Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पोलादपूरच्या सावित्री नदीत रिव्हर राफ्टिंगची ट्रायल; नरवीर रेस्क्यू टीमचा उपक्रम

पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील रिव्हर राफ्टिंग बंद झाल्यानंतर नरवीर रेस्क्यू टिम तर्फे मंगळवारी (दि. 23) पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरणापासून लोहारे-तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टिंगची चाचणी घेण्यात आली. या वेळी कोलाडचे महेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर रेस्क्यू आणि अ‍ॅडव्हेंचरचे अध्यक्ष रामदास कळंबे, जयेश जगताप, विक्रम भिलारे, दीपक उतेकर, सुमित …

Read More »

माणगावमध्ये श्री सांप्रदायाने राबविले स्वच्छता अभियान

माणगाव : रामप्रहर वृत्त जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व परमपुज्य कानिफनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने माणगाव तालुका सेवाकेंद्राच्या वतीने सामाजिक उपक्रम सेवेअंतर्गत जुने माणगाव येथील श्री स्वयंभू  संगमेश्वर  देवस्थान परिसरमध्ये  नुकताच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. श्री स्वामींच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून  सकाळी स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. या अभियानाकरिता  …

Read More »

शाळेत मीटर नाही, वीज बिल मात्र भरमसाठ

महावितरणच्या पाली विभागाचा भोंगळ कारभार नागोठणे : प्रतिनिधी महावितरणच्या पाली विभागाअंतर्गत येणार्‍या बाहेरशिव (ता. रोहा) येथील प्राथमिक शाळेत वीज मीटर नाही, मात्र विजेचे बील येत असल्याने महावितरणच्या पाली विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.  रायगड जिल्हा परिषद शाळा रोहा तालुक्यातील बाहेरशिव येथील रायगड जिल्हा परिषद शाळा कोरोना कालावधीत एप्रिल 2021पासून …

Read More »

दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केंद्र सरकारने केले -केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल

पेण : प्रतिनिधी विविध विकास योजना राबवून समाजातील वंचित, दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपच्या लोकसभा प्रवासातून ग्रामस्थ संवाद साधून त्या त्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अन्नप्रक्रिया, उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून विविध योजनांचा आढावा

अलिबाग ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया, उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24) येथे केले. अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहामध्ये आयोजित शासकीय …

Read More »

खालापुरातील अन्य प्रदूषणकारी कारखान्यांचे काय?

प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका गुलदस्त्यात खोपोली : प्रतिनिधी  जलप्रदूषण केल्यामुळे खालापूर तालुक्यातील ‘उत्तम स्टील‘च्या व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाना बंद करण्याची नोटीस दिली आहे. ही नोटीस स्वागतार्ह असली तरी या कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दोन वर्षाचा कालावधी का लागला, याचे उत्तर मिळणे अपेक्षित असून, भू, जल, वायू प्रदुषण करणार्‍या  तालुक्यातील …

Read More »

पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईनचा तुटवडा

महाड : प्रतिनिधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसांपासून काही औषधे आणि सलाईनचा तुटवडा भासत आहे. यामुळे परिसरातील रुग्णांना पैसे खर्च करून खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधपुरवठा विभागाकडून अल्प प्रमाणात सलाईनपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. …

Read More »

संततधार पावसामुळे बाजारात शुकशुकाट

कर्जत : बातमीदार गणेशोत्सव तोंडावर आला असताना कर्जत तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी होणार्‍या खरेदीवर विरजण पडले आहे. पावसाच्या सततच्या रिपरिपीमुळे बाजारात शुकशुकाट दिसत असून, व्यापारीदेखील संकटात आले आहेत.  गणेशोत्सवाची तयारी किमान 15दिवस आधी सुरु होते. यंदा शासनाने सण, उत्सव साजरे करण्यावरील निर्बंध हटवले आहेत. …

Read More »

तरुणांनो आपले लक्ष्य मोठे ठेवा, जगावर राज्य कराल!

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचे प्रतिपादन रोहे : प्रतिनिधी तरुणांनी भविष्याचा विचार केला पाहिजे. भविष्यातील   आव्हाने पेलण्यासाठी केवळ नोकरीवर अवलंबून न राहाता आपले लक्ष्य मोठे ठेवल्यास तुम्ही जगावर राज्य कराल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी मंगळवारी (दि. 23) रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात केले. भारतीय जनता पक्षाच्या रायगड लोकसभा …

Read More »

वाहून जाणार्‍या पाण्याचे व्यवस्थापन करणार

केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचे प्रतिपादन अलिबाग : प्रतिनिधी जलजीवन मिशन योजनेसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला भरपूर निधी दिला आहे. त्यापैकी सात हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यातून पाणीपुरवठा योजना पूर्ण करता येतील. त्याचप्रमाणे भविष्याचा विचार करून वाहून जाणार्‍या पाण्याच्या व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग व …

Read More »