पोलादपूर तालुक्यातील अनेक प्रश्न लालफितीमध्ये अडकले असून अनेक प्रश्नांपासून प्रशासनामधील अधिकार्यांनी जनतेची फसवणूक केली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच विभागांतील तालुक्याच्या सर्वांगिण र्हासास कारणीभूत ठरत असल्याने तातडीने बदल्या करण्यासह पोलादपूर तालुक्यातील नोकरी कशी करावी अथवा कशी करू नये, याबाबतचे प्रशिक्षण घेऊनच नेमणुका होण्याची गरज आहे. पोलादपूर तालुक्यात शिक्षण …
Read More »वसंतकाले संप्राप्ते
ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे आणि अजितदादा पवार यांचे राजकीयदृष्ट्या कधीही फारसे पटले नाही हे एकंदरीत दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी विशेष जवळीक असणार्या संजय राऊत यांनी अजितदादांबद्दल मात्र उलटसुलट विधाने करणे सोडलेले नाही. त्याचा स्फोट मंगळवारी अजितदादा पवार यांच्या एका पत्रकार परिषदेत झाला. तुम्ही तुमच्या पक्षाचे …
Read More »पेणमधील सात ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन
जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींची आयएसओकडे वाटचाल अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील सात ग्रामपंचायतींना एकाचवेळी आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्या हस्ते संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पेण तालुक्यातील …
Read More »पर्यटक जंजिरा किल्ला जेट्टीच्या प्रतिक्षेत
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीत असणारा सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर देश विदेशातून येणार्या पर्यटकांना किल्ल्यावर चढता व उतरताना सहज सोपे जावे यासाठी केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत सदरील जेट्टी बांधण्यासाठी 93.56 कोटी रुपये मंजूर झाले असून याची निविदा प्रक्रिया सुद्धा करण्यात आली असून सागरी मंडळाने या कामासाठी निविदा सुद्धा जारी …
Read More »12 धरण क्षेत्रात अद्याप 50 टक्के पेक्षा जास्त पाणीसाठी
रायगड जिल्ह्यातील स्थिती : रानीवली धरणात कमी साठा तर उसरण धरण क्षेत्रात सर्वात जास्त पाणीसाठा रोहे : प्रतिनिधी यावर्षी उन्हाळ्यात सातत्याने पारा चढत आहे. याचा परिणाम रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यावर होत आहे. मागील पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्याने अद्याप एप्रिलच्या तिसर्या आठवड्यापर्यंत सहा धरणांचा अपवाद वगळता उर्वरित 22 धरण क्षेत्रात …
Read More »वावड्यांचे विश्व
सध्याच्या काळात राजकीय वर्तुळातून इतक्या उलटसुलट चर्चा घडताना दिसत आहेत की त्यातली बातमी कुठली आणि वावडी कुठली हे ओळखता येणे कठीण व्हावे. ज्यांच्या मतांसाठी एवढ्या राजकीय घडामोडी घडत असतात त्या मतदारांना कसलाही थांगपत्ता लागत नाही. सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले असून त्यातून वावड्यांचा कचराच अधिक बाहेर येऊ लागला आहे. …
Read More »‘अवकाळी’, गारपिटीचा फटका
जागतिक हवामानात सतत बदल होत आहेत, महाराष्ट्राने खरिपामध्ये 30-70 टक्के जास्त पाऊस पहिला. नंतर रब्बी हंगामात वादळासह अवकाळी पाऊस ही अनुभवला. आता तापमानात सर्वसाधारण वाढ होणार हे मान्य केले गेले आहे. त्यामुळे यापुढे हवामान बदल गृहीत धरून पीक पद्धती, कृषी संशोधन आणि तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. महिनाभरात सतत …
Read More »तापमानात वाढ झाल्याने काळजी घेण्याचे आवाहन
पनवेल ः रामप्रहर वृत्त कोकण विभागातील तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या ताटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक घराबाहेर पडू नये. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. उष्माघात …
Read More »पद्मश्री डॉ. आप्पासाहेबांच्या कर्तुत्वाचा, प्रेमाचा सन्मान- ना. अमित शाह
लाखो श्रीसदस्यांच्या साक्षीने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान पनवेल, नवी मुंबई ः प्रतिनिधी, बातमीदार कोणत्याही प्रसिद्धीची आकांक्षा नसणारे, अशा आप्पासाहेबांच्या कौतुकासाठी आलेली ही प्रचंड गर्दी मी आयुष्यात कधीही पाहिलेली नाही. असा भक्तिभाव, केवळ त्याग, समर्पण यातूनच निर्माण होतो, हे आप्पासाहेबांचे गुणवैशिष्ट्य आहे. हा त्यांच्या कर्तुत्वाचा, प्रेमाचा सन्मान आहे, …
Read More »महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी नियोजन; पनवेल मनपा हद्दीतील शाळांना आज सुटी
कळंबोली : बातमीदार ज्येष्ठ निरूपणकार श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने रविवारी (दि. 16) खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून शुक्रवारपासूनच श्री सदस्य पनवेलमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे शनिवारी पनवेल महापालिका क्षेत्रातील खासगी व शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना गर्दीचा किंवा वाहतूक कोंडीचा सामना करावा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper