ब्रिटनमधून परतलेल्या सहा जणांना संसर्ग नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या विषाणूने डोकेदुखी वाढवली आहे. वेगाने पसरणार्या कोरोनाच्या या नवीन प्रकाराने जगभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. एव्हाना 16 देशांमध्ये पोहचलेल्या या विषाणूने आता भारतातही शिरकाव केला आहे. देशात नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले …
Read More »आता ढोंगबाजी चालणार नाही
जे. पी. नड्डांचा राहुल गांधींवर निशाणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था शेतकरी आंदोलनावरून राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनाकारण घेरण्याचा प्रयत्न केला. परिणामी भाजपकडूनही राहुल गांधींवर निशाणा साधण्यात आला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लोकसभेतील राहुल गांधींच्या …
Read More »‘मन की बात’मधून पंतप्रधानांनी साधला देशवासीयांशी संवाद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 27) मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करीत जनता कर्फ्यू, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भारतात तयार होणार्या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात, असे म्हणत …
Read More »लव जिहादविरोधी मध्य प्रदेशातही कायदा
शिवराज चौहान सरकारची मंजुरी भोपाळ ः वृत्तसंस्थामध्य प्रदेश सरकारने लव जिहादविरोधी ’धर्म स्वातंत्र्य विधेयक 2020’ला नुकतीच कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे. नव्या कायद्यात 19 तरतुदी आहेत. त्यामुळे आता धर्म परिवर्तन प्रकरणात पीडित बाजूच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यास पोलीस कारवाई करतील. मध्य प्रदेशने देशातील सर्वांत कठोर कायदा केल्याची माहिती कॅबिनेटमध्ये विधेयकाला मंजुरी …
Read More »नवे कृषी कायदे शेतकर्याला बळ देणारे
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन; देशभरातील शेतकर्यांशी साधला संवाद नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकाही लोकांना फक्त खोटी माहिती पसरवण्यामध्ये रस आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे बाजारपेठ आणि एमएसपी पद्धत रद्द होईल असे पसरवले जात आहे, पण असे काही घडणार नाही. नवे कृषी कायदे शेतकर्याला बळ देणारे आहेत. आधी शेतकर्यासाठी जोखीम जास्त असायची, पण …
Read More »देशात 1 जानेवारीपासून वाहनांना फास्टॅग बंधनकारक
नवी दिल्ली : देशातील प्रत्येक वाहनाला 1 जानेवारीपासून फास्टॅग असणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. एका कार्यक्रमात त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती दर्शविली. त्या वेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. 1 जानेवारी 2021पासून प्रत्येक वाहनाला फास्टॅग बंधनकारक असणार आहे. फास्टॅगची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर …
Read More »लोकल टू ग्लोबल उद्योजकतेची मोठी संधी
पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला मंत्र कोलकाता ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी (दि. 24) पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठाच्या शतकपूर्ती कार्यक्रमात सहभाग घेत गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांच्यासह स्वामी विवेकानंदांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्याच्या लढाईत विश्वभारती विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण योगदान असून, राष्ट्रवाद आणि देशभक्तीची प्रेरणा याच विद्यापीठातून रूजू झाल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. या वेळी …
Read More »जम्मू-काश्मीर डीडीसी निवडणुकीत भाजपची मुसंडी
श्रीनगर ः वृत्तसंस्थाजम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर यंदा प्रथमच झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकीत भाजप 76 जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. फारूख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वातील गुपकर आघाडीने 100हून अधिक जागांवर विजय मिळवला असला तरी या आघाडीत सात पक्ष समाविष्ट आहेत. 20 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 14 जागांवर अशा पद्धतीने …
Read More »पंतप्रधान मोदी उद्या साधणार शेतकर्यांशी संवाद
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या वेळी ते अयोध्येतील शेतकर्यांना कृषी कायद्यांतील वैशिष्ट्ये समजावून सांगणार आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजप कार्यकर्ते हे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे पत्र घरोघरी पोहचवणार आहेत. अटलजींच्या जयंती दिनी अयोध्येत …
Read More »काश्मीरमध्ये ’कमळ’ उमलले
जिल्हा निवडणुकीत तीन जागांवर विजय श्रीनगर : वृत्तसंस्थाएकवेळ अशी होती की काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाचे अस्तित्वच नव्हते. आज त्याच काश्मीर खोर्यात ’कमळ’ उमलले आहे. भाजपने जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत (डीडीसी) नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसारख्या स्थानिक बलाढ्य पक्षांना धूळ चारत विजयाचे खाते उघडले आहे.भाजपच्या ऐजाज हुसैन यांनी श्रीनगरच्या खोंमोह-2 आणि ऐजाज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper