Breaking News

Yearly Archives: 2020

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत मकरसंक्रांतीचा गोडवा

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या एसएससी 1989मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवारी (दि. 12) शांतीवन नेरे येथील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांसमवेत मकरसंक्रांतीच्या तिळाचा गोडवा हा सदाबहार कार्यक्रम साजरा केला. सामाजिक आणि शैक्षणिक कार्याच्या हेतूने या गु्रपची स्थापना केली गेली …

Read More »

आरोग्य शिबिरास नवघरमध्ये प्रतिसाद

उरण : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ उरण व ग्रामपंचायत नवघर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 280 रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ उरणचे अध्यक्ष डॉ. अमोल गिरी, डॉ. संतोष गाडे, डॉ. प्रिती गाडे, डॉ. चेतन पाटील, डॉ. …

Read More »

सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी संघटनेच्या नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिडको प्रकल्पग्रस्त कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते सिडको भवन येथे सोमवारी (दि. 13) झाले. या वेळी बोलताना त्यांंनी नवी मुंबईतील प्रकल्पबाधितांशी …

Read More »

आयएएस ऑफिसर ट्रेनींची जेएनपीटीला भेट

उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीटी बंदरावरील सुविधांची पाहणी करण्यासाठी लाल बहाद्दूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनीस्ट्रेशनच्या 2019 बॅचच्या आयएएस अधिकारी प्रशिक्षणार्थींनी जेएनपीटीला भेट दिली. आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांना जवाहरलाल नेहरू बंदरावरील कामाची तसेच त्यांच्या अर्थकारण, समाजातील भूमिकांची माहिती मिळावी हा या भेटीमागचा उद्देश होता. जेएनपीटी हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे कंटेनर पोर्ट …

Read More »

तळोजा सीईटीपीचे नूतनीकरण पूर्ण

प्रकल्प कार्यान्वित; जलप्रदूषण आवाक्यात आल्याचा दावा पनवेल : वार्ताहर राज्यात सर्वाधिक प्रदूषित म्हणून ओळखल्या जाणार्‍या तळोजा एमआयडीसीच्या सीईटीपीचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. 31 डिसेंबरपासून तळोजा एमआयडीसीतील जलप्रदूषण धोकादायक पातळीच्या बाहेर आल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केला आहे. औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणारे पाणी प्रक्रिया केल्याशिवाय बाहेर सोडता येत नाही. विविध …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे फलंदाज ढेपाळले

मुंबई : प्रतिनिधीनवीन वर्षात ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघाविरुद्ध पहिला वन-डे सामना खेळणारा भारतीय संघ 255 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने 74, तर लोकेश राहुलने 47 धावांची खेळी करीत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ …

Read More »

शिवरायांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, पण विरोधकांकडून राईचा पर्वत -मुनगंटीवार

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ’आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना पक्षाची भूमिका सोमवारी (दि. 13) मांडली. ब्रम्हांड आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. त्याचवेळी विरोधक राईचा पर्वत करीत असल्याची टीकाही त्यांनी …

Read More »

कचर्‍याचे नियोजन घरापासून करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल : प्रतिनिधीनिरोगी आरोग्यासाठी कचर्‍याचे नियोजन करणे आवश्यक असून, त्याची सुरुवात आपल्या घरातून करावी, असे आवाहन भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि.12) नवीन पनवेलमध्ये केले. विकासनिधीतील कामाचे भूमिपूजन आणि सोसायट्यांना डस्टबिन वाटप कार्यक्रमात आमदार ठाकूर बोलत होते.प्रभाग 17 (नवीन पनवेल) मधील नगरसेवक …

Read More »

आगरी-कोळी महोत्सव सर्वधर्मीयांचा

लोकनेते रामशेठ ठाकर यांचे प्रतिपादन नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदारनामदेव भगत यांचा आगरी-कोळी महोत्सव हा आता केवळ आगरी, कोळी समाजाचा महोत्सव राहिला नसून या शहरातील विविध जाती-धर्मियांना सोबत घेऊन जाणारा महोत्सव झाला आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेरूळ येथे केले. महोत्सवात रविवारी (दि. 13) झालेल्या आगरी, …

Read More »

अभिव्यक्ती की सुरक्षितता?

प्रारंभीचे काही महिने काश्मीरमध्ये कडक निर्बंध होते. इंटरनेट सेवा, दूरध्वनी सेवा, टीव्ही प्रक्षेपण अशा अनेक नागरी सेवा खंडित करण्यात आल्या. शाळा, महाविद्यालये, त्यांच्या परीक्षा, सरकारी आस्थापना यांचेही कामकाज विस्कळीतच होते. स्थानिक नागरिकांना या निर्बंधांचा बराच त्रास झाला व ते साहजिकच होते. परंतु या काळामध्ये बंदुकीची एकही गोळी सुटली नाही हे …

Read More »