नागोठणे : प्रतिनिधी : बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 यांच्या विद्यमाने येथील शिवाजी चौकात शनिवारी (दि. 27) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी सकाळी 9 वाजता बौद्धाचार्य किसन शिर्के, हेमंत जाधव, नितीन गायकवाड, मयूर गायकवाड, विलास कांबळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »महामार्ग वाहनांनी फुलला
नागोठणे : प्रतिनिधी : चौथा शनिवार, तसेच रविवार आणि त्याला लागूनच सोमवारी लोकसभेच्या मतदानानिमित्त जाहीर करण्यात आलेली सुटी, याचा महामार्गावर परिणाम साधला असून मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी फुलून गेला आहे. कोकणाच्या बाजूकडे जाणारी बहुतांशी चार चाकी वाहने मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, पनवेल, नवी मुंबईचीच असल्याचे या वाहनांच्या क्रमांकांवरून स्पष्ट होत आहे. …
Read More »अलिबागमध्ये स्वच्छता मोहीम
अलिबाग : रामप्रहर : स्वच्छतेमुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच आरोग्य सुदृढ बनण्यास मदत मिळते. स्वच्छतेचा मंत्र सर्वांनीच जोपसला पाहिजे, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या अलिबाग सेवा केंद्राच्या सहाय्यक संचालिका अंजू दिदी यांनी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय आणि रायगडचा युवक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग शहरातील स्मशानभूमी समोरील फुल नगर झोपडपट्टी परिसरात स्वच्छता …
Read More »सुधागडात दारूच्या नशेत एकाची हत्या, आरोपी अटकेत
पाली : दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीतून एकाची हत्या झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) रात्री सुधागड तालुक्यातील कोशिंबळे येथे घडली. याबाबत पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. राजेश शंकर राजिवडे (वय 42, रा. कोशिंबळे, ता. सुधागड) शनिवारी (दि. 27) रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास …
Read More »रोहा बीडीओंकडून मढाली, वांदोली गावांची पाहणी
रोहे ः प्रतिनिधी : पाणीटंचाईचे सावट असलेल्या मढाली, वांदोली व वांदोली आदिवासी वाडी (ता. रोहा) या गावांची गटविकास अधिकारी पंडित राठोड व विस्तार अधिकारी सुनील गायकवाड यांनी पाहणी केली. या गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे, मात्र ते लांबून आणावे लागते. टंचाई भासली, तर या गावाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येईल, …
Read More »श्रीवर्धन तालुक्यात पाणीटंचाई
आठ गावांमधील महिलांची पायपीट सुरू, टँकरची मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष श्रीवर्धन : प्रतिनिधी : तालुक्यातील आठ गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे, मात्र त्याकडे श्रीवर्धन पंचायत समिती दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप टंचाईग्र्रस्त ग्रामस्थांकडून केला जात आहे. श्रीवर्धन तालुक्यामधील साक्षीभैरी, कोढे पंचायतन, …
Read More »भाजपच्या ताकदीच्या जोरावर गीते विजयी होणार!
अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांचा विश्वास मुरूड : प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीची कोकणात ताकद वाढली असून केंद्र व राज्य शासनाच्या कामावर लोकांचा विश्वास वृद्धिंगत झालेला आहे.विद्यमान सरकारने लोकांच्या विकासाच्या योजनांना प्राधान्य देत मूलभूत सुविधा लोकांना जास्तीत जास्त मिळाव्यात यासाठी कोकणातील विकासाला सुद्धा चालना दिली आहे. कोकणातील लोक …
Read More »‘एक ही भूल’
‘एक ही भूल’ हा ए. पूर्णचंद्र राव यांच्या लक्ष्मी प्रोडक्शन्सचा 1981मध्ये जितेंद्र आणि रेखा यांची भूमिका असलेला चित्रपट त्यावेळी खूप चालला होता. त्यामध्ये राम (जितेंद्र) आणि साधना (रेखा) एक श्रीमंत विवाहित जोडपे आहेत. राम एक पदवीधर असून बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अधिकारी असतो. त्याच्या हातून नशेत एक चूक घडते. त्यामुळे साधना त्याला …
Read More »नवी मुंबईत निवडणूक यंत्रणा झाली मतदानासाठी सज्ज
नवी मुंबई : बातमीदार : शनिवारी प्रचार थंडावल्यावर निवडणूक यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे. अनेक दिवस मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या निवडणूक यंत्रणेसमोर आता निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान आहे. त्यानुसार 28 एप्रिल रोजी सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी व मतपेट्या पोहचल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्राजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात …
Read More »रसायनी परिसरात पोलिसांचे संचलन
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) होणारे मतदान शांततेत पार पडावे आणि मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खालापूर तालुक्याचे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper