Breaking News

Ramprahar Team

पोशीर येथील साठवण विहिरीत शेवाळ आणि जलपर्णी

पाणीपुरवठा कमिटीचे दुर्लक्ष; वर्षभरात विहिरींची साफसफाईच नाही कर्जत : बातमीदार बिरदोले गावाजवळ उल्हास नदीलगत असलेल्या पोशीर पाणीपुरवठा योजनेच्या साठवण टाकीची दुरवस्था झाली असून टाकीतील पाण्यावर शेवाळ, जलपर्णीचे थर साचले आहेत. वर्षभरात एकदाही या साठवण टाकीची साफसफाई केली नसल्याने पाण्यावर जलपर्णी साचली आहे. पोशीर ग्रामपंचायतीची 1967 पासून अस्तित्वात असलेली जुनी पाणीपुरवठा …

Read More »

खोपोली नगरपालिका हद्दीतील लौजी परिसरात पाणीटंचाई

खोपोली : प्रतिनिधी वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतरही  खोपोली नगरपालिकाहद्दीतील लौजी गाव तसेच उंचावर असलेल्या रहिवाशी भागांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लौजी गावाला कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. खोपोली नगरपालिकेची वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित …

Read More »

अनधिकृत मच्छी विक्रेत्यांना हटविले

सुधागड पाली ग्रामपंचायतीची कारवाई; मिनिडोअर स्टँड ते बाजारपेठ रस्ता झाला मोकळा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीमधील मिनिडोअर स्टँड ते बाजारपेठ या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस मागील अनेक महिन्यांपासून मच्छी विक्रेते बसत होते. या अनधिकृत मच्छी विक्रेत्यांना पाली ग्रामपंचायतीने नुकतेच हटविले आहे. तसेच  या ठिकाणी मच्छी विक्रीसाठी बसणार्‍यावर कायेदेशीर कारवाई …

Read More »

मृत विद्यार्थ्याचे घवघवीत यश

नोएडा ः वृत्तसंस्था केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. देशभरातील 91.1 टक्के विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षेत यश मिळवले. यामध्ये उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील विनायक श्रीधर याला इंग्रजीत 100पैकी 100, विज्ञानामध्ये 96 आणि संस्कृतमध्ये 97 गुण मिळाले आहेत, मात्र हा निकाल पाहण्यासाठी विनायक या जगात …

Read More »

दिग्विजय सिंहांसाठी साधूंची फौज

मैदानात उतरविणारे कम्प्युटरबाबा गायब? भोपाळ ः वृत्तसंस्था मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या समर्थनात शेकडो साधूंची फौज घेऊन मैदानात उतरलेले कम्प्युटरबाबा भोपाळमधून अचानक गायब झाले आहेत. कम्प्युटरबाबांचे हजारो साधूंसोबत सुरू असलेले समागम स्थळ रिकामे झाल्याचे चित्र आहे. भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांच्यासमोर  …

Read More »

आयपीएलवरील सट्ट्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त

वडिलांची तीन मुलींसह आत्महत्या वाराणसी ः वृत्तसंस्था जुगारी वडिलांमुळे एक हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. सट्ट्यात सर्वकाही हरल्याने एका पित्याने तीन मुलींना विष देऊन स्वत:देखील आत्महत्या केली. आता या कुटुंबातील केवळ मुलींची आई जिवंत आहे. माहेरी गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला, मात्र पती आणि मुलींच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला …

Read More »

सहा महिन्यांनंतर उघडले केदारनाथ मंदिराचे द्वार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिर गुरुवार (दि. 9)पासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी उघडण्यात आला आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पुजार्‍यांनी विधिवत पूजा केली. हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथाला जलाभिषेक, रुद्राभिषेक संपन्न झाला आहे. 8 तारखेला गंगोत्री आणि यमनोत्रीची दारे खुली झाल्यापासून चारधामच्या यात्रेला सुरुवात …

Read More »

चक्रीवादळग्रस्त राज्यांना रेल्वेची मदत

विनाभाडे पोहोचविणार साधनसामुग्री सोलापूर ः प्रतिनिधी फनी चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यांतील नागरिकांना मदत करण्याचा ओघ वाढतच आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील सामाजिक संस्था, संघटना व अन्य लोकांकडून दिली जाणारी मदत विनाभाडे रेल्वे प्रशासन संबंधित लोकांपर्यंत पोहचवणार असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे …

Read More »

आभाळ आले भरूनि…!

श्रीवर्धन : सध्या भर उन्हाळ्यात सूर्यनारायण आग ओकत असताना उगवतीच्या वेळी मात्र तो काहीसा शीतल भासतो. त्यात ढग आले असतील, तर वातावरण काहीसे गूढ भासू लागते. असेच सकाळीच्या वेळी आभाळात भरून आलेल्या ढगांतून होणार्‍या सूर्योदयाचे वडवली येथे टिपलेले विलोभनीय दृश्य. (छाया : अमेय नाझरे)

Read More »

श्रीवर्धन तालुक्यातील शेतकर्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ

श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील 2 हजार 501 शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती श्रीवर्धनचे तहसिलदार जयराज सूर्यवंशी यांनीं दिली. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थी शेतकर्‍याच्या बँक खात्यात वर्षभरामध्ये तीन टप्यांत सहा हजार रूपये जमा होणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आतापर्यत 14 लाख 26हजार …

Read More »