Breaking News

Ramprahar News Team

अशोक बागमध्ये बसविली ड्रेनेजची नवीन लाइन; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील अशोक बाग येथे भाजप नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन ड्रेनेजची लाइन बसविण्यात आली आहे. विरुपाक्ष हॉलच्या समोरील अशोक बागमधील ड्रेनेज लाइन रस्त्याच्या काम करताना ढिगार्‍याखाली दबली गेली होती. त्यामुळे ड्रेनेज लाइन पूर्ण निकामी होऊन सांडपाण्याचा निचरा होत नव्हता. या विषयाची माहिती अशोक बागमधील रहिवाशांनी …

Read More »

पनवेल मनपा हद्दीतील बेवारस वाहनांवर नोटीसा; लवकरच होणार कारवाईला सुरुवात

खारघर : प्रतिनिधी पालिका क्षेत्रात बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेवारस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. खारघरपासून पनवेल शहरापर्यंत बेवारस वाहनांनी मोठ्या प्रमाणात रस्ते अडवले आहेत. त्यामुळे पनवेल पालिकेने बेवारस वाहनांवर नोटीसा चिटकविण्यास सुरुवात केली आहे.कोरोना काळात वर्षभरापासून बेवारस वाहने मालकांनी फुटपाथ, रस्ते आदींवर उभी केली आहेत. अनेक गाड्यांचे मालक गाड्या …

Read More »

पीर करमअली शहा बाबांना 70 फूट फुलांची चादर अर्पण; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरातील हजरत ख्वॉजा पीर करमअली शाह चिश्ती रहमतुल्ला आलैह बाबांच्या दर्ग्यात 70 फुट फुलांची चादर अर्पण करण्यात आली. तसेच नवसाला पावणारा म्हणूनच प्रसिद्ध असणार्‍या आणि सर्व जातीधर्मातील भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या या दर्ग्यात …

Read More »

नवी मुंबईत कोरोनामुक्तीचा दर घटला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत तीन पट वाढ होत आता रुग्णांची संख्या 200पर्यंत गेली आहे. रुग्णवाढीचा वेग जास्त असल्याने कोरोनातून बरे होणार्‍यांचे प्रमाणही कमी झाले आहे. दीड महिन्यापूर्वी 96 टक्के असलेला नवी मुंबईत कोरोनामुक्तीचा दर घटत तो 94.86 टक्क्यांवर आला आहे. नवी मुंबई शहरात कोरोना प्रादुर्भाव …

Read More »

अंबा नदी संवर्धनाची गरज; प्रदूषण व मानवी हस्तक्षेपामुळे अस्तित्व धोक्यात

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीला प्रदूषणाने वेढले आहे. सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी व कचरा, वाळू उपसा यामुळे अंबा नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यामुळे नदी संवर्धनाची मागणी होत आहे. खालापूर तालुक्यातील चावणी आंबेनळी घाट व सुधागड तालुक्यातील मानखोरे या दोन ठिकाणांहून अंबा नदीचा उगम होतो …

Read More »

पेण, अलिबागला जाणार्या गाड्या रद्द; कर्जत परिसरातील सकाळी प्रवास करणार्यांची गैरसोय

कर्जत : बातमीदार तालुक्यातील ग्रामस्थांना अनेकदा शासकीय कामांसाठी अलिबाग येथील जिल्हा मुख्यालयात जावे लागते. मात्र कर्जत एसटी आगाराने सकाळच्यावेळी पेण, अलिबाग येथे जाण्यासाठी असलेल्या तीन गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग ते कर्जत हे अंतर साधारण 100 किलोमीटर आहे. येथील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी …

Read More »

ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठीचे प्रयत्न त्रोटकच

अमेरिकेतील अ‍ॅमेझॉन आणि ब्राझिलच्या जंगलात लागलेली आग अनेक महिने पेटत राहिली आणि त्यामुळे होणार्‍या ग्लोबल वॉर्मिंगची चर्चाही जगभर झाली. तापमानवाढीच्या या समस्येचे स्वरूप गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक पातळीवर सर्वत्र अनुभवण्यास मिळत असताना त्याबाबत जागतिक स्तरावर कधीही प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. त्याचप्रमाणे ग्रामीण पातळीवरदेखील ग्लोबल वॉर्मिंगचे प्रयत्न शक्य असताना त्यासाठीदेखील …

Read More »

निरर्थक मलमपट्टी

अँटिलिया स्फोटक प्रकरणात वाझेसोबत पोलीस दलातील आणखी कोण कोण आणि किती जण सामील आहेत? मुंबई पोलिसांचे दल कार्यक्षमतेबद्दल देशातच नव्हे तर जगात लौकिक कमावून आहे. असे असताना काही सडके आंबे सगळीच आढी नासवत आहेत याची वेळीच दखल का घेतली गेली नाही? राज्याचे गृहखाते झोपा काढत होते काय? अशा असंख्य प्रश्नांची …

Read More »

शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट; चाकरमानी हिरमुसले

माणगाव : प्रतिनिधी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून सार्वजनिक कार्यक्रम, सण, समारंभ, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. याचाच परिणाम येणार्‍या शिमगोत्सव होणार असून, त्यामुळे भाविक, चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे. रायगड जिल्ह्यात विशेषत: दक्षिण रायगडमध्ये  शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंपरा व चालीरीती यांच्याशी जोडलेल्या या उत्सवात लहानथोर आनंदाने …

Read More »

कर्जत-मुरबाड रस्त्यावरील भागूचीवाडीचा तीव्र चढ आणि उतार होतोय कमी

कर्जत : बातमीदार कर्जत-मुरबाड रोड आता राष्ट्रीय महामार्गमध्ये रूपांतरित झाला आहे. या रस्त्यावरील कळंब भागूचीवाडी येथील तीव्र चढाव हा वाहनचालकांसाठी परीक्षा पाहणारा होता. मात्र कर्जत-मुरबाड रस्ता राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरित झाल्याने तो तीव्र चढाव आता कमी होत असून त्या चढवाच्या बरोबर असलेले तीव्र वळणदेखील कमी होत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा जोडरस्ता …

Read More »