Breaking News

Ramprahar Reporters

शेतकर्‍यांच्या शौर्यशाली आंदोलनात दुसर्‍या दिवशी तिघांना हौतात्म्य

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…त्या दिवशी दास्तान फाट्याजवळ पोलीस व आंदोलक यांच्यात फार मोठा संघर्ष झाला.लाठीमार, अश्रूधूर, …

Read More »

आपत्कालीन परिस्थितीत पत्रकारांचीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतली दखल -रामदास आठवले

मुंबई ः प्रतिनिधीलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबरोबर मी संसदेत काम केले. ते स्वच्छ अंत:करणाचे व सरळ मनाचे दानशूर नेते आहेत. मी त्यांना दीर्घ आयुरारोग्य चिंतितो, असे सांगून केेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीत सामान्य माणूस आणि पत्रकार यांचीही त्यांनी दखल घेतली ही बाब महत्त्वाची आहे.कोरोना देवदूत पुरस्काराचे मानकरी माजी …

Read More »

केंद्रीय पर्यावरण पथकाकडून साई रिसॉर्टची पाहणी

परिवहनमंत्री अनिल परब अडचणीत? रत्नागिरी ः प्रतिनिधीपरिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पर्यावरण विभागाने परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आलिशान साई रिसॉर्टची शनिवारी(दि. 12) पाहणी केली. सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत अनिल परब यांच्या …

Read More »

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरातील मंत्र्यांच्या गाड्या फोडणार

नरेंद्र पाटील यांची राज्य सरकारला तंबी सोलापूर ः प्रतिनिधीमराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही लढून केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत, परंतु महाविकास आघाडी सरकारला झुकविल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता आरक्षणासाठी गुळगुळीत आंदोलन न करता राज्यभरात मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडण्यात येतील, अशी तंबी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शनिवारी …

Read More »

राज्यातील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

पटोलेंच्या भूमिकेमुळे ‘मविआ’त खळबळ मुंबई ः प्रतिनिधीनुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये …

Read More »

शेअर बाजारात तेजी असताना घ्यावयाची काळजी

शेअर बाजारात तेजी असताना त्याचा बोलबाला सुरु होतो आणि त्यात अनेक नवे गुंतवणूकदार अडकतात. सध्या बाजारात अशीच तेजी असून एक कोटींच्यावर गुंतवणूकदार बाजारात आले आहेत. शेअर बाजारात आज अनेक कारणांनी परतावा मिळत असला तरी तो टिकवून ठेवण्यासाठी काळजी ही घ्यावीच लागते.सध्या शेअर बाजार तेजीत आहे. आज ना उद्या, तो कोसळेल …

Read More »

संपत्ती निर्मितीचा नवा खेळ आणि खेळाचे नवे नियम!

नव्या जगाने संपत्ती निर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही. तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच नव्हती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. हा खेळ त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला …

Read More »

‘बाळासाहेबांनी विमानतळाला स्वत:चे नाव नाकारले असते’

नाशिक : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे. त्यावर या विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्याचे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे, मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री छगन भुजबळ …

Read More »

शेतकर्‍यांच्या शौर्यशाली, गौरवशाली आंदोलनात पहिल्या दिवशी दोन जण हुतात्मा

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…16 जानेवारीच्या आंदोलनाचे निरोप तातडीने 15 तारखेला रातोरात सर्वत्र गेले होते. निरोप मिळताच …

Read More »

मराठा क्रांती मूक आंदोलन वादळापूर्वीची शांतता

संभाजीराजेंचा इशारा पुणे ः प्रतिनिधीमराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेत आता संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाची हाक दिली आहे. 16 जूनला कोल्हापूरमधून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यातून त्यांनी इशारा दिला आहे.संभाजीराजे यांनी ही पोस्ट शेअर करताना …

Read More »