Ramprahar News Team

कर्जतमध्ये कीर्तन महोत्सवाची सांगता

कर्जत : प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वरी पारायण व ज्ञानयज्ञ सोहळा समितीच्या वतीने कर्जतमधील माऊली मैदानावर यंदा 42व्या वर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी ह.भ.प. मारुती महाराज राणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सात दिवस चाललेल्या या महोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर शौर्य शिवाजी भासे या कृष्ण वेषधारी चिमुरड्याच्या हस्ते हंडी फोडण्यात …

Read More »

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पुरस्कार वितरण

अलिबाग : प्रतिनिधी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी (दि. 6) पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ पत्रकार, युवा पत्रकार, छायाचित्रकार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा  रामनारायण रायगड पत्रभूषण पत्रकारिता पुरस्कार मुरूड येथील ज्येष्ठ पत्रकार मदन हणमंते …

Read More »

पाली भूतीवली धरणात मासेमारी तेजीत; पाटबंधारे खात्याची डोळेझाक

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाली भूतीवली या लघुपाटबंधारे प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा असून ते पाणी गेली अनेक वर्षे धरणात तसेच साठून आहे. त्यामुळे धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात मासे असून, ते जाळे टाकून पकडले जात आहेत. पकडलेल्या माशांची विक्री होत असून, या बेकायदा सुरू असलेल्या व्यवसायाकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे …

Read More »

खालापूर तालुका भाजप अध्यक्षपदी मोरेश्वर उर्फ बापू घारे यांची फेरनिवड

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुका भारतीय जनता पक्ष अध्यक्षपदी मोरेश्वर उर्फ बापू घारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या पदासाठी एकूण पाच कार्यकर्ते इच्छुक होते. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व इच्छुकांना विश्वासात घेऊन ही निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे निरीक्षक म्हणून काम पाहिलेल्या जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी …

Read More »

तिसर्या डोळ्यातच कचरा; खोपोली पालिकेच्या सीसीटीव्हीवर कोळीष्ट जाळ्या

खोपोली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका म्हणून खोपोलीची ओळख सर्वदूर आहे. याच नगरपालिकेच्या कारभारावर तिसर्‍या डोळ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याच्या माध्यमातून कामचुकार, कर्मचार्‍यांशी वाईट वर्तन करणारा किंवा चोर्‍या यावर करडी नजर ठेवली जात आहे, मात्र या तिसर्‍या डोळ्यासमोर कोळीष्टाने आपले जाळे विणून त्याची …

Read More »

पेण तालुक्यातील निराधार रुग्णांची तपासणी

पेण : प्रतिनिधी अंकुर ट्रस्ट व मैत्रेय राज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच निराधार महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर घेण्यात आले. त्यात पेण तालुक्यातील 20 आदिवासीवाड्यांतील 100पेक्षा अधिक महिला व पुरुषांनी आपली तपासणी करून घेतली. मैत्रेय राज फाऊंडेशनच्या इमारतीमध्ये झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रवीण …

Read More »

वावंढळ पुलात पडलेला कापसाचा ट्रक जळून खाक

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळील वावंढळ पुलावरून  दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या ट्रकमधील कापूस पेटल्याने ट्रक जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि. 8) दुपारी घडली असून, यामध्ये लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. पनवेलच्या दिशेने कापूस घेऊन जाणारा ट्रक सोमवारी सकाळी वावंढळ गावानजीक अरूंद पुलावरून कठडा तोडून ओढ्यात कोसळला होता. …

Read More »

इंडियन नेव्हीची महाकनेक्ट नेव्ही 2020 रॅली

अलिबाग : प्रतिनिधी इंडियन नेव्हीतर्फे महाकनेक्ट नेव्ही 2020 रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई डॉकयार्ड येथून सायकलिंग, सेलिंग्ज आणि धावपटूंच्या माध्यमातून अर्नाळा ते सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत 555 किमीची रस्ते आणि समुद्रमार्गे रॅली काढण्यात आली आहे. सोमवारी (दि. 6) सायकलिंग रॅली अलिबाग येथे दाखल झाली. मंगळवारी ती पुढील प्रवासासाठी रवाना झाली. 11 …

Read More »

कर्जत-मुरबाड रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद; प्रशासनाचा निर्णय

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या अहवालानुसार कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवरील कळंब येथे असलेल्या जुन्या पुलाची स्थिती नाजूक असल्याने रायगड जिल्हा प्रशासनाने मंगळवार (दि. 7)पासून हा पूल अवजड वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिक येथून येणारी अवजड वाहने पाटगाव येथून बदलापूर अशी होऊन कर्जतला जातील …

Read More »

वीर रेल्वे स्थानकाची दुरवस्था; प्रवाशांना त्रास

महाड : प्रतिनिधी कोकण रेल्वेमार्गावरील वीर स्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या स्थानकातील  फलाटांची आणि छपराची दुरवस्था झाली आहे. छपराचे पत्रे तुटून गेले आहेत, तर फलाटावरील फरशादेखील उखडून गेल्या आहेत. महाडपासून सात किमी अंतरावर असलेल्या वीर स्थानकाकडे  रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी सध्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण …

Read More »