Breaking News

Ramprahar News Team

अलिबागेत भरवस्तीत भंगार गोदामाला आग

अलिबाग : प्रतिनिधी शहरातील जुन्या मासळी बाजाराच्या मागील बाजूस असलेल्या भंगाराच्या गोदामाला गुरुवारी रात्री आग लागली. अग्निशमन दलाने अडीच तासांच्या महत्प्रयासाने या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी भरवस्तीतील अनधिकृत भंगार गोदामांचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. घराशेजारीच मोकळ्या जागेला गोदामाचे स्वरूप देण्यात …

Read More »

निघालो घेऊन पालखी विठ्ठलाची..! ; आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर झाले पालखीचे भोई

पनवेल : रामप्रहर वृत्त विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन होत पनवेल परिसरातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. 12) वारकरी दिंडी काढली. निमित्त होते आषाढी एकादशीचे. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिंडीत सहभाग घेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात …

Read More »

मधुकर जोशी यांना पुरस्कार

मुंबई ः प्रतिनिधी राज्य शासनाच्या वतीने संत साहित्य, तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2018-19चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक म. रा. जोशी यांना जाहीर करण्यात आला. पाच लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची …

Read More »

जावळे, बामणडोंगरी ग्रामस्थांचे आंदोलन ; बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम स्थानिकांना देण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील जावळे व बामणडोंगरी ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. 12) सिडको प्रशासन व बिल्डर्सच्या विरोधात ठिय्या आंदोलन व साखळी उपोषण केले. येथील स्थानिकांच्या जमिनी सिडकोकडून संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भूखंड विकसित करण्यासाठी आवश्यक ते बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम स्थानिक प्रकल्पग्रस्तांना मिळावे, अशी प्रमुख मागणी या वेळी …

Read More »

दहा वर्षांत 27 कोटी भारतीय गरिबीमुक्त

नवी दिल्ली : गरिबी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करणार्‍या 10 देशांमध्ये भारताचा समावेश असल्याची माहिती मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स 2019 (एमपी)च्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. हा रिपोर्ट ऑक्सफोर्ड पॉवर्टी अ‍ॅण्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यांनी मिळून तयार केला आहे. रिपोर्टनुसार, भारताने आपल्या येथील गरिबी 55.1 टक्क्यांवरून 27.9 …

Read More »

भारताचा विश्वचषक हुकला, पण संघ स्पर्धेत चमकला!

मुंबई : प्रतिनिधी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवाने भारताची मोहीम संपुष्टात आली. यासह जगभरातील अब्जावधी क्रिकेट चाहत्यांचाही हिरमोड झाला, पण भारताने यंदाच्या स्पर्धेत छाप पाडली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावताच रोहित शर्मा विश्वक्रिकेटमध्ये मानाच्या पंक्तीत पोहोचला. सलग तीन सामन्यांत …

Read More »

जेसन रॉयला सामना मानधनातील 30 टक्के दंड

लंडन : वृत्तसंस्था यजमान इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला, पण या सामन्यात इंग्लंडचा सलामीवर जेसन रॉयला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शिक्षा सुनावली आहे. 20व्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रॉयला चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आले. चेंडू व्हाईडच्या दिशेने गेला होता. त्यावर रॉयने फटका मारण्याचा प्रयत्न …

Read More »

चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणे आम्हाला भोवले -रवी शास्त्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीत अव्वल कामगिरी करणारा भारतीय संघ उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या मार्‍यासमोर ढेपाळला. भारताचे दिग्गज फलंदाज मोक्याच्या क्षणी झटपट माघारी परतले. चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणे आम्हाला भोवल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मान्य केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते. शास्त्री …

Read More »

नशीबाने चेंडू स्टंपला लागला : गप्टिल

लंडन : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात निर्णायक क्षणी मार्टिन गप्टिलच्या थेट फेकीमुळे महेंद्रसिंह धोनी धावचीत झाला आणि भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. धोनी धावबाद झाल्याने सामन्याला शेवटच्या क्षणी कलाटणी मिळाली असे मत दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सामन्यानंतर व्यक्त केले, मात्र आमचे नशीब बलवत्तर असल्याने तो चेंडू स्टंपला लागला, असे मत गप्टिलने …

Read More »

मोक्याच्या क्षणी अपयशी ठरलो; रोहितची कबुली

मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका भारताला बसला आणि भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या पराभवानंतर रोहित शर्माने ट्विट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. मोक्याच्या क्षणी आम्ही अपयशी ठरलो. जेव्हा संघातील खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा …

Read More »