रेवदंंडा : प्रतिनिधी बिल अदा न करता पळून जाणार्या पर्यटकाने फुटलेच्या काचेच्या बाटलीने हल्ला करून हॉटेल मालकास गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (18 जून) बोर्ली येथे घडली. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोर्ली येथील कमाने हॉटेलमध्ये मंगळवारी सायकाळी पुणे येथील पर्यटक आले होते. खरेदी झाल्यानंतर हॉटेल …
Read More »खोपोलीत घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा
खोपोली : प्रतिनिधी शहरातील नाले व गटारे सफाईचा गाळ व कचरा पंधरा दिवस उलटले तरी तसाच पडून आहे. भाजी मंडई, मासळी मार्केट, विविध रहिवासी भाग, रस्ते व मोकळ्या जागेत जमा होत असलेला कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने, खोपोलीत घनकचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले आहेत. ठिकठिकाणी कचर्याचे ढीग निर्माण झाल्याने स्वच्छ खोपोली …
Read More »पाटबंधारे विभागाचा अजब कारभार
अंबा नदीवरील बंधार्याचे दरवाजे उघडले; पाली ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट पाली : प्रतिनिधी अंबा नदीतून पाली (ता. सुधागड) गावाला पाणीपुरवठा होतो. त्यासाठी पाटबंधारे विभागाने बलाप गावाजवळ बंधारा उभारला आहे. पावसाळा संपल्यानंतर बंधार्याच्या फळ्या (पत्रे) लावून अंबा नदीचे पाणी या बंधार्यात अडविले जाते. पावसाळा सुरु झाल्यावर या फळ्या काढल्या जातात. पाऊस लांबल्याने …
Read More »कोंढवी अन् कोतवालची जीर्ण पुनर्वसन संकुले
पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल येथे सिध्दिविनायक ट्रस्टच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या पुनर्वसन संकुलाचा ताबा दरडग्रस्तांना लॉटरीद्वारे देण्यात आला आहे. सिध्दिविनायक ट्रस्टच्या मदतीचा योग्य विनियोग न झाल्याने पोलादपूर तालुका पुनर्वसनापासून वंचित राहिला आहे, मात्र सध्या या जीर्णावस्थेत असलेल्या दोन्ही पुनर्वसन संकुलांच्या इमारती सरकार आणि आपद्ग्रस्तांच्या कोत्या मानसिकतेचे द्योतक म्हणून उभ्या आहेत. …
Read More »अन्नभेसळीचे करायचे काय?
लोणावळ्यातील नामांकित हॉटेले आणि रिसॉर्टवर छापे टाकून अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी या बड्या नावांकडून ग्राहकांची कशी घोर फसवणूक केली जाते आहे हे उघडकीस आणले आहे. या नामांकित हॉटेलांकडून ग्राहकांना अशा निकृष्ट, प्रसंगी दूषित ठरू शकणार्या अन्नपदार्थांची अपेक्षा निश्चितच नव्हती. अर्थातच बेसुमार नफेखोरीसाठी या हॉटेलांनी हे केले. पावसाळा सुरू झाला …
Read More »अडथळा निर्माण करणार्या बांधकाम व्यावसायिकांना उपमहापौरांची तंबी
पनवेल ः वार्ताहर नव्याने इमारत उभारत असताना इमारत उभारण्यासाठी लागणारे साहित्य रस्त्यातून वाहणार्या गटारावरच टाकणार्या बांधकाम व्यावसायिकांना आज (दि. 17) पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तंबी दिली आहे. तातडीने सदर साहित्य हटविण्यास तसेच तुटलेली गटारे व स्लॅब बांधून देण्यासही संबंधितांना सांगण्यात आले आहे. शहरातील चिंतामणी मंगल …
Read More »श्रीवर्धनमधील रस्त्यांसाठी 20 कोटींचा निधी
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे विशेष प्रयत्न; कृष्णा कोबनाक यांची माहिती म्हसळा ः प्रतिनिधी रायगडातील ग्रामीण भागातील वाड्या वस्त्या तालुका शहराला जोडणे व सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या परंतु दुरवस्था झालेल्या गाववाडी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची शिफारस व विशेष प्रयत्नाने श्रीवर्धन …
Read More »विमानतळ प्रकल्प गावांतील शाळा स्थलांतरित!
पनवेल : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थलांतरित होणार्या दहापैकी दोन गावांनी अजूनही आपली राहती घरे सोडली नाहीत, मात्र या दोन्ही गावांतील शाळांचा प्रश्न मिटला असल्याने सोमवार (दि. 17) पासून जिल्हा परिषदेच्या गावातील शाळा आता उलवे नोडमध्ये सिडकोने उभारलेल्या नवीन इमारतींमध्ये सुरू होत आहेत. यानंतर गावे रिकामी करण्याचा ओघही वाढण्याची …
Read More »भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची विविध गावांना भेट
पनवेल : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सोमवारी जांभिवली, चावणे आणि कराडे खुर्द या ठिकाणी भेट देत उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, किरण माळी, रवींद्र चिपळे, विजय मुरकुटे, प्रभाकर माळी, राजेश सोनावळे, बंडू मोडक, …
Read More »पनवेल भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे अभिनंदन
पनवेल : रायगड जिल्हा नियोजन मंडळावर विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल पनवेल भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी विश्वजित पाटील, विश्वनाथ कोळी, आकाश पाटील आदी उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper