Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

प. बंगालमधील 11 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

ममतादीदी, ही तर सुरुवात..निवडणुकीपर्यंत पक्षात एकट्याच राहाल : अमित शाह मेदिनीपूर (प. बंगाल) : वृत्तसंस्थापश्चिम बंगालच्या दौर्‍यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस व सीएएममधील 11 आमदारांनी तसेच एका माजी खासदाराने शनिवारी (दि. 19) भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या …

Read More »

आणखी एका नेत्याचा ‘तृणमूल’ला राम राम

ममतांसमोर गळती रोखण्याचे आव्हान कोलकाता ः वृत्तसंस्थापश्चिम बंगालच्या राजकारणात दबदबा असलेले नेते सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा राजीनामा दिला आहे. मागील दोन दिवसांत तीन नेत्यांनी पक्ष सोडल्याने मुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे.ममता यांचे मंत्रिमंडळातील सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी नुकताच …

Read More »

देश दोन वर्षांत टोल नाकामुक्त होणार : गडकरी

नवी दिल्ली : येत्या दोन वर्षांत आपला देश टोल नाकामुक्त होईल. यासाठी सरकारने ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम (जीपीएस)ला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या फाऊंडेशन वीक कार्यक्रमात बोलत होते. रशियन सरकारच्या मदतीने आम्ही …

Read More »

लग्नाचे वचन देऊन ठेवलेले संबंध बलात्कार नाही -न्यायालय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थालग्नाआधी रिलेशनशीपमध्ये अथवा विवाहाचे वचन देऊन अनेक तरुण-तरुण शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. मुलांकडून लग्नाचे वचन पूर्ण झाले नाही तर त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला जातो. या संदर्भात एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लग्नाचे वचन देऊन लैंगिक संबंध ठेवणे हा नेहमीच बलात्कार असतो असे नाही, …

Read More »

रस्ते अडवणे गैर!

शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआपल्या हक्कांसाठी शेतकर्‍यांना आंदोलन करण्याचा हक्क नक्की आहे, मात्र आंदोलनासाठी रस्ते अडवणे गैर असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. स्वतंत्र समिती स्थापन करून चर्चेच्या मार्गानेच यावर तोडगा काढावा, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. मागील 20 दिवसांपासून शेतकरी …

Read More »

विरोधकांकडून शेतकर्‍यांना भडकविले जातेय : पंतप्रधान मोदी

कच्छ (गुजरात) : वृत्तसंस्थागुजरात दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 15) कच्छ येथील कार्यक्रमात कृषी कायद्यांवर भाष्य केले. कृषी कायद्यांवरून शेतकर्‍यांना भडकविण्याचे काम विरोधकांकडून सुरू असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. शेतकर्‍यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.दिल्लीजवळ सध्या शेतकर्‍यांना घाबरवण्याचे कारस्थान सुरू …

Read More »

भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली : भारतात कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांचा दर वाढत आहे. हा दर 95.12 टक्क्यांपर्यंत पोहचला असून, तो जगात सर्वाधिक आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. कोरोनाची अ‍ॅक्टिव्ह प्रकरणेही कमी झाली आहेत. सध्या देशात कोरोनाचे फक्त 3,39,820 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे परिणाम आमच्यासमोर आहेत, …

Read More »

शेतकरी संघटनांचे कृषी कायद्यांना समर्थन

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाएकीकडे हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी सुधारित कृषी कायद्यांबाबत निदर्शने करीत असताना दुसरीकडे विविध राज्यांतील सुमारे 10 शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची सोमवारी (दि. 14) भेट घेतली आणि कृषी कायद्यांना पाठिंबा देत असल्याबाबतची पत्रे तोमर यांच्याकडे सुपूर्द केली.याबद्दल माध्यमांशी बोलताना तोमर …

Read More »

महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवहेलना

कृषी कायद्यांचा विरोध करताना भारताविरोधात घोषणाबाजी वॉशिंग्टन डीसी ः वृत्तसंस्था भारतातील सुधारित कृषी कायद्यांना विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ भारतीय-अमेरिकन शिख युवकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रदर्शन केले. या वेळी तेथील महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवमानना झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी खलिस्तानी झेंडे सापडले असून, वॉशिंग्टनच्या भारतीय दूतावासासमोरच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. …

Read More »

मुली स्वतःहून संबंध ठेवतात आणि ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात

महिला आयोगाच्या अध्यक्षांचे विधान रायपूर ः वृत्तसंस्थामुली, महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्काराच्या तक्रारी करतात, असे बेधडकवक्तव्य छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष किरणमयी नायक यांनी …

Read More »