Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

‘अग्निशमन‘चे लोकार्पण रखडले

एक महिन्यानंतरही माणगाव नगरपंचायतीला मुहूर्त मिळेना माणगाव : प्रतिनिधी गेले महिने प्रतीक्षेत असलेले अत्याधुनिक अग्निशमन वाहन माणगावात मोठ्या दिमाखात दाखल झाले आहे. मात्र तब्बल एक महिना लोटला तरीही या वाहनाच्या लोकार्पणाला नगरपंचायतीला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे हे अग्निशमन वाहन अजूनही लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. माणगाव नगरपंचायतीला दोन वर्षांपूर्वी  अत्याधुनिक सोयींनीयुक्त सुसज्ज …

Read More »

महाडमध्ये गाळे रिकामे, दुकाने थाटली रस्त्यावर; वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास

महाड : प्रतिनिधी योग्य नियोजनाअभावी महाड बाजारपेठेत होणार्‍या वाहतूक कोंडीने नागरिक आणि येणार्‍या पर्यटकांना त्रास होत आहे. शहरातील दुकानदार तसेच भाजी व फळ विक्रेते आपला माल नाल्यावर आणि त्याच्याही पुढे रस्त्यावर आणून ठेवत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होवून पादचार्‍यांनाही त्रास होताना दिसत आहे. महाड शहराला सर्वात मोठी बाजारपेठ लाभली आहे. तालुक्यासह …

Read More »

चित्राताई वाघ रविवारी खोपोलीत

खोपोली : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ रविवारी (दि. 27) खोपोली येत आहेत, त्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 21) सायंकाळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्वीनीताई पाटील यांच्या निवासस्थानी नियोजन बैठक घेण्यात आली. भाजप खोपोली मंडल प्रभारी सुनील घरत यांनी नियोजन बैठकीत …

Read More »

पेण गणपतीवाडी येथील मुख्य रस्त्याचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील गणपतीवाडी गावातील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण तालुक्यात वेगवेगळी विकासकामे केली जात आहेत. गावातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा अशा योजना राबवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत. ग्रामपंचायत सदस्य अजित साळवी यांच्या पुढाकाराने …

Read More »

ग्रामीण भागात निवडणुकीचा धुरळा

-समाधान पाटील, पनवेल राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022मध्ये मुदत संपणार्‍या 7751 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 540 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ऐन थंडीत तापू लागले आहे. राज्यात सत्तापरिवर्तनानंतर पहिल्या टप्प्यात 7600 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. आता दुसर्‍या टप्प्यात 7751 …

Read More »

पारा घसरल्याने ग्रामीण भागात पेटू लागल्या शेकोट्या

माणगाव ः प्रतिनिधी पावसाळा संपता संपता वेध लागतात ते हिवाळ्याचे आणि गुलाबी थंडीचे. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी सकाळी पडणारे दाढ धुके आणि बोचणारी थंडी सर्वांना हवीहवीशी वाटते. या थंडी बरोबरच उबदार कपडे आणि चौकातून, घराबाहेर, घरांच्या कोपर्‍यांवर उब देण्यासाठी केलेल्या शेकोट्या आणि त्यांच्या भोवती गोलाकार बसून शेकोटीचा आनंद घेणारे नागरिक गेल्या …

Read More »

उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ‘गेल’ प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तूर्त स्थगित

रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया लि. पेट्रोकॉम्प्लेक्स कंपनीतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेच्या वतीने 21 नोव्हेबर रोजी पुकारण्यात आलेले प्रकल्पग्रस्तांचे गेट बंद आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. भाजप जिल्हा अध्यक्ष …

Read More »

‘गेल’ प्रकल्पग्रस्तांबाबत पालकमंत्री सकारात्मक

संयुक्त बैठक बोलाविणार; आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र रेवदंडा : प्रतिनिधी विविध मागण्यांसह गेल इंडिया कंपनी व्यवस्थापनाकडून होणार्‍या अन्यायाविरोधात उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा देण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच नाईक कुणे येथील गणपती मंदिराच्या सभागृहात …

Read More »

माथेरानच्या गव्हाणकर शाळेची क्रीडा स्पर्धेत चमक

माथेरान : रामप्रहर वृत्त कर्जत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत गौळवाडी येथे आयोजित धावण्याच्या स्पर्धेत माथेरानमधील प्राचार्य गव्हाणकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी धावण्याच्या शर्यतीत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. 17 वर्षाखालील गटात हर्षाली संतोष ढेबे पहिली, तर 14 वर्षाखालील गटात प्राजक्ता प्रशांत कदम दुसरी आली. दोघीही अलिबाग येथे होणार्‍या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाल्या आहेत. केंद्रप्रमुख …

Read More »

पाली स्मशानभूमीत लाकडांसाठी वणवण

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड पालीतील स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली असून या स्मशानभूमीत सरणासाठी लाकडे नाहीत.  त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना लाकडांसाठी वणवण करावी लागत आहे. काहीवेळा नागोठणे किंवा रोहा येथून लाकडे आणून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. पाली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाले, मात्र येथील नागरी समस्या ‘जैसे थे’ आहेत. येथील एका व्यक्तीचे …

Read More »