माणगाव : प्रतिनिधी तालुक्यात बुधवारी (दि. 17) पहाटेच्या सुमारास मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याने नागरिकांची पुरती तारांबळ उडाली. माणगावात बुधवारी पहाटे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. त्यानंतर पुन्हा दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले. या काळात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुपारी चार वाजल्यापासून पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे वातावरणात थोडा गारवा जाणवत …
Read More »एसटी संपामुळे श्रीवर्धन बाजारपेठेत मंदी; व्यापारी हवालदिल
श्रीवर्धन : प्रतिनिधी एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे श्रीवर्धन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मंदी पाहायला मिळत आहे. त्यामुळे व्यापारी हवालदिल झाले असून, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे राज्यातील शाळा जवळ जवळ दोन वर्षे बंद होत्या. नुकताच शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात झाली होती, परंतु एसटी कर्मचार्यांनी संप पुकारल्यामुळे खेडेगावातून शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांचे …
Read More »खोपोलीत शांतता समिती बैठक
खोपोली : प्रतिनिधी त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही ठिकाणी दंगली झाल्या, या पार्श्वभूमीवर खोपोली शहरातील जनतेने शांतता राखावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी मंगळवारी (दि. 16) येथे केले. खोपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पवार उपस्थितांना मार्गदर्शन …
Read More »माथेरानच्या घोडेवाल्यांसाठी रस्त्यावर बसविलेले पेव्हरब्लॉक काढले
कर्जत : बातमीदार माथेरानकडे येणार्या रस्त्याला क्ले पेव्हरब्लॉक बसविण्यात आले होते, मात्र त्यावरून पाय घसरून घोडे पर्यटकांसह पडण्याच्या घटना घडल्याने त्या रस्त्याच्या उतारावरील क्ले पेव्हर काढले. त्यामुळे माथेरानमधील घोडे पूर्वीप्रमाणे लाल मातीतून चालणार आहेत. माथेरानमध्ये एमएमआरडीएकडून पर्यावरणपूरक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दस्तुरीपासून माथेरानकडे येणार्या रस्त्यावर …
Read More »एसटीचा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर; अनेक किलोमीटरची पायपीट
पाली : प्रतिनिधी कोरोना काळात शाळा, महाविद्यालये बंद होती, ऑक्टोबर महिन्यापासून पाचवीपासून पुढील इयत्तांच्या शाळा नियमित सुरू झाल्या खर्या, मात्र एसटी संपाने विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला ब्रेक लागला आहे. शासनाच्या सेवेत समाविष्ट करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे …
Read More »खालापुरातील भात खरेदी केंद्र बंद; भाजपचा आंदोलनाचा इशारा
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील भात खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसून, प्रशासनदेखील त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात दोन दिवसांत हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने बुधवारी (दि. 17) खालापूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. साधारणपणे शासनाचे भात खरेदी केंद्र 1 ऑक्टोबरला …
Read More »अलिबागच्या लायन्स हेल्थ फाउंडेशनचा नेत्ररोगाविरुद्ध लढा; सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे सोगावमध्ये भूमिपूजन
अलिबाग : प्रतिनिधी लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबागने मोतीबिंदू आणि नेत्ररोगांविरुद्ध जो लढा उभारला आहे, तो अभूतपर्व आहे. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपर्यातील 65 हजार लोकांची नेत्रतपासणी, सहा हजार नेत्रशस्त्रक्रिया, त्यातील 4500 मोफत नेत्रशस्त्रक्रिया, महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजना हा लायन्स हेल्थ फाउंडेशनचा चार वर्षांतील आलेख कौतुकास्पद आणि अभिमानास्पद …
Read More »क्षयरोग शोधमोहिमेस सहकार्य करावे; जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांचे आवाहन
अलिबाग : जिमाका क्षयरोग्यांना शोधण्यासाठी आरोग्य विभागाने रायगड जिल्ह्यात विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेतली असून, नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांनी जिल्हा क्षयरोग कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. रायगड जिल्ह्यात जानेवारी ते 31 ऑक्टोबर 2021 अखेर दोन हजार 794 क्षयरुग्ण …
Read More »रायवाडीत रास्ता रोको आंदोलन; अलिबाग-मुरूड रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग व मुरूड मुख्य रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी या रस्त्यावरील रायवाडी येथे रास्ता रोकोचे आंदोलन केले. जागोजागी खड्डे पडून अलिबाग-मुरूड या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, यासाठी दिलिप जोग यांनी 12 एप्रिल 2021 रोजी रास्ता रोको आंदोलनाचा …
Read More »अफझलखानाची कबर आणि वाद
रायगड जिल्ह्याशी थेट संपर्क असलेल्या प्रतापगडाची 58 एकर जमीन सातारा संस्थानच्या नावे असल्याने संपूर्ण प्रतापगड परिसर त्या जिल्ह्याशी संलग्न आहे, मात्र यंदाच्या अतिवृष्टी आणि भूस्खलन काळात प्रतापगडाच्या मदतीला रायगड जिल्ह्याचे प्रशासन धावून गेले. प्रतापगडावरील मशाल मोर्चा असो अथवा प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरीची नासधूस केल्याची घटना, या सर्व घटनांमध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper