Breaking News

Ramprahar Reporters

शेलू येथे मास्क घालून बाळाचे बारसे

कर्जत : बातमीदारकोरोनाचा विषाणू संसर्गाने पसरत आहे. शहराच्या तुलनेत याचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात कमी आहे, पण तरीही सावधगिरी बाळगत शेलू येथे नवजात बाळाचे मास्क घालून बारसे करण्यात आले.चीनमधून पसरलेल्या कोरोनाने संपूर्ण जगात आपली दहशत निर्माण केली आहे. या विषाणूवर अजूनही लस व औषधोपचार उपलब्ध नसल्याने संसर्ग टाळणे आणि खबरदारी घेणे …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बंद आणि खुला

पनवेल, मुंबई : प्रतिनिधीनागरिक व त्यांच्या वाहनांची मोठी गर्दी सोमवारी (दि. 23) सकाळी अचानकपणे बाहेर पडल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ कळंबोली येथे झाली होती. ही गर्दी टाळण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळासाठी बंद केली होती. गर्दी ओसरल्याने पुन्हा एकदा द्रुतगती महामार्ग खुला करण्यात आला.अत्यावश्यक काम असेल तरच …

Read More »

उद्यापासून देशांतर्गत विमानसेवाही होणार बंद

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे थांबवल्यानंतर आता देशांतर्गत विमान सेवादेखील खंडीत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी (दि. 23) घेतला. या निर्णयानुसार 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून ही सेवा बंद राहणार आहे. या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार, देशांतर्गत व्यावसायिक प्रवासी …

Read More »

सर्व राज्यांत लॉकडाऊन

केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत सर्व राज्यांत लॉकडाऊन करण्याचे निर्देश जारी केले आहेत. लॉकडाऊनचे पालन न करणार्‍या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही सरकारने जारी केलेल्या पत्रकातून देण्यात आले आहेत. काही राज्यांत अगोदरच लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे, पण जनता …

Read More »

अखेर महाराष्ट्रात संचारबंदी लागू

जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचेही आदेश मुंबई : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 23) केली. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. त्याचप्रमाणे  राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. आज …

Read More »

कोरोनाविरोधात आज संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाला देशात प्रतिबंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. 22) संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. अनेकांनी पंतप्रधानांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून, यात सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.कोरोना विषाणूचा प्रसार सर्वत्र होत असून, भारतातही काही रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

कोरोना धोका वाढतोय

राज्यासह देशभरातील रुग्णांचा आकडा वाढला मुंबई, नवी दिल्ली : प्रतिनिधी, वृत्तसंस्थाचीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला असून, भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारने शनिवारी (दि. 21) जाहीर केलेल्या आकड्यांनुसार आतापर्यंत संपूर्ण देशभर 298 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी ही संख्या 258 होती. म्हणजेच 40 जणांची भर …

Read More »

जनता कर्फ्यूत सहभागी व्हा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : कोरोनाविरोधात लढा देण्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी सर्व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, तसेच सर्वांनी मनात भीती न बाळगता स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन …

Read More »

कामोठे येथील होम क्वारंटाईन केलेल्या तिघांवर गुन्हा दाखल

बाहेर फिरताना आढळल्याने कारवाई पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील ज्या सदस्यांना होम क्वारंटाईन केले होते ते शनिवारी (दि. 21) सकाळी महापालिका आयुक्त आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या तपासणीवेळी बाहेर फिरताना आढळले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना खारघर येथील ग्राम विकास भवनात 14 दिवसांसाठी पुन्हा …

Read More »

पीटरसनही म्हणतो, सरकारी आवाहनाचे पालन करा!

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (दि. 23) जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनचे भारतीय क्रीडापटूंकडूनही कौतुक झाले. भारतात आलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू पीटरसन यानेही सर्वांना आपापल्या सरकारने केलेल्या आवाहनाचे पालन करायला हवे, असे म्हटले आहे. यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, आर अश्विन, …

Read More »