Breaking News

Ramprahar Team

पावसाआधी मोठीजुई पुलाचे काम करण्याची मागणी

30 वर्षांपूर्वीच्या पुलाच्या खालच्या भागाचे सिमेंट कोसळलेले उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील मोठीजुई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावाच्या वेशीवर आणि चिरनेर जंगलसत्याग्रहातील शूरवीर रामा बामा कोळी यांच्या हुतात्मा स्मारकाजवळील खाडी पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाच्या खालच्या भागाचे सिमेंट कोसळले आहे. त्याचप्रमाणे या पुलाला वापरण्यात आलेल्या …

Read More »

मिनीट्रेनचे इंजिन पुन्हा पडले बंद

पर्यटकांचा अर्धा तास खोळंबा कर्जत : बातमीदार सध्या माथेरानला जाणार्‍या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मात्र तेथील मिनिट्रेनचे रडगाणे सुरूच आहे. बुधवारी (दि. 8) सकाळी नेरळ येथून निघालेल्या मिनीट्रेनचे इंजिनमध्येच बंद पडले आणि प्रवाशी पर्यटकांचा खोळंबा झाला. माथेरानला मिनीट्रेनमधून जाण्यासाठी सकाळपासूनच पर्यटक नेरळ येथे येऊन थांबतात. शनिवार-रविवार वगळता मिनिट्रेनच्या  दिवसभरात केवळ …

Read More »

शाळेला जातो आम्ही…

जिल्ह्यात दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके अलिबाग : प्रतिनिधी सर्वशिक्षा अभियानातंर्गत सरकारतर्फे रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. ही पुस्तक शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 16 जून रोजी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद, …

Read More »

दुष्काळात फळबागा जगवताना…

फळबाग लागवडीतून शेतकर्‍यांना हमखास उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे गेल्या 20-25 वर्षांमध्ये फळबाग लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. फळझाडांची वाढ नीट होण्यासाठी योग्य पाणीव्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक ठरतो. तथापि, अलीकडील काळात पाणीटंचाई, दुष्काळासारख्या समस्येमुळे फळशेतीचे नुकसान होत आहे. तथापि, या काळात फळझाडांना ठिबक सिंचन, मडके सिंचन यांचा वापर करून पाणी …

Read More »

डॉल्फिनना जपायला हवे

कोकण किनारपट्टीवरील जलचरांचे जीवनचक्र तसेच त्यांच्या नैसर्गिक वृत्ती-प्रवृत्तींबद्दल अधिक माहिती मिळण्याची गरज आहे. यासंदर्भातील विशेष अभ्यासाला राज्यसरकारने यापूर्वीच हिरवा कंदिल दाखवला असून मृत मासे किनार्‍यावर वाहून येण्यामागचे  कारण समजण्यास त्यामुळे मदत होईल. मुंबईसह अवघ्या कोकण किनारपट्टीवरील प्रदूषणाचे परिणाम या अभ्यासातून पुढे येऊ शकतील. डॉल्फिनच्या दर्शनासाठी कोकण किनारपट्टीला भेट देण्याबाबत देशभरातील …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा सीबीएससीचा निकाल 100 टक्के

खारघर : येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा सीबीएससीचा निकाल 100 टक्के लागला. खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी शाळेच्या प्राचार्या राज अलोनी आणि सहकारी शिक्षकांचे अभिनंदन केले.

Read More »

चि. मंगेश आणि चि. अक्षय यांचा विवाह सोहळा

खारघर : सुप्रसिद्ध भजन गायक निवृत्तीबुवा चौधरी यांचे नातू आणि उमेश चौधरी यांचे पुत्र चि. मंगेश आणि चि. अक्षय यांचा विवाह सोहळा सोमवार (दि. 6) रोजी पार पडला. या विवाह सोहळ्याप्रसंगी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून दोन्ही दाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.

Read More »

मोहोपाडा बाजारपेठेत पाणपोईची सोय

रसायनी : प्रतिनिधी सम्यक सामाजिक संस्थेचे रसायनी विभागाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी वाढदिवसानिमित्त मोहोपाडा पोलीस चौकीजवळ पाणपोई सुरू केली आहे. रसायनी पाताळगंगा परिसरातील नागरिक बाजारहाट करण्यासाठी मोहोपाडा बाजारपेठेत येत असतात त्यांना पिण्याचे थंडगार पाणी उपलब्ध व्हावे याकरिता मोफत थंड पाण्याचे जार ठेवून पाणपोई सुरू केली आहे. रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र …

Read More »

वाढत्या कंटेनरच्या रांगेमुळे वाहतूक कोंडी

उरण : प्रतिनिधी कोप्रोली परिसरात लागलेली कंटेनर ट्रेलरची रांग कोप्रोली येथील ऑलकार्गो गोदामापर्यंत लागत असल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प होत आहे. सायंकाळच्या वेळी कामावरून येणार्‍या कामगारांना या मुळे  कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे, तर गोदाम प्रशासनाचे अधिकारी अधिकाधिक कंटेनर हाताळणीचा व्यवसाय होऊन उत्पन्नात जास्तीत जास्त भर टाकण्याकडे लक्ष केंद्रित करून …

Read More »

केवाळे, हरिग्राम घाट स्वच्छ

गाढी नदी संवर्धनाचा दुसरा टप्पा यशस्वी पनवेल : बातमीदार महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुरू केलेल्या गाढी नदी स्वच्छतेचा दुसरा टप्पा रविवारी उत्साहात पार पडला. गाढी नदीला लागून असलेल्या हरिग्राम, केवाळे घाट परिसरातील अस्वच्छता दूर करण्यात आली. काही स्थानिक नागरिकांनीदेखील या उपक्रमाला प्रतिसाद दिला. पनवेलच्या गाढी नदीला पूर्वीचे प्रदूषणविरहित रूप आणण्यासाठी पनवेल …

Read More »