Breaking News

Ramprahar Reporters

राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांचा संयुक्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षिणक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 19वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात …

Read More »

पेण फेस्टिवलचे शानदार उद्घाटन

स्थानिक कलावंत देशपातळीवर चमकावेत -आमदार प्रशांत ठाकूर पेण : प्रतिनिधी पेण फेस्टिवल गेली 12 वर्षे गाजत असून, लोकप्रिय होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे. हा जिल्ह्याचा उत्सव ठरून येथील स्थानिक कलावंत देशपातळीवर चमकावेत, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते पेण फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात …

Read More »

फडणवीस यांच्या नेतृत्वातच महायुतीचे सरकार बनेल

नितीन गडकरी यांचा विश्वास नागपूर : प्रतिनिधी राज्यात सुरू झालेला राजकीय पेच लवकरच सुटणार असून, तशी चर्चा शिवसेनेशी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यातील सरकार बनेल, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. महायुतीला जनादेश मिळाल्यामुळे भाजप-शिवसेना लवकरच सरकार …

Read More »

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भुयारी मार्ग आणि रस्त्याची पाहणी

नवीन पनवेल, तळोजात दौरा; नागरिकांना सेवा देण्याचे निर्देश पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधून पोदीमार्गे पनवेलकडे जाण्यासाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामाची सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको व रेल्वे अधिकार्‍यांसह गुरुवारी (दि. 7) संयुक्त पाहणी केली. या वेळी त्यांनी हा मार्ग लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. नवीन …

Read More »

तिहेरी हत्याकांडाने माणगाव हादरले; दोन मुलांसह पत्नीची हत्या

माणगाव : प्रतिनिधी घरगुती भांडणावरून एका क्रूर माणसाने आपल्या दोन लहान मुलांसह पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 7) माणगाव तालुक्यातील दहिवली गावात घडली. या तिहेरी हत्याकांडामुळे माणगाव तालुका हादरला आहे. हत्याकांडाचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही. गोरेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष देवजी शिंदे …

Read More »

लिव्हरपूलचा विजय; बार्सिलोनाची बरोबरी

लिव्हरपूल : वृत्तसंस्था जॉर्गिन्होने पेनल्टीवर नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर चेल्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आयक्सला 4-4 अशा बरोबरीत रोखले, तर बलाढ्य बार्सिलोनाला स्लॅव्हिया प्रहाविरुद्धच्या लढतीत गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. गतविजेत्या लिव्हरपूलने गेन्क संघावर 2-1 असा विजय मिळवला. अ‍ॅनफिल्ड स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात जिऑर्जिनो विज्नाल्डमने 14व्या मिनिटाला गोल करीत लिव्हरपूलला …

Read More »

एकाच डावात घेतले 10 बळी

तेजपूर : वृत्तसंस्था मेघालयचा फिरकीपटू निर्देश बैसोयाने स्थानिक क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. 16 वर्षाखालील विजय मर्चंट चषक स्पर्धेत खेळत असताना नागालँड संघाविरोधात निर्देशने एकाच डावात 10 बळी घेतले आहे. 15 वर्षीय निर्देश हा मूळचा मेरठचा असून, काही वर्षांपूर्वी त्याने मेघालयकडून खेळण्यास सुरुवात केली आहे. निर्देशने नागालँडविरुद्ध सामन्यात पहिल्या …

Read More »

भारतीय महिलांची विंडीजवर मात

मालिकाही जिंकली अ‍ॅटिग्वा : वृत्तसंस्था मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय महिला संघाने अखेरच्या वन-डे सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघावर मात करीत मालिकेत बाजी मारली आहे. तिसर्‍या सामन्यात भारतीय महिलांनी मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर सहा गडी राखून विजय मिळवला. स्मृतीलाच सामनावीरचा पुरस्कार मिळाला. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी …

Read More »

अनधिकृत जाहिरातबाजीप्रकरणी ग्रेट भारत सर्कसवर गुन्हा दाखल

पनवेल : प्रतिनिधी मोठा खांदा येथील मैदानावर आलेल्या ग्रेट भारत सर्कसवर मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यान्वये कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृत जाहिरातबाजी केली म्हणून पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागातर्फे याबाबत तक्रार देण्यात आली होती. लोकसभा निवडणूक, पावसाळा व लगेच विधानसभा निवडणूक यामध्ये पनवेल महापालिकेचे बहुतांश कर्मचारी गुंतल्याचा काही लोकांनी …

Read More »

शासन शेतकर्यांच्या पाठीशी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मुंबई : प्रतिनिधी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सावरण्यासाठी व त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे सांगून पात्र शेतकर्‍यांना विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पंचनामे वेळेवर आणि अचूक होतील यासाठी क्षेत्रीय स्तरावर बैठका …

Read More »