भाजपच्या मोनाली गायकवाड हिचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोनाली गायकवाड हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रणाली नाईक, सोनाली खंडागळे उपस्थित होत्या.
Read More »शाळा, कॉलेजच्या कॅन्टिनमधून जंकफूड होणार हद्दपार
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शाळा कॉलेज कॅन्टिनमधून जंकफूड हद्दपार होणार आहे. त्याच्या अतिसेवनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर व वैयक्तिक जीवनावर परिणाम होत असल्याने अन्न सुरक्षा आयुक्त डॉक्टर पल्लवी दराडे यांनी प्रभावी कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत. जंकफूडमध्ये साखर, मीठ व मैद्याचा समावेश जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे …
Read More »मिनी गोवा बदनाम होतोय
अलिबाग म्हटलं की निळाशार समुद्र, स्वच्छ किनारे, नारळपोफळीच्या बागा, गर्द हिरवी झाडी. मुंबई, पुणे यासारख्या शहरांमधून कमी वेळेत पाहचता येते. या परिसरात मिळणारी ताजी मासळी, तांदळाची भाकरी, येथील लोक, येथील संस्कृती यामुळे अलिबागची एक वेगळीच ओळख आहे. कुटुंबीयांसह पर्यटनासाठी अलिबाग हे एक सर्वात सुरक्षित पर्यटनस्थळ आहे, अशी आलिबागची ओळख आहे. …
Read More »दिव्यांगांनाही शिक्षण हवे
शाळेबाहेर राहून जाणार्या दिव्यांग मुलांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहेे. दिव्यांग हक्क कायदा लक्षात घेऊन शिक्षण हक्क कायद्यात अनुकूल बदल घडवून आणल्यास त्याचा लाभ दिव्यांग मुलांना मिळू शकेल, अशी सूचना अहवालात आहे. कायद्यात दिव्यांग मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने तरतुदी असल्या तरी या मुलांनी नेमके कुठे शिकावे, त्यांना कुणी शिकवावे, त्या ठिकाणी कुठल्या …
Read More »‘साहित्यसंपदा’तर्फे साहित्य संस्कार शिबिर
ठाणे : प्रतिनिधी साहित्यसंपदा समूहातर्फे ठाणे येथील नवजीवन विद्या मंदिर येथे साहित्य संस्कार शिबिर घेण्यात आले. मराठी भाषेवर होणारे आक्रमण आणि लोप पावणारी वाचन संस्कृती असे ज्वलंत मुद्दे सर्वत्र चर्चेत असताना साहित्यसंपदा समूहाने त्यावर ठोस पाऊल उचलत साहित्य क्षेत्रात आपले भरीव योगदान साहित्य संस्कार शिबिरांतर्गत देण्यास सुरुवात केली. या शिबिराला …
Read More »‘तरणखोप ग्रा.पं.मधील भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी’
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील तरणखोप ग्रामपंचायत हद्दीतील गोविर्ले गावामध्ये 2016-2017 या कालावधीत न केलेल्या कामांचे बिल अदा करून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा नियोजन समिती सदस्य जगदिश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तरणखोप ग्रामपंचायतीच्या वतीने गोविर्ले गावात किती विकासकामे …
Read More »जालन्यातील धामणा धरणाला तडे, चार गावांना धोका
जालना : प्रतिनिधी एकीकडे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं असतानाच तिकडे जालना जिल्ह्यातल्या धामणा धरणाच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. भिंतीमधून पाणी पाझरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तड्यांमुळे धरणाच्या आजूबाजूच्या तीन ते चार गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. धामणा धरण हे भोकरदन तालुक्यातील सेलूदमध्ये आहे. या …
Read More »डॉ. महेश केळुसकर सेवानिवृत्त
मुंबई : प्रतिनिधी आकाशवाणीतील प्रदीर्घ सेवेनंतर साहित्यिक डॉ. महेश कुळुसकर सेवानिवृत्त झाले. 1983 पासून ते आकाशवाणीत कार्यरत होते. रत्नागिरी, दमण, विविध भारती, सांगली, मुंबई या केंद्रांवर काम करताना त्यांनी 26 अभिवाचन मालिका केल्या. त्यातील महानायक ही अभिवाचन मालिका खूप गाजली. त्याचबरोबर त्यांनी प्रभाते मनी, ऐसी अक्षरे रसिके, चिंतन हा चिंतामणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper