नागपूर ः प्रतिनिधी शेतशिवारात आग लावल्याने जळालेले बाभळीचे झाड रेल्वे रुळावर पडले होते. दरम्यान, या रेल्वे रुळावरून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इतवारी नागपूर रेल्वे स्थानक ते नागभीडकडे जाणारी पॅसेंजर धावत होती. अशातच कारगाव शिवारात झाड रेल्वे रुळावर पडल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच ब्रेक लावत रेल्वे थांबविण्यात आली. अगदी झाडाच्या काही …
Read More »शेतीच्या वादातून शेतकर्याची हत्या
सात जणांविरोधात गुन्हा दाखल हिंगोली ः प्रतिनिधी तालुक्यातील राहुली बु. येथे शेतीच्या वादातून एकाची संगनमत करून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शंकर लक्ष्मण डोरले (35) असे मृत शेतकर्याचे नाव असून या प्रकरणी सात जणांविरोधात ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण डोरले यांचे शेतीच्या प्रकरणात काही शेजार्यांसोबत जुने …
Read More »अंतर्गत विरोधामुळे निकालांपूर्वीच वाढल्या काँग्रेसच्या अडचणी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधील अंदाजांमुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि यूपीएची चिंता वाढली आहे, मात्र एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रत्यक्ष निकाल लागल्यास काँग्रेसची चिंता दोन पातळ्यांवर वाढणार आहे. एकीकडे केंद्रात सरकार न बनल्यास पक्षाचा संघर्ष अधिकच वाढणार …
Read More »हत्या करणारे मारेकरी गजाआड
पुणे ः प्रतिनिधी सावकारी करणार्या अजय जयस्वाल यांची हत्या करणार्या दोघा मारेकर्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. विनायक उर्फ चिंटू कुमार कुर्तकोटी (28) आणि अविनाश दीपक जाधव (21) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत़. पैशांच्या वादातून हा खून करण्यात आल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना होता़. या गुन्ह्याचा तपास करीत असताना …
Read More »नवज्योतसिंग सिद्धूंचे मंत्रिपद धोक्यात
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा निकाल एका दिवसावर असून त्यात काँग्रेसला मोठे नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच आता पंजाबमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षातील चार मंत्र्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे …
Read More »मावळच्या निकालासाठी उजाडणार रात्र
पिंपरी ः प्रतिनिधी मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असून, प्रशासकीय यंत्रणा त्यासाठी सज्ज झाली आहे. प्रथमच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिकांची मोजणी केली जाणार असल्याने अंतिम निकाल येण्यासाठी सुमारे 15 तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मावळ लोकसभेचा अंतिम निकाल मिळण्यास रात्र उजाडणार आहे. मावळ मतदारसंघातील मतमोजणी …
Read More »सहा राज्यांत भीषण पाणीसंकट
केंद्राने दिल्या खबरदारीच्या सूचना; जलपातळी दिवसेंदिवस होत आहे कमी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात वाढत्या तापमानासोबत भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. देशातील सहा राज्यांमध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या राज्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. पाणीसंकट पाहता केंद्र सरकारने या सहा राज्यांसाठी खबरदारीची सूचना जारी केली आहे. …
Read More »विवाहिता बेपत्ता
पनवेल : तळोजा एमआयडीसी परिसरात असलेली एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याने तिचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत. अंशुकुमारी रूपेशकुमार लाल (38, रा. बीटीसी कंपनी, प्लॉट नं. 17/3, तळोजा एमआयडीसी) हिची उंची 5 फूट 5 इंच, अंगाने सडपातळ, रंग सावळा, चेहरा उभट, नाक लांब असून तिच्या अंगात हिरव्या रंगाची साडी व …
Read More »अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग
पनवेल ः वार्ताहर अल्पवयीन मुलीला स्वतःच्या दुकानातील गाळ्यात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करणार्या एका टेलरला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. करंजाडे येथे टेलर काम करणारा राजेश त्रिभुवन सिंग (29) याने त्याच्या दुकानाजवळील असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलीस दुकानात बोलावून दुकानाचे शटर खाली खेचून अतिप्रसंग केला. याबाबतची माहिती …
Read More »रसायनीतील वीटभट्टी व्यावसायिक आशावादी
रसायनी : प्रतिनिधी वीटभट्टीचा व्यवसाय जोखमीचा असून मातीत पैसे टाकून मातीतूनच पुन्हा पैसे निर्माण करण्याचा हा धंदा आहे. रसायनीत सध्या विटांना हवी तशी मागणी नसल्याने लाखो रुपयांच्या विटा काही ठिकाणी पडून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या हंगामात विटांची जोरात विक्री सुरू होईल, असा आशावाद समोर ठेवून वीटभट्टी व्यावसायिकांनी विटांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper