Breaking News

Ramprahar News Team

मुरुड आगाराची बससेवा बंद, प्रवाशांची गैरसोय

मुरुड : प्रतिनिधी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मुरुड आगारातून एकही एसटी बस बाहेर न पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे जाण्यासाठीही मुरूड आगारातून एकही गाडी सोडण्यात आलेली नाही. येथून खाजगी वाहतूक फक्त मुंबई पुरतीच व थेट प्रवाशांनसाठीच सुरू असून, …

Read More »

एकदाचा निर्णय घ्या

छत्तीसगढ सरकारचा बारावीच्या परीक्षेचा अजब पॅटर्न वादग्रस्त ठरला असला तरी त्यांनी किमान निर्णय घेतला याचे गुण त्यांना द्यायला हवेत. महाराष्ट्रातील सरकारने अद्याप तेवढी तसदीदेखील घेतलेली नाही. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच देशभरातील शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे शिक्षण सचिव आणि  शिक्षणतज्ज्ञही सहभागी झाले होते. सध्याच्या परिस्थितीत …

Read More »

सावधान! नाळ तुटत आहे

अनेकांना पदराला खार लावून त्यांची खरेदीही करावी लागली, पण पर्वा कुणाला? वास्तविक याच प्रकारचे अप्रत्यक्ष शिक्षण आपल्या देशात अत्यंत स्वस्त आणि सर्वांना उपलब्ध होऊ शकेल अशा डी. टी. एच. किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून देणे शक्य होते. ‘स्वयंप्रभा’ या केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या आणि केवळ शिक्षणासाठी वाहिलेल्या 32 शैक्षणिक दूरदर्शन वाहिन्या मात्र …

Read More »

श्रीवर्धन समुद्रकिनारी पडलेली झाडे जागेवरच; सुरूची नवीन लागवड थांबली

श्रीवर्धन : प्रतिनिधी गतवर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावरील सुरुची 90 टक्के झाडे पडली होती. ठेकेदाराने ही झाडे कापून त्याच ठिकाणी ठेवली आहेत. त्यामुळे नवीन झाडे लावायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीवर्धन समुद्रकिनारी सुमारे 25 ते 30 वर्षापूर्वी सुरूच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. ही झाडे …

Read More »

अखेर उमटे धरणातील गाळ काढण्यास सुरूवात; 15 दिवसांत काम होणार पूर्ण

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्याला पाणीपुरवठा करणार्‍या उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला अखेर सोमवारी (दि. 24)सुरूवात झाली. या कामामुळे धरणातील पाणीसाठा वाढून मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या उमटे धरणातून अलिबाग तालुक्यातील 60 गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. परंतु गेल्या 40 वर्षात या धरणातील गाळ एकदाही काढण्यात …

Read More »

‘दिबा’ : विधानसभेतील एक बुलंद तोफ!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… महाराष्ट्रात सन 1972मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात ग्रामीण भागातील जनतेची परिस्थिती अत्यंत बिकट …

Read More »

रायगडात 189 लसीकरण केंद्र; तीन लाख 77 हजार 924 जणांना लसीची मात्रा

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी 189 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात अतापर्यंत तीन लाख 77 हजार 924 लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. जि. प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये 158 लसीकरण …

Read More »

1 जूननंतर दुकाने उघडू द्या; व्यापार्‍यांची मागणी; मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : प्रतिनिधी लॉकडॉऊनमुळे सगळेच व्यवसाय बंद पडल्यामुळे व्यावसायिकांची आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे 1 जूननंतर लॉकडॉऊन न वाढविता दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. गुढीपाडवा, अक्षयतृतीया, ईद आदी सण लॉकडॉऊनमध्ये गेल्याने गेल्या दोन महिन्यांपासून …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. हा …

Read More »

बारावीची परीक्षा ः केंद्राने मागविल्या राज्यांकडून सूचना

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी रविवारी (दि. 23) राज्यांसोबत व्हर्च्युएल बैठक घेतली. यात केंद्र सरकारने बारावी बोर्डाच्या परीक्षेसंबंधी राज्यांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. केवळ महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेणे किंवा परीक्षेची पद्धत बदलणे असे दोन पर्याय केंद्र सरकारकडून सूचवण्यात आले आहेत. याशिवाय शिक्षणमंत्र्यांनी कोरोनाच्या परिस्थितीनुसार राज्याला निर्णय …

Read More »