Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अलिबागेतील वादळग्रस्तांना भाजपकडून पत्रेवाटप

अलिबाग : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांच्या डोक्यावरील छप्पर उडाले. अलिबाग तालुक्यातील वादळग्रस्तांना आता भाजपाने मदतीचा हात पुढे केला आहे. भाजपच्या माध्यमातून तालुक्यातील वादळग्रस्तांना छताच्या पत्र्यांचे वाटप करण्यात आले. अलिबाग शहराबरोबरच लगतच्या वरसोली कोळीवाडा , रोहिदास नगर झोपडपट्टी येथील नागरिकांच्या घरावरील पत्रे वक्रीवादळात उडून गेले होते. त्यांना …

Read More »

पेणमधील खारभूमी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे

उधाणाच्या पाण्याने नारवेल ते बेनवले बंधारा वाहून जाण्याची भिती पेण : प्रतिनिधी जागतिक बँकेच्या सहकार्याने पेण तालुक्यातील नारवेल ते बेनवले या 17 किमी लांबीच्या बंधार्‍याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने पावसाळ्यात उधाणाच्या पाण्याने हा बंधारा वाहून जाण्याची भिती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. …

Read More »

खालापुरातील शिवभोजन केंद्र चालकांची थाळी रिकामी

 पाच महिन्यांपासून मोबदला नाही खोपोली : प्रतिनिधी कोरोना काळात गरिबांच्या पोटाला आधार देणारी शिवभोजन थाळीचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र शिवभोजन केंद्र चालकांची अवस्था बिकट झाली आहे. खालापूर तालुक्यातील केंद्र चालकांना गेल्या चार ते पाच महिन्यापासून शासनाकडून मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र कसे चालू ठेवावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला …

Read More »

महाडमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व जनजागृती

महाड : प्रतिनिधी प्राईड इंडिया या संस्थे तर्फे महाड तालुक्यातील पारवाडीवाडी व करजखोल आदिवासीवाडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले. या वेळी स्वच्छता व लसीकरणाबाबत जनजागृती करून स्वच्छता कीटही देण्यात आले. त्यामध्ये साबण, टूथ ब्रश आणि टूथ पेस्ट, मास्क  तसेच खोबरेल तेल इत्यादीचा समावेश आहे. संस्थेचे व्यवस्थापक डॉ. कुलकर्णी …

Read More »

कॅनरा बँकेकडून आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात

कर्जत पोशिरमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कर्जत : बातमीदार कॅनरा बँकेच्या सीएसआर निधीमधून पोशिर (ता. कर्जत) ग्रामपंचायतीमधील सहा वाड्यांतील 450 आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली. बँकेच्या कर्मचार्‍यांनी या वस्तूंचे वाटप केले. लॉकडाऊन काळात अनेकांचे हाल होत आहेत. अनेकांच्या नोकर्‍या गेेल्या. या पार्श्वभूमीवर दुर्गम भागातील आदिवासींच्या मदतीसाठी कॅनरा बँकेच्या मुंबई …

Read More »

विषारी औषध टाकून मासेमारी

जांभूळपाडा अंबा नदीत शेकडो जलचरांचा मृत्यू पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील अंबा नदीत बुधवारी (दि. 26) शेकडो जलचरांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. मासेमारीसाठी अज्ञाताने नदीच्या पाण्यात विषारी औषध टाकल्याने हे जलचर मृत पावले आहेत. मासे पकडण्यासाठी सुधागड तालुक्यात काही ठिकाणी पाण्यात विषारी औषध टाकण्यात येते. त्यामुळे नदीचे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मदतीने भाजप युवामोर्चा पुरवणार रोह्यातील कोविड रुग्णांना मोफत ऑक्सिजन सेवा

धाटाव : प्रतिनिधी  भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष  अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राजमुद्रा फाऊंडेशनचे संस्थापक तथा दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्याकडे कोविड रुग्णांसाठी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर रोहा तालुक्यातील गरजू कोविड रुग्णांना मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन पुरविण्यात येेणार आहे. ही …

Read More »

गडकिल्ले संवर्धन योजनेत कांगोरीगड समाविष्ट व्हावाफ

गड-किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांची जोपासना करण्याऐवजी राजकीय संबंधांचेच संवर्धन करण्यास प्राधान्य दिले जात असल्याने इतिहासाचे साक्षीदार असलेल्या पोलादपूर तालुक्यातील अनेक ऐतिहासिक ठेव्यांकडे गेल्या काही वर्षांपासून दूर्लक्ष झाले आहे. त्यापैकी मंगळगड म्हणजेच कांगोरीगड या किल्ल्याचा समावेश गडकिल्ले संवर्धन योजनेमध्ये करण्याची गरज आहे. महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या सीमेवरील  कांगोरीगड हा किल्ला छत्रपती …

Read More »

अलिबागबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी आदित्य नारायणचा माफीनामा

मुंबई ः प्रतिनिधीइंडियन आयडल-12 या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायणने नुकताच प्रसारित झालेल्या भागामध्ये अलिबागवरून वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याच्यावर टीका सुरू झाली होती. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेने उडी घेतल्याने या वादाला गंभीर वळण लागले होते. एकूण या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आदित्य नारायण याने सोशल मीडियावरून माफीनामा प्रसिद्ध केला …

Read More »

…तर कर्जत तालुका कोरोना मुक्त होऊ शकतो

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या सुरूवातीला वाढती रुग्णसंख्या, रुग्णांचे मृत्यू या बरोबरच रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण या सार्‍यांचे पहिल्या लाटेच्या तुलनेत विक्रमच होते. मात्र लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या आवरता आली. ती एकदम पाच पट कमी झाली. या सार्‍याला शासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी आणि सुज्ञ कर्जतकरांची साथ लाभली. अजून …

Read More »