मुंबई : प्रतिनिधी भारतीय महिलांनी पहिला एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 66 धावांनी दमदार विजय मिळवला. भारताच्या या विजयाची शिल्पकार ठरली ती फिरकीपटू एकता बिश्त. एकताने या सामन्यात चार बळी मिळवत इंग्लंडचे कंबरडे मोडले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 202 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला 136 धावाच करता आल्या. …
Read More »आम्ही सरकारसोबत : कोहली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये, अशी मागणी होत आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर यांनी याबाबत आपली मते मांडल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानेही मौन सोडले आहे. ‘पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत केंद्र सरकार जो निर्णय …
Read More »अपूर्वीचा विश्वविक्रमी ‘सुवर्ण’वेध!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंडेलाने विश्वविक्रमी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 10 मी. एअर रायफल प्रकारात अपूर्वीने भारताला विश्वचषक स्पर्धेत पदकाची कमाई करून देत धडाकेबाज सुरुवात करून दिली आहे. या स्पर्धेत भारताच्या अंजुम मुद्गील आणि एल्वेनिल वेल्वेरियन या खेळाडूही उतरल्या होत्या, मात्र पात्रता फेरीचा अडथळा दूर …
Read More »ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-20साठी भारत सज्ज
विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला ट्वेन्टी-20 सामना रविवारी (दि. 25) विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून लोकेश राहुल भारतीय संघात पुनरागमन करणार असून, रिषभ पंतलाही आघाडीला खेळण्याची संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणार्या भारतीय संघाला ट्वेन्टी-20 मालिकेत 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. पावसामुळे …
Read More »भारत-पाक सामन्याबाबतचा निर्णय सरकारशी चर्चेनंतरच : बीसीसीआय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत सामना खेळू नये म्हणून दबाव वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासक समितीने याबाबतचा चेंडू सरकारकडे टोलवला आहे. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसोबत सामना खेळावा अथवा खेळू नये, याचा निर्णय सरकारशी चर्चा केल्यानंतरच होईल, असे प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय …
Read More »रायगड पोलीस संघ उपांत्य फेरीत
मुंबई : प्रतिनिधी शिवनेरी सेवा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या स्व. मोहन नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटात एअर इंडिया, महिंद्रा, देना बँक या मुंबईच्या संघांबरोबर रायगडच्या पोलीस संघाने; तर महिला गटात महात्मा गांधी, संघर्ष या उपनगरच्या संघांबरोबर मुंबईचा शिवशक्ती आणि खेड-रत्नागिरीचा अनिकेत स्पोर्ट्स यांनी उपांत्य फेरीत …
Read More »पाकविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा भारताला पूर्णपणे अधिकार : अख्तर
इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहत भारताला पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा पूर्णपणे अधिकार असल्याचे म्हटले आहे. भारतीय सैन्यावर हल्ला झाला असून, त्यामध्ये त्यांच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यात वावगे काहीच नाही, …
Read More »‘भारताला विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मे महिन्यात इंग्लंडमध्ये होणार्या विश्वचषक स्पर्धेत भारताला विजयी होण्याची चांगली संधी असल्याचे म्हटले आहे. तो नोएडा येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात बोलत होता. गांगुली म्हणाला, गेल्या सहा-सात महिन्यांच्या काळात भारतीय संघ चांगला खेळ करतोय. हे पाहता भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा …
Read More »पाकविरुद्ध खेळण्याचा निर्णय बीसीसीआय घेईल : चहल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा अतिरेकी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये, अशी मागणी होऊ लागली होती, मात्र पाकविरुद्ध क्रिकेट सामना खेळायचा की नाही याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घ्यायचा आहे, असे वक्तव्य फिरकीपटू यजुवेंद्र चहलने केले आहे. पाकविरुद्ध …
Read More »पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारल्याने आयओसीची भारतावर कारवाई
पुणे : प्रतिनिधी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. विविध स्तरांवर पाकिस्तानचा निषेध होत असताना नेमबाजी विश्वचषकासाठी भारतात येणार्या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णयही घेण्यात आला. या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओसी) भारताला 14 कोट्यांसह नेमबाजी विश्वचषक आयोजित करण्याची परवानगी दिली आहे, मात्र भविष्यात कुठल्याही ऑलिम्पिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper