पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल संघटनेच्या माध्यमातून न्हावा-शेवास्थित पंजाब कॉन्वेर सीएफएसमधील गॅड लॉजिस्टीकच्या 250 कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सोयीसुविधा देण्याचा करारनामा झाला. त्यामुळे …
Read More »मराठा आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मराठा आरक्षणावरील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देता येत नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजासह राज्य सरकारला दिलासा दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावर दोन आठवड्यांनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाबाबतचा राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवल्यानंतर या निर्णयाला आरक्षण विरोधकांनी सुप्रीम कोर्टात आव्हान …
Read More »बा विठ्ठला… जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेेक्षा पूर्ण होऊ दे! मुख्यमंत्र्यांचे साकडे
पंढरपूर : प्रतिनिधी राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, तसेच बळीराजाचे कल्याण व्हावे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्जन्यमान चांगले व्हावे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी (दि. 12) विठ्ठलचरणी घातले. परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा केली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी अहमदपूरच्या वारकरी …
Read More »मृतदेह शोधण्यात पनवेलमधील कोळी बांधवांची विशेष मेहनत
पनवेल : रामप्रहर वृत्त गाढी नदीपात्रात वाहून गेलेल्या आदित्य आंब्रे यांचा मृतदेह शोधून देण्यात पनवेल कोळीवाडा येथील मच्छीमार बांधवांनी विशेष मेहनत घेतली. आदित्य व सारिका आंब्रे हे दाम्पत्य गाढी नदीपुलावरून वाहून गेले होते. बुधवारी शोधमोहिमेत त्यांची दुचाकी सापडली, मात्र ते बेपत्ता होते. त्यामुळे तिसर्या दिवशीही शोधमोहीम सुरू होती. या संदर्भात …
Read More »अलिबागेत भरवस्तीत भंगार गोदामाला आग
अलिबाग : प्रतिनिधी शहरातील जुन्या मासळी बाजाराच्या मागील बाजूस असलेल्या भंगाराच्या गोदामाला गुरुवारी रात्री आग लागली. अग्निशमन दलाने अडीच तासांच्या महत्प्रयासाने या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी भरवस्तीतील अनधिकृत भंगार गोदामांचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. घराशेजारीच मोकळ्या जागेला गोदामाचे स्वरूप देण्यात …
Read More »निघालो घेऊन पालखी विठ्ठलाची..! ; आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर झाले पालखीचे भोई
पनवेल : रामप्रहर वृत्त विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन होत पनवेल परिसरातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. 12) वारकरी दिंडी काढली. निमित्त होते आषाढी एकादशीचे. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिंडीत सहभाग घेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात …
Read More »मधुकर जोशी यांना पुरस्कार
मुंबई ः प्रतिनिधी राज्य शासनाच्या वतीने संत साहित्य, तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2018-19चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक म. रा. जोशी यांना जाहीर करण्यात आला. पाच लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची …
Read More »जावळे, बामणडोंगरी ग्रामस्थांचे आंदोलन ; बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम स्थानिकांना देण्याची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील जावळे व बामणडोंगरी ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. 12) सिडको प्रशासन व बिल्डर्सच्या विरोधात ठिय्या आंदोलन व साखळी उपोषण केले. येथील स्थानिकांच्या जमिनी सिडकोकडून संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भूखंड विकसित करण्यासाठी आवश्यक ते बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम स्थानिक प्रकल्पग्रस्तांना मिळावे, अशी प्रमुख मागणी या वेळी …
Read More »दहा वर्षांत 27 कोटी भारतीय गरिबीमुक्त
नवी दिल्ली : गरिबी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करणार्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश असल्याची माहिती मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स 2019 (एमपी)च्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. हा रिपोर्ट ऑक्सफोर्ड पॉवर्टी अॅण्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यांनी मिळून तयार केला आहे. रिपोर्टनुसार, भारताने आपल्या येथील गरिबी 55.1 टक्क्यांवरून 27.9 …
Read More »भारताचा विश्वचषक हुकला, पण संघ स्पर्धेत चमकला!
मुंबई : प्रतिनिधी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवाने भारताची मोहीम संपुष्टात आली. यासह जगभरातील अब्जावधी क्रिकेट चाहत्यांचाही हिरमोड झाला, पण भारताने यंदाच्या स्पर्धेत छाप पाडली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावताच रोहित शर्मा विश्वक्रिकेटमध्ये मानाच्या पंक्तीत पोहोचला. सलग तीन सामन्यांत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper