पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन खारपाले (ता. पेण) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास गायकर आणि शशांक ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार रविशेठ पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षात आलेल्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल व या भागातील विकासकामांना प्राधान्य देण्यात …
Read More »मोदींमुळेच भारत मजबूत स्थितीत; जेपी नड्डा यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारी (दि. 7) पार पडली. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच आपण आज कोरोनामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीवर मात करू शकलो. कोरोना काळात लॉकडाऊन लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदींनी घेतला. लॉकडाऊमुळे …
Read More »जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी सर्वांत पुढे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता देशातच नाही, तर परदेशातही सर्वाधिक आहे. अप्रुव्हल रेटिंग एजन्सीच्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील अनेक बड्या नेत्यांना मागे टाकले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही त्यांनी मागे टाकले आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या …
Read More »रायगडचे किनारे हाऊसफुल्ल; दिवाळीच्या आनंदाबरोबरच पर्यटक घेताहेत मोकळा श्वास
अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाची साडेसाती संपली नसली तरी त्याचा प्रभाव खूपच कमी झाला आहे. त्यामुळे आता पर्यटक घराबाहेर पडले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी त्यांनी रायगडच्या किनार्यांची निवड केली आहे. त्यामुळे रायगडातील सर्वच किनारे आता गर्दीने फुलून गेले आहेत. रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि नारळी पोफळीच्या बागा यामुळे रायगडचे …
Read More »भारतीय नौकेवर पाकिस्तानचा गोळीबार; पालघरमधील मच्छीमाराचा मृत्यू
पालघर : प्रतिनिधी गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील सागरी सीमेवर मासेमारी करणार्या भारतीय नौकेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील एका माच्छीमाराचा मृत्यू झाला आहे, तर गुजरातमधील एका मच्छीमाराला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचे व संतापाचे वातावरण आहे. गुजरात राज्याच्या ओखा बंदरातील …
Read More »राज्यात वादळी वारे घोंगावणार, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये
मुंबई : प्रतिनिधी श्रीलंका आणि तमीळनाडू किनार्यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पश्चिम किनारपट्टीवर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार आज देशाच्या दक्षिण आणि पश्चिम किनारपट्टीवर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या काही प्रदेशात पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र किनारपट्टीपासून …
Read More »न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर विजय, भारताचे आव्हान संपुष्टात
आबूधाबी : वृत्तसंस्थाट्वेन्टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठीचा चौथा संघ निश्चित झाला आहे. अफगाणिस्तानवर मात करत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. न्यूझीलंडच्या या विजयासह भारताचे ट्वेन्टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत आव्हान देखील आता संपुष्टात आले आहे. अबूधाबीच्या स्टेडियमवर झालेल्या रविवारच्या (दि. 7) सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह …
Read More »भारतीय खेळाडूंची स्कॉटलंडच्या ‘ड्रेसिंग रूम’ला भेट
दुबई : वृत्तसंस्था कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघातील खेळाडूंनी ट्वेन्टी-20 विश्वचषकात शुक्रवारी झालेल्या सामन्यानंतर स्कॉटलंडच्या ‘ड्रेसिंग रूम’ला भेट दिली. विराट, रोहित, जसप्रीत बुमरा आणि रविचंद्रन अश्विन यांनी स्कॉटलंड संघातील खेळाडूंशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. ‘विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंनी वेळ काढून आमच्या खेळाडूंशी संवाद साधल्याबद्दल आभार,’ …
Read More »दक्षिण अफ्रिकेचा इंग्लंडवर 10 धावांनी विजय
शारजा : वृत्तसंस्था र्हासी वॅन डर डुसेनची (60 चेंडूत नाबाद 94) उत्कृष्ट फलंदाजी आणि कॅगिसो रबाडाच्या (3/48) हॅट्ट्रिकमुळे दक्षिण आफ्रिकेने शनिवारी ट्वेन्टी-20 विश्वचषकातील ‘गट-1’मधील अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा 10 धावांनी पराभव केला. शारजा येथे झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकांत 8 बाद 179 धावाच …
Read More »टी-20 विश्वचषक 2022 : भारत थेट सुपर 12 मध्ये
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्या टी-20 विश्वचषक 2022 साठी थेट सुपर 12 क्वालिफायर्समध्ये प्रवेश करणार्या आठ संघांची आयसीसीने घोषणा केली आहे. या आठ संघांमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा समावेश आहे. सध्याच्या विश्वचषकात फायनल खेळणार्या दोन संघांव्यतिरिक्त, आयसीसी क्रमवारीतील सहा सर्वोत्तम संघांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper