कर्जत : बातमीदार व्यापार उदीम आणि आपल्या नातेवाईकांकडे कर्जत तालुक्यातील प्रवाशी मोठ्या संख्येने पुणे भागात जात असतात. मात्र पुण्याकडे जाण्यासाठी असलेल्या अपुर्या व्यवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असतात. त्यामुळे कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने रेल्वे मंत्रालयाला दिलेल्या निवेदनात पनवेल मार्गे जाणार्या व येणार्या सर्व मेल, एक्स्प्रेस गाड्यां तसेच पुणे रेल्वे स्थानकातून सुटणार्या …
Read More »तालुक्यातील 17 गावांचा म्हसळा पोलीस ठाण्यात समावेश करण्याची मागणी
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील 82 पैकी 17 महसुली गावे दिघी सागरी, गोरेगाव व श्रीवर्धन या तीन पोलीस ठाण्याला जोडली आहेत. त्यामुळे तेथील ग्रामस्थांच्या ते अडचणीचे होत आहे. म्हसळा तालुक्यातील तुरूंबाडी, रोहीणी, आडी ठाकूर, गोंडधर, काळसुरी, खानलोशी ही 4164 लोकसंख्येची सहा गावे दिघी सागरी पोलीस ठाण्याला, आंबेत, तोराडी, लिपणी, वावे, महमद …
Read More »सहा आसनी रिक्षाचालकांना न्याय देणार रविशेठ पाटील यांचे आश्वासन, थांब्याबाबत चर्चा
पेण : प्रतिनिधी आरटीओ अधिकारी तसेच पेण नगर परिषद अध्यक्षा व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेवून, मिनिडोअरसाठी एसटी स्टँडसमोर विक्रम अधिकृत थांबा दिला जाईल, अशी ग्वाही माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी विक्रम मिनिडोअर संघटनेच्या प्रतिनिधींना दिली. शहरांतून ग्रामीण भागात सेवा देणार्या विक्रम मिनीडोअरसाठी एसटी स्टॅडसमोर अधिकृत थांबा द्यावा, अशी मागणी …
Read More »राज्यात तापमानाचा पारा वाढला; यवतमाळात सर्वाधिक तापमान
पुणे ः प्रतिनिधी राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता वातावरणही तापू लागले आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान यवतमाळ येथे 39 अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे 14 अंश सेल्सिअस नोंदविले …
Read More »काळवीट शिकार प्रकरण; सैफ, तब्बू, सोनाली बेंद्रेला हायकोर्टाची नोटीस
जोधपूर ः वृत्तसंस्था राजस्थानमधील काळवीट शिकारप्रकरणी निर्दोष सुटलेले बॉलिवूड कलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम कोठारी, तब्बू आणि दुश्यंत सिंह या पाच जणांना जोधपूर हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. यापूर्वी जोधपूरच्या सत्र न्यायालयाने या पाच जणांना दोषमुक्त केले होते, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राजस्थान सरकारने जोधपूर हायकोर्टात धाव घेतली आहे. …
Read More »इथिओपिया दृर्घटनेतील मृतांत भारतीय महिला अधिकारी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इथिओपिअन एअर लाइन्सच्या विमान अपघातात बळी पडलेल्या भारतीयांची संख्या चारवरून सहा इतकी झाली आहे. हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. दरम्यान, या मृतांमध्ये पर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही समावेश असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाहून नैरोबीला जाणार्या …
Read More »‘मी खोटी आश्वासने देत नाही’
नागपूर ः प्रतिनिधी मी खोटी आश्वासने देत नाही. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसारखी मूल्येच मोठ्या वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राजकारण हे सामाजिक-आर्थिक सुधारणांचे माध्यम असल्याचे ते म्हणाले. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. राजकारण हे एक प्रतिस्पर्धी क्षेत्र आहे. जिथे लोकांच्या आकांक्षेनुसार काम …
Read More »रमजानमध्ये शुक्रवारी मतदान नाही ः निवडणूक आयोग
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता धार्मिक वातावरणही तापू लागले आहे. राज्यात चार टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. 11 ते 29 एप्रिल या काळात मतदान होणार आहे, परंतु रमजानमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्याच्या निर्णयाला अनेक पक्षांनी विरोध केला असतानाच निवडणूक …
Read More »निर्व्यसनी रहा आणि यशस्वी व्हा -शिक्षणतज्ञ विद्या वाडकर
पनवेल : प्रतिनिधी अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि हार्मोनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 9) पनवेल तालुक्यातील सांगुर्ली येथे व्यसनमुक्तीपर उपक्रम घेण्यात आला. या वेळी दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत नभी घेऊ उत्तुंग भरारी हा कार्यक्रमही झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षणतज्ञ तथा चित्रपट अभिनेत्री विद्या वाडकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात, निर्व्यसनी …
Read More »‘द्रोणागिरी’वर विजय दिन
उरण : बातमीदार उरण तालुक्यात समुद्रकिनारी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या द्रोणागिरी किल्ल्याचा 280वा विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 10 मार्च 1739 रोजी सरखेल मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून स्वराज्यात घेतला होता. उरण तालुक्याच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार असलेला द्रोणागिरी किल्ला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper