Ramprahar News Team

विनाहेल्मेट 8488 दुचाकीस्वारांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई वाहतूक शाखेने विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍या चालकावर तसेच विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणार्‍या व्यक्तींविरोधात विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार वाहतूक शाखेने 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विशेष मोहिमेद्वारे एकूण 8488 विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्‍या चालकावर तसेच विनाहेल्मेट …

Read More »

नवी मुंबईत दैनंदिन रुग्णांचेे प्रमाण घटले; कोरोनाबाधितांच्या दुपटीचा कालावधीही वाढल्याने दिलासा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांचे प्रमाण सध्या कमी झाल्याचे निदर्शनास येत असून रुग्णदुपटीचा कालावधी 3196 दिवसांइतका झालेला आहे. तथापि कोरोना अजून पूर्ण संपलेला नाही आणि तिसर्‍या लाटेचा धोका अजून टळलेला नाही हे लक्षात घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार अगदी दिवाळीच्या चार दिवसांतही …

Read More »

उरलीसुरली अब्रू

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचा पुरता पर्दाफाश झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे मंगळवारी महाविकास आघाडीच्या खुर्चीखाली जबरदस्त बॉम्ब फोडला. त्याने सत्ताधारी आघाडीची उरलीसुरली अब्रूदेखील धुळीला मिळाली आहे. गेले काही महिने नवाब मलिक यांनी विविध आघाड्यांवर खरीखोटी सरबत्ती सुरू ठेवली होती. आर्यन …

Read More »

वाकण-खोपोली राज्य महामार्ग जमीन अधिग्रहण; बाधित शेतकर्‍यांची उच्च न्यायालयात धाव, जनहित याचिका दाखल

पाली : प्रतिनिधी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गासाठी करण्यात आलेल्या जमीन अधिग्रहणाबाबत बाधित शेतकर्‍यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका (21600/2021) दाखल केली आहे. भूसंपादन प्रक्रियेत बाधित शेतकर्‍यांना योग्य तो मोबदला व जलद नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्ग बेकायदा जमीन अधिग्रहण संदर्भात बाधित शेतकरी सचिन गजानन …

Read More »

महाडमधील शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी; अन्यथा धरणे आंदोलन, किसान क्रांती संघटनेचा इशारा

महाड : प्रतिनिधी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फळ पीक आणि भात पिकाचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना विम्याची रक्कम आणि शासकीय नुकसान भरपाई येत्या चार दिवसात मिळाली नाही तर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष तुकाराम देशमुख यांनी  पत्रकार परिषदेत दिला. या वेळी …

Read More »

पालीत प्रवाशांची गैरसोय व खोळंबा

पाली : रामप्रहर वृत्त एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे दिवाळीची सुट्टी संपून निघालेले प्रवाशी व चाकरमान्यांचे पुरते हाल होत आहेत. एसटी बंद असल्याने सुधागडातील प्रवाशांना मंगळवारी (दि. 9) खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. मात्र अनेक खाजगी वाहतूकदार अव्वाच्या सव्वा दर लावून प्रवाशांची लूट करताना दिसत होते. वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील अनेक बस थांबे …

Read More »

संपामुळे दुसर्‍या दिवशीही लालपरी आगारातच; खाजगी वाहतूकदारांची चांदी, प्रवाशांच्या खिशाला चाट

अलिबाग : प्रतिनिधी सन्मान्य तोडगा न निघाल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा संप सलग दुसर्‍या दिवशी मंगळवारी (दि. 9) सुरूच राहिला आहे. त्यामुळे एरव्ही गजबजलेल्या आगारांमध्ये पूर्णपणे शुकशुकाट पहायला मिळत होता. त्यामुळे एसटीने नियमित प्रवास करणार्‍यांची मात्र मोठी गैरसोय झाली आहे. त्यांनी आपला मोर्चा खाजगी प्रवासी वाहतूकीकडे वळवला आहे. एसटीच्या रायगड विभागातील सर्व …

Read More »

पोलीस भरतीत कर्जतच्या पूनम ठाकरे हिचे सुयश

कर्जत : बातमीदार तालुक्यातील आसल येथील पूनम तानाजी ठाकरे  ही पोलीस भरतीमध्ये रायगड जिल्ह्यात तिसरी आली असून, या यशाबद्दल पूनमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आसल गावातील तानाजी ठाकरे यांची मुलगी पूनम ही डिकसळ येथील भाऊसाहेब राऊत महाविद्यालयात क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असायची. तिने पोलीस दलात सहभागी होऊन जनतेची सेवा करावी, असे …

Read More »

पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ कोकणात दाखल

पाली : प्रतिनिधी कोरोना काळात दीड वर्षे मेंढपाळांनी आपल्या हद्दीच्या बाहेर पडणे टाळले होते. मात्र आता पाऊस थांबला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळ कोकणात दाखल होऊ लागले आहेत. महामार्ग, ग्रामीण भागातील रस्ते व शेतात ठिकठिकाणी मेंढपाळ आपल्या कळपासह दिसू लागलेत. कोकणात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मान्सून सुरू होताच कोकणात …

Read More »

कर्जतमधील आदिवासी विद्यार्थ्यांना दिवाळी साहित्य आणि कपड्यांचे वाटप; मुंबईच्या नायगाव एज्युकेशन सोसायटीची दिवाळी भेट

कर्जत : बातमीदार मुंबईतील नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्यांमधील 500 कुटुंबाना दिवाळी साहित्य आणि 600 विद्यार्थ्यांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनानंतर आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे हळूहळू शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी पुन्हा शाळेकडे वळू लागले असून त्यांना शाळेत टिकविण्यासाठी शिक्षक विविध माध्यमातून प्रयत्न करत आहेत. …

Read More »