Breaking News

Ramprahar Team

शिवराज प्रतिष्ठानतर्फे भक्ती-शक्ती महोत्सव

नागोठणे : प्रतिनिधी विभागातील आमडोशी येथील शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच भक्ती-शक्ती महोत्सव घेण्यात आला. त्यात संत तुकाराम महाराज पुरस्कार ह.भ.प. मधुकरमहाराज जवके आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार  पुष्पाताई शेलार यांना, तर शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कार प्राप्त संदीप प्रल्हाद गुरव यांना शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच सोनल रवींद्र पाटील (कोलाड) …

Read More »

तोंडसुरे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना ठप्प

8 गावे 4 वाड्या टंचाईग्रस्त; टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी म्हसळा : प्रतिनिधी दुरूस्तीचे काम करण्यासाठी पाभरे (ता. म्हसळा) धरणातील बहुतांश पाण्याचा विसर्ग केल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या नळ पाणीपुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत. त्याचा मोठा फटका तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजनेला बसला आहे. या योजनेवर अवलंबून असलेली आठ गावे …

Read More »

सरपंच दत्तात्रय सांबरी यांनी स्वीकारला पदभार, बिपीन बडेकर उपसरपंचपदी

कर्जत : बातमीदार सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेले दत्तात्रय सांबरी यांनी सोमवारी (दि. 25) पदभार स्वीकारला. पंचायत समिती सदस्य प्रदीप ठाकरे आणि युवासेनेचे  संदीप बडेकर यांनी दत्तात्रय सांबरी यांना सरपंच पदाच्या खुर्चीत बसविले. येत्या काही दिवसांत किरवली ग्रामस्थांना नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा मनोदय या वेळी …

Read More »

उन्हाच्या झळांनी उमेदवार, कार्यकर्त्यांची दमछाक

पाली : प्रतिनिधी ऐन उन्हाळ्यातच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे एका बाजूला निवडणूक प्रचाराचे तापलेले रण तर दुसर्‍या बाजूला उन्हाच्या तीव्र झळा यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. लोकसभेचा भलामोठा मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी निघालेल्या उमदेवार व कार्यकर्त्यांना भर उन्हात मतदारांशी संवाद साधणे कठिण होऊन बसले आहे. उन्हाच्या तिव्रतेने …

Read More »

जलसाक्षर भारतासाठी

जल किंवा पाणी या दोन अक्षरी शब्दापुढे सध्या प्रत्येकाच्या तोंडचे पाणीच पळवले आहे. पाण्याला जीवन असेही म्हटले जाते. जेव्हा विहीर कोरडी पडते, तेव्हा पाण्याची खरी किंमत कळते, हे बेंजामिन फ्रँकलिनचे वाक्य पाण्याचे मानवी जीवनासाठी असलेले महत्त्व पटवून देते. जगात तिसरे महायुद्ध झालेच, तर ते पाण्याच्या टंचाईमुळे होईल, असे भाकीत बहुसंख्य …

Read More »

फुसका बार

शहरी भाग असो की ग्रामीण, गरिबीत खितपत पडलेल्यांचे दर्शन आजही अगदी सहजच घडते, पण हा राजबिंडा राजपुत्र अवघी पाच वर्षे देशाची जबाबदारी सांभाळणार्‍या मोदींच्या माथ्यावर या सार्‍याचे खापर फोडून मोकळा होतो आणि पुन्हा सत्तेवर आल्यास गरिबांना किमान उत्पन्न उपलब्ध करून देण्याचे गाजर दाखवतो. आपली घोषणा हा एक धमाका आहे. आजवर …

Read More »

भारतीय जनता पार्टीत प्रवेश

पनवेल : रायगड जिल्ह्यातील आणि नवी मुंबईमध्ये राहणार्‍या धाडी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सिडको अध्यक्ष तथा रायगड भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

Read More »

उमरोलीत कार पेटून बालकाचा होरपळून मृत्यू

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली गावात एका चार वर्षीय बालकाचा बंद कारला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अभय उमेश बुंधाटे असे मृत बालकाचे नाव आहे. उमरोली येथे एमएच 02-एनए 5625 ही मारुती झेन कार गावातील रस्त्यावर तीन महिन्यांपासून उभी होती. या गाडीच्या काचा उघड्या असल्याने …

Read More »

होळीची धुंदी नडली; पोलिसालाच केली धक्काबुक्की

पनवेल ः वार्ताहर संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. विशेषतः कोकणातील होळीचा सण व शिमगोत्सवाचा जल्लोष सातासमुद्रापार जाऊन पोहचला आहे. मोठी होळी झाली की दुसर्‍या दिवशी धूळवड असते. धूळवडीच्या दिवशी प्रामुख्याने मुंबईपासून  पनवेलपर्यंतचा परिसर रंगपंचमी साजरी करतो, मात्र महाराष्ट्रात त्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. …

Read More »

पनवेल तालुक्यात श्रीसदस्यांचे स्मशानभूमी स्वच्छता अभियान

पनवेल : रामप्रहर वृत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधत रायगड जिल्ह्यात स्मशानभूमी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले गेले होते. प्रतिष्ठानच्या वतीने विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असते, पण रविवारी मात्र श्रीसदस्यांनी रायगड जिल्ह्यात  स्मशानभूमीची स्वच्छता करीत समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला …

Read More »