मी उरणकर प्रतिष्ठानचे आमदार महेश बालदी यांच्याकडून कौतुक उरण ः बातमीदार महागाईने तर सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. अशातच गोरगरीब व गरजू रुग्णांकरिता अंतिम बिलात सवलत मिळावी यासाठी मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल पाटेकर यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद देत वाशी येथील एमजीएम …
Read More »नवी मुंबईत होणार पहिला फ्लेमिंगो महोत्सव
14 मे रोजी आयोजन; पाणथळ संवर्धनासाठी हरितप्रेमी एकवटले नवी मुंबई ः बातमीदार जागतिक स्थलांतरीत पक्षी दिवस (डब्ल्यूबीएमडी) 14 मे रोजी साजरा करण्याच्या अनुषंगाने पर्यावरणप्रेमी गट एकत्र आले आहेत. त्या अनुषंगाने शहरात पहिला फ्लेमिंगो महोत्सव रंगणार आहे. स्थलांतरीत पक्षी आणि त्यांच्या अधिवासांचे संवर्धन करणे हा या अभियानामागचा उद्देश आहे. जगभरातील स्थलांतरीत …
Read More »महाड वरंध घाटात टँकर अडकल्याने वाहतूक विस्कळीत
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील वरंध घाटात एका अवघड वळणावर अवजड ट्रक अडकल्याने महाड-भोर-पुणे मार्गावरील वाहतूक शनिवारी (दि. 7) दुपारी विस्कळीत झाली. घाट वाहतुकीस धोकादायक असतानादेखील अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने अवजड वाहने अडकून या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे. महाड-भोर-पुणे मार्गावरील वरंध घाटात सलग दोन वर्षे ऐन पावसाळ्यात दरडी कोसळत …
Read More »रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट
गडावरील कामांना होत असलेला पाणी उपसा थांबवण्याच्या सूचना महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक किल्ले रायगडावर असलेले पाण्याचे स्त्रोत ऐन मे महिन्यात आटत चालल्याने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होत असलेल्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. येथील गंगासागर तलावातील पाणी गडावरील विकासकामांना वापरले जात आहे. हा उपसा थांबवण्याचे निर्देश जिल्हा …
Read More »कोंढाणे धरणातील वीस टक्के पाणी सिंचनासाठी द्या, अन्यथा एक इंचही माती काढू देणार नाही -सुनील गोगटे
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कोंढाणे धरणातील वीस टक्के पाणी सिंचनासाठी मिळावे तसेच काठावर असलेल्या ग्रामपंचायती व कर्जत नगर परिषदेच्या नळ योजनांसाठीही पाणी मिळावे आणि मुख्य म्हणजे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळावा, त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे अन्यथा धरणासाठी एक इंचही माती काढू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा कोकण …
Read More »खालापूर शहरात रस्ता सुरक्षा उपाययोजना करा
दिलासा फाउंडेशनची आयआरबी कंपनीकडे मागणी खोपोली : प्रतिनिधी अवजड आणि अव्याहत वाहतुकीमुळे खालापूर शहरातून जाणारा रस्ता पादचार्यांना धोकादायक वाटत असून, या रस्त्यावर वेग मर्यादेचे बंधन घालावे आणि वर्दळीच्या ठिकाणी रम्बलिंग स्ट्रिप्स बसवाव्यात, अशी मागणी दिलासा फाउंडेशनने आयआरबी कंपनीकडे केली आहे. बावीस वर्षापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अस्तित्वात आला. त्यावेळी जुन्या मुंबई-पुणे …
Read More »नेरळ रेल्वे स्थानकात अपघात रोखण्यासाठी बॅरिकेट लावण्याची गरज
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाच्या दोन्ही बाजूला रूळ ओलांडून जाणार्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे सातत्याने अपघात घडत असतात. रूळ ओलांडत असताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने या स्थानाकात बॅरिकेट लावण्याची मागणी पुढे येत आहे. नेरळ रेल्वे स्थानकात प्रवासी नेहमी रूळ ओलांडत असतात. त्यामुळे या रेल्वे स्थानक परिसरात सातत्याने …
Read More »कर्जत तालुक्यात पाणीटंचाई
कर्जत : बातमीदार पाणीटंचाई निर्माण झालेल्या कर्जत तालुक्यातील तीन वाड्या आणि दोन गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची केलेली मागणी केली आहे मात्र पंचायत समिती प्रशासन ही मागणी पूर्ण करीत नसल्याने आदिवासी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात उन्हाळा सुरू झाला की, पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार कर्जत …
Read More »सुधागड तालुका समन्वय समितीच्या बैठकीत कवेळे धरणाचे पाणी पेटले
ग्रामस्थ आक्रमक; पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांची दांडी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका समन्वय समितीची पहिली बैठक तहसील कार्यालयाच्या हिरकणी कक्षात नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित चांदोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. समितीच्या अध्यक्षांनी उपस्थित अधिकार्यांकडून त्यांच्या खात्याचा आढावा घेतला. या वेळी एमएसआरडीसी, पाटबंधारे, एसटी महामंडळ तसेच अन्य विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते त्यांना …
Read More »रामप्रहर अर्थसाक्षर स्पर्धा : 20
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या असलेल्या एलआयसीच्या आयपीओद्वारे सरकारला किती रक्कम मिळणार आहे? अ. 21 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper