Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

भांदरे नदीवरील पूल कोसळला; काळ प्रकल्प अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

माणगाव : प्रतिनिधी काळ प्रकल्पाचा भांदरे चौकीजवळील व नदीवरील पूल कोसळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून परिसरातील मळेगाव आदिवासीवाडी, हातकेळी, मुगवली, कविळवहाळ व भांदरे या गावांचा संपर्क तुटला असून, ग्रामस्थांचा शेतावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पूल तुटल्याची माहिती सरपंचांनी सर्व संबंधित विभागांना दिली असूनही दोन महिने होत आले तरी काळ प्रकल्पाचे …

Read More »

खोपोलीत भाजपतर्फे मोफत चष्मेवाटप

खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष खोपोली शहर मंडळाच्या वतीने सेवा सप्ताहाच्या निमित्ताने 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता मोहीम,प्लास्टिक मुक्ती, आदी कार्यक्रम झाले. विविध कार्यक्रमापैकी सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत नेत्रतपासणी करण्यात आली. बुधवारी गरजुंना चष्मे मोफत वाटपाचा कार्यक्रम खोपोली शहर मध्यवर्ती कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पार पडला. 75 नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून …

Read More »

पनवेलमध्ये 319 नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू; 276 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 7) कोरोनाचे 319 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 276 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 273 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर 222 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …

Read More »

रायगड जिल्ह्यात 430 नवे पॉझिटिव्ह; 13 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये घट होत असून, बुधवारी (दि. 7) नव्या 430 रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 393 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 273 व ग्रामीण 46) तालुक्यातील 319, अलिबाग 27, रोहा 22, महाड 14, माणगाव …

Read More »

आयपीएल सट्टा लावणारे रॅकेट कर्जतमध्ये उद्ध्वस्त

अलिबाग : सध्या संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या सामन्यांसाठी सट्टा लावणारे एक मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) रायगडने उद्धवस्त केले आहे. यात वेगवेगळे बुकी व त्यांचे मध्यस्थ अशा एकूण 11 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 16 मोबाइल फोन जप्त करण्यात …

Read More »

शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती महत्त्वाची

डॉ. रवींद्र मर्दाने यांचे प्रतिपादन कर्जत ः बातमीदार कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता भाताऐवजी भात-भाजीपाला, भात-कडधान्य ही पीकपद्धती स्वीकारून त्यास यांत्रिकीकरण व कृषिपूरक उद्योगधंद्यांची जोड द्यावी. शेतीतून शाश्वत उत्पन्नवाढीसाठी एकात्मिक शेती पद्धती अवलंबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. दापोलीतील डॉ. …

Read More »

एसटी कर्मचारी आर्थिक संकटात

महाड आगारातील कर्मचार्‍यांचा तीन महिन्याचा पगार रखडला महाड : प्रतिनिधी कोरोना संसर्गामुळे एप्रिल महिन्यापासून बंद असणारी ग्रामिण भागातील जीवनवाहिनी एसटी गेल्या महिनाभरापासून हळू हळू धावू लागली आहे. मात्र प्रवाशांकडून मिळणार्‍या अल्प प्रतिसादामुळे पुरेसे उत्पन्न नसल्याने आधीच तोट्यात असणार्‍या राज्य परिवहन महामंडळाचा तोटा वाढत आहे अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांच्या पगारासाठी लागणारा निधी …

Read More »

श्रीवर्धनमध्ये महावितरणचा सावळागोंधळ

श्रीवर्धन ः प्रतिनिधी  संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात महावितरणचा वीजपुरवठ्याबाबत सावळागोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसांपासून दर दोन-तीन दिवसांनी वीजपुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात येतो. लॉकडाऊन तसेच निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळानंतर श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा तब्बल 28 दिवसांनंतर, तर ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरू …

Read More »

तणावापासून मिळवा मुक्ती

आरोग्य प्रहर तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा, संताप वाढतो. झोप न येणे, डोकेदुखी, मायग्रेन, नैराश्य, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, अ‍ॅसिडिटी, अल्सर, केस झडणे आदी व्याधी मागे लागतात. तणाव …

Read More »

निसर्ग चक्रीवादळातील नुकसानभरपाईस विलंब

चौल व नागाव ग्रामपंचायतीचे तहसिलदारांना निवेदन रेवदंडा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचे केंद्र ठरलेल्या चौल व नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्तांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी या ग्रामपंचायतींच्या वतीने अलिबाग तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच निखिल मयेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागाव ग्रामपंचायत हद्दीत निसर्ग चक्रीवादळात मोठे …

Read More »