मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे सकारात्मकतेने कार्य करून राज्याला विविध आघाड्यांवर देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी (दि. 2) अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना बोलत होते. सर्वसमावेशकता आणि सकारात्मकता, प्रामाणिकता, पारदर्शीपणा या माध्यमातून …
Read More »रत्नागिरीत धरण फुटले
13 जणांचा मृत्यू, 10 लोक बेपत्ता रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी (दि. 2) रात्री फुटले. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन 13 जणांचा मृत्यू झाला असून, 10 लोक बेपत्ता झाले आहेत. जिल्हा प्रशासनासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) बचाव व शोधकार्य करीत आहेत. …
Read More »उरण भाजपचे बूथ कार्यकर्ता संमेलन
उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन बुधवारी (दि. 3) येथील तेरापंत हॉलमध्ये मोठ्या उत्साहात झाले. या संमेलनात मतदार व पक्ष सदस्यांची नोंदणी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या कार्याचा …
Read More »रेवस येथील समुद्रात मालवाहू बार्ज बुडाले
अलिबाग : प्रतिनिधी रेवसनजीक कोळसा वाहून नेणारे मालवाहू बार्ज समुद्रातून बुडाल्याची घटना बुधवारी (दि. 3) सकाळी 9 वाजता घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बार्जमधील आठ जणांना सुखरूप धरमतर बंदरावर आणण्यात आले. यारा शिपिंग कॉर्पोरेशन कंपनीचे ‘पृथ्वीराज’ बार्ज कोळसा नेण्यासाठी मुंबईहून धरमतर येथे येत होते. रेवस बंदराजवळ आल्यानंतर या …
Read More »पिपाणीवाल्या आजी ठरल्या मॅन ऑफ दी वूमन!
लंडन : वृत्तसंस्था बांगलादेशवर विजय मिळवत भारताने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला, पण या सामन्यात सार्यांचे लक्ष वेधून घेतले ते एका आज्जीबाईंनी. त्यांनी सामन्यात फुल टू धमाल केल्याचे पाहायला मिळाले. या आज्जीबाईंचे सामन्यातील व्हिडीओ चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. दोन्ही गालांवर भारताचा झेंडा रंगवून पिपाणी वाजवणार्या या आज्जीबाईंचे नाव …
Read More »टीम इंडियाचा प्रतिस्पर्ध्यांना तडाखा
चार सामन्यांत चार संघांना घरचा रस्ता नवी दिल्ली : वृत्तसंस्था बांगलादेशवरील विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे, तर या पराभवामुळे बांगलादेश स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. अशाप्रकारे भारताविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्याने विश्वचषकातून बाहेर गेलेला बांगलादेश हा काही पहिला संघ नाही. मागील चार सामन्यांत भारताचा विजय आणि पराभव निर्णायक …
Read More »रोहितची कमाल, बुमराहची धमाल!
बांगलादेशला हरवून भारत उपांत्य फेरीत बर्मिंगहम : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत भारताने बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवून स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे तिकीट पक्क केले आहे. भारताने दिलेल्या 315 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 286 धावांत संपुष्टात आला. भारतीय संघाच्या विजयात सलामीवीर रोहित शर्मा आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी …
Read More »अंबाती रायुडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी (दि. 3) जाहीर केला. रायुडूच्या नावाची चर्चा सातत्याने विश्वचषक संघासाठी झाली, परंतु शिखर धवन व विजय शंकर यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतरही रायुडू वंचित राहिला. वर्ल्ड कप संघासाठी भारतीय संघाची घोषणा …
Read More »मृत्यूची भिंत;२६ जण ठार
मुंबई, पुणे, कल्याणमध्ये दुर्घटना मुंबई, पुणे, कल्याण : प्रतिनिधी पुण्यातील कोंढवा येथे संरक्षक भिंत कोसळून 15 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री जोरदार पावसात मुंबई, पुणे आणि कल्याणमध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. या तीन दुर्घटनांमध्ये मिळून 26 जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 80 लोक जखमी झाले आहेत. जखमींवर …
Read More »कासाडी नदीचे प्रदूषण चार महिन्यांत रोखणार
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची ग्वाही तळोजा एमआयडीसी प्रदूषणावर आमदार प्रशांत ठाकूर यांची लक्षवेधी पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक विभागात दूषित वायू व पाणी सोडणार्या कारखान्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर दूर व्हावा, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper