Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू, कुलसचिवांसह पाच जणांविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

पुणे : प्रतिनिधी  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यान्वये (अ‍ॅट्रोसिटी) चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. करमळकर, प्रफुल्ल पवार यांच्यासह सिनेट सदस्य संजय चाकणे, सुरक्षा संचालक …

Read More »

पितांबरीला ‘इंडिया एसएमई 100’ पुरस्कार

ठाणे : प्रतिनिधी  – लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ‘इंडिया एसएमई 100’ पुरस्कार पितांबरी प्रॉडक्ट्स प्रयव्हेट लि. कंपनीला मिळाला. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात येतो. जागतिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी …

Read More »

भारताचं ‘नाग’ अस्त्र लवकरच लष्करी सेवेत

पोखरण : वृत्तसंस्था  – नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश होईल. रविवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पोखरण फायरींग रेंजवर नाग क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या. रविवारी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा नाग क्षेपणास्त्र डागून चाचणी घेण्यात आली. तिन्ही चाचण्या यशस्वी ठरल्याचे डीआरडीओच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. नाग …

Read More »

एव्हरेस्टवरील कचर्याचं पुढे काय होतं?

काठामांडू : वृत्तसंस्था  – जगातील जवळपास प्रत्येक गिर्यारोहकासाठी एक लक्ष्य असणार्‍या माऊंट एव्हरेस्ट या पर्वतासाठी नेपाळ या राष्ट्राकडून एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. या पर्वतावर साठलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून नेपाळतर्फे एक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. ज्याअंतर्गत आतापर्यंत या महाकाय पर्वतावरून 10 हजार किलो कचरा उचलण्यात आला आहे. …

Read More »

जोरदार पावसाने नाशिकमध्ये पूर

नाशिक ः प्रतिनिधी नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस पडल्याने गोदावरी नदीला पूर येऊन अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. नाशकात तीन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले असून, मागील 24 तासांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. जोरदार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरींनी …

Read More »

सरकार वाचविण्यासाठी कुमारस्वामींची भागम्भाग

बंगळुरू : काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी राजीनामा देत मुंबईकडे कूच केल्याने कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. आमदारांच्या राजीनामा नाट्यामुळे काँग्रेस-जेडीएसचे आघाडी सरकार संकटात आले असून, सरकार टिकवण्यासाठी एच. डी. कुमारस्वामी यांनी धावाधाव सुरू केली आहे. परिस्थिती सांभाळण्यासाठी कुमारस्वामी अमेरिकेहून भारतात परतले आहेत, तसेच काँग्रेसकडूनही आपल्या असंतुष्ट आमदारांची समजूत …

Read More »

गोंदेगावातील सामूहिक कॉपी प्रकरण

321 विद्यार्थ्यांवर दोन परीक्षा बंदीची कारवाई औरंगाबाद ः प्रतिनिधी सामूहिक कॉपी प्रकरणात विभागीय शिक्षण मंडळाने गोंदेगाव येथील स.भु. हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरील 321 विद्यार्थ्यांवर वन प्लस टूची कारवाई केली. या कारवाईमुळे झालेल्या परीक्षेचे संपादित गुण रद्द करत पुढील जुलै आणि मार्च 2020मध्ये होणार्‍या परीक्षेस विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. तसेच दोषी शिक्षकांवर …

Read More »

तेलंगण, आंध्र ,केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा: अमित शहा

हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंगण, आंध्र प्रदेश आणि केरळला भाजपचा बालेकिल्ला बनवा. या राज्यांतील 50 टक्क्यांहून अधिक मते भाजपच्या पारड्यात पडायला हवीत, असा कानमंत्र भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हैदराबाद येथे कार्यकर्त्यांना दिला आहे. दक्षिण भारतातील भाजप सदस्य जोडणी अभियानाचा शुभारंभ त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे …

Read More »

कर्नाटक पेच; काँग्रेस-जेडीएस बैठका

भाजपचे वेट अ‍ॅण्ड वॉच बेंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटकात निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत आले आहे. जर 13 आमदारांचा राजीनामा स्वीकारला गेला तर कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामीदेखील अमेरिकेतून भारतात परतले आहेत. दिल्लीहून विशेष विमानाने ते बेंगळुरूत पोहचत आहेत. त्यांनी पक्षनेत्यांची सायंकाळी तातडीची …

Read More »

सुधारणांचा अर्थसंकल्प

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. सुधारणांच्या या अर्थसंकल्पात गाव, गरीब आणि शेतकर्‍यांच्या विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. (पान 2 वर..) -आयकर भरण्यासाठी ॅनकार्डची सक्ती नाही करदात्यांना आयकर भरणा करण्याच्या बाबतीत …

Read More »