Breaking News

महत्वाच्या बातम्या

लाडवलीत दिवसाढवळ्या घरफोडी

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील लाडवली गावातील राजमाता जिजाऊनगरमधील करण कदम राहत असलेल्या भाड्याच्या घराचा दरवाजा फोडून शनिवारी (दि. 14) दुपारी अज्ञात इसमाने कपाटातील सोन्याचे दागिने चोरले. गेल्या महिनाभरातील याच परिसरातील ही दुसरी घरफोडीची घटना घडली असून, त्यामुळे रहिवाशांत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. महाड तालुक्यातील लाडवली गावातील राजमाता जिजाऊनगरमधील पराग …

Read More »

लोधिवली ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची चौकशी करणार

गटविकास अधिकार्‍यांचे लेखी पत्र; मारुती तवले यांचे आमरण उपोषण स्थगित खालापूर : प्रतिनिधी लोधिवली ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार प्रकरणाचा चौकशी अहवाल 20 मार्चपर्यंत जिल्हा परिषदेला पाठविण्याचे लेखी आश्वासन खालापूरच्या गटविकास अधिकार्‍यांनी दिल्याने मारुती तवले यांनी आपले आमरण उपोषण शनिवारी (दि. 14) स्थगित केले. खालापूर तालुक्यातील लोधिवली ग्रामपंचायतीमधील विकासकामांत तसेच 31 लाख रुपयांच्या …

Read More »

अपघातांना निमंत्रण देणारे विजेचे खांब

कर्जत तालुक्यातील नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर विजेचे खांब उभे आहेत. त्यांच्या आजूबाजूला रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि मध्ये विजेचा खांब ही समस्याच आहे. यावर महावितरण कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत असून रस्त्याची कोट्यवधी रुपयांची कामे करणारी यंत्रणादेखील वीज वाहून नेणारे खांब हटवत नसल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुक्यात मागील …

Read More »

सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन!

भारतीय राजकारणात उत्तरेकडचे राजकारण, दक्षिणेकडचे राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात विविध प्रकारचे कांगोरे आहेत. उत्तरेकडील राजकारणाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंतच्या नेत्यांनी वेगवेगळे किस्से ऐकविताना सांगितले आहे. काही आदर्श राजकारणी, समाजकारणीसुद्धा उत्तर भारतात पाहायला मिळाले आहेत, पण सांस्कृतिक, सुसंस्कृत राजकारणात महाराष्ट्र …

Read More »

भारतीय महिला क्रिकेट संघाचे भवितव्य उज्ज्वल

युवा (19 वर्षांखालील) वन डे विश्वचषकापाठोपाठ महिला ट्वेन्टी-20 विश्वचषकाने भारताला हुलकावणी दिली. यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला नमवून पाचव्यांदा हा चषक उंचावला. या स्पर्धेत टीम इंडियाने शानदार कामगिरी केली होती, मात्र अंतिम सामन्यात भारतीय महिलांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी संघाला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी त्यांनी …

Read More »

मुंबई-मांडवा रो रो सेवेचे आज उद्घाटन

अलिबाग : प्रतिनिधीकेंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या भाऊचा धक्का (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) ही बहुप्रतीक्षित रो-रो बोट सेवा रविवार (दि. 15)पासून सुरू होत आहे. मांडवा टर्मिनल्स येथे दुपारी 12 वाजता या सेवेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत हा प्रकल्प …

Read More »

सरकारी मालकीच्या एकाही बंदराचे खासगीकरण करण्यात येणार नाही

उरण : प्रतिनिधी, वार्ताहरजेएनपीटी बंदराचेच नव्हे; तर देशभरातील सरकारी मालकीच्या एकाही बंदराचे खासगीकरण करण्यात येणार नाही, तसेच कामगार हिताला बाधा येणार नससल्याची ग्वाही केंद्रीय नौकानयन, रसायने आणि खते राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडविया यांनी शनिवारी (दि. 14) दिली. ते जेएनपीटीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी आले असता, पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. …

Read More »

मांडव्याजवळ समुद्रात प्रवासी बोट बुडाली

अलिबाग : प्रतिनिधीगेट वे ऑफ इंडिया (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) यादरम्यान प्रवासी वाहतूक करणार्‍या अजंठा कंपनीची प्रवासी बोट शनिवारी (दि. 14) सकाळी मांडव्याजवळ समुद्रात बुडाली. या बोटीतून प्रवास करणार्‍या 88 प्रवाशांचे प्राण पोलीस आणि खलाशांच्या तत्परतेमुळे वाचले.  अजंठा कंपनीची बोट 88 प्रवासी घेऊन शनिवारी सकाळी गेट वे ऑफ इंडिया येथून …

Read More »

राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर

मुंबई : प्रतिनिधीकरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे, मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने शिक्षण विभागाला हे पत्रक पाठवले आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आणि गर्दी …

Read More »

कोकणावर अन्याय करू नका!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे सरकारला आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गसंपदा असलेल्या कोकणावर अन्याय करू नका, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केले आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत आमदार ठाकूर यांनी कोकणाची बाजू समर्थपणे मांडत कोणत्याही परिस्थिती कोकणावर अन्याय होऊ नये, अशी रोखठोक भूमिका घेतली आणि कोकणाला …

Read More »