उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील अवघ्या पावणे सहा वर्षांच्या हर्षिती भोईर या चिमुरडीने ट्रेकिंगमध्ये विक्रम केला आहे. या बद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हर्षिती भोईर हीने साडेतीन वर्षांची असल्यापासून ट्रेकची आवड जोपासली आहे. फक्त साडेपाच वर्षात तिने दोन रेकॉर्डची नोंद करून आपले आणि आपल्या गावाचे नाव पूर्ण …
Read More »जासई हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात भारतीय मजदुर संघाचे अध्यक्ष, कामगार नेते व स्कूल कमिटी सदस्य सुरेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण केले गेले. या वेळी विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे व विद्यालयातील शिक्षक वर्ग सोशल डिस्टन्सिंग …
Read More »झाड कोसळून कारचे नुकसान
नवी मुंबई : बातमीदार नेरूळ राजीव गांधी ब्रिजजवळ शिरवणे गावात जाणार्या रस्त्यावर झाड कोसळल्याने कारचा चुराडा झाल्याची घटना बुधवारी सकाळी 9 च्या दरम्यान घडली. राजीव गांधी ब्रिजजवळून शिरवणे गावात शिरताच रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केलेली असतात. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसात काही झाडे पडली होती तर काही …
Read More »नवी मुंबईतील रस्त्यांवर रेतीच रेती
दुचाकीचे अपघात; प्रशासनाचे दुर्लक्ष नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडलेले असताना सध्या पावसाने वाहून आलेल्या रेतींचे प्रमाण दिसू लागले आहे. नवी मुंबईतील अनेक महत्वाच्या शहरांतर्गत रस्त्यांवर रेती पसरलेली आहे. नियमित या मार्गांवरून प्रवास करणार्या नागरिकांना चटकन या रेतीचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून पडू लागले आहेत. या …
Read More »भाजपतर्फे जासई विद्यालयात गरजूंना अन्नधान्याचे वाटप
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये बुधवारी (दि. 9) इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. 500 विद्यार्थ्यांच्या पालकांनी मास्कचा वापर करून व सोशल डिस्टन्सिंग ठेऊन …
Read More »लॉकडाऊन शिथिलतेनंतर चोरट्यांची टोळी सक्रिय
आठ दिवसांत 20पेक्षा जास्त गुन्हे पनवेल : बातमीदार टाळेबंदी 1 सप्टेंबरपासून शिथिल केल्यानंतर चोर्या करणारी टोळी सक्रिय झाली असून नागरिकांनी सोनसाखळी, मंगळसूत्र आणि मोबाइल या मौल्यवान वस्तूंचा वापर सावधानतेने करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ आठ दिवसांत …
Read More »सरकारची लक्तरे
कोरोना महामारीचे निमित्त करून कसेबसे उरकलेले दोन दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन महाराष्ट्राच्या जनतेच्या स्मरणात दीर्घकाळ राहील ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या धारदार भाषणामुळेच, अन्यथा पुरवणी मागण्यांसाठी बोलावलेले हे अधिवेशन म्हणजे पितृपक्षातील चटावरचे श्राद्धच म्हणावे लागेल. विधिमंडळ अधिवेशनात तब्बल 29 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा प्रस्ताव सभागृहात ठेवल्यानंतर त्यावर फारशी चर्चाच होऊ …
Read More »…अन्यथा आरपारची लढाई
विजयी मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांचा निर्धार नागोठणे ः प्रतिनिधी आंदोलनाची आम्हाला अजिबात हौस नाही, मात्र जनतेच्या हक्कांसाठी आमची लोकशासन संघटना बाहेर पडली तर हक्क मिळवून दिल्याशिवाय थांबत नाही. जगात जनशक्तीला कोणीही हरवू शकले नसून रिलायन्सने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, तर पुढची लढाई आरपारची असेल, असा इशारा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे प्रदेश …
Read More »तरुणांकडून भोराई मंदिराची साफसफाई
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ऐतिहासिक व अभेद्य असा सुधागड किल्ला कायम स्वच्छ राहावा यासाठी दुर्गप्रेमी नेहमीच प्रयत्नशील असतात. अतिवृष्टीमुळे सुधागड किल्ल्यावरील प्राचीन भोराई मातेच्या मंदिरात चिखल झाला होता. त्यामुळे सुधागड तालुक्यातील काही तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रविवारी (दि. 6) एकत्र येत भोराई मंदिराची स्वच्छता करून गाभार्यातील चिखलदेखील साफ केला. सुधागड किल्ल्याचे …
Read More »चक्रीवादळात 32 टक्के बागायत क्षेत्र बाधित
नारळ, सुपारीसह आंब्याच्या बागा भुईसपाट मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील 2503 हेक्टर बागायत क्षेत्रापैकी 794 हेक्टर म्हणजेच जवळजवळ 32 टक्के बागायत क्षेत्र जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळात भुईसपाट झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. नारळ, सुपारीसारखे हुकमी पीक डोळ्यांंदेखत अस्मानी संकटाने हिरावले असून उर्वरित नारळाच्या झाडांचे उत्पन्न मिळण्यासाठी अद्याप सहा माहिने वाट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper