Breaking News

Ramprahar Reporters

आवरे मॅरेथॉनवर कल्पेश देवरे आणि संदीप पाल यांची मोहोर

प्रतिनिधी (आवरे ) एक धाव आरोग्यासाठी, पूर्वजांच्या स्मरणासाठी, उरण पूर्व विभागात राबवित असलेल्या निगा फाउंडेशन तर्फे सोमा रामा गावंड मॅरेथॉन ही रायगड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन संलग्नित मिनी मॅरेथॉन स्पर्धा आणि या स्पर्धेत 10 किमी या खुल्या गटात पुरुष व महिला गटात ऋतुजा सकपाल आणि संदीप पाल या स्पर्धकांनी वर्चस्व गाजविले. …

Read More »

‘युनायटेड रन’ म्हणत नवी मुंबई धावली

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका आणि स्टर्लिंग इन्स्टिट्युट, नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवी मुंबई युनायटेड रन’ या संकल्पना वाक्यावर आधारित नवी मुंबई महापौर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील 3500 हून अधिक नागरिकांनी सहभागी होत ही मॅरेथॉन सर्वार्थाने यशस्वी केली. देशभरात आयकॉनिक इमारत म्हणून नावाजल्या जाणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय …

Read More »

नेरळ ग्रामीण कबड्डी लीगवर नेरळ लायन्सचे वर्चस्व

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सदस्य केतन पोतदार यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आलेली पहिली नेरळ ग्रामीण कबड्डी लीग नेरळ लायन्स संघाने जिंकली. नेरळ आणि परिसरातील ग्रामीण कबड्डी संघातील नामांकित खेळाडू यांचे आठ व्यवसायिक संघ स्पर्धेत सहभागी झाले आहे. या वेळी बोलताना प्रो-कबड्डीपटू नीलेश साळुंखे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंनी …

Read More »

भारताला पाकबरोबर खेळावेच लागेल : आयसीसी

मुंबई : प्रतिनिधी यंदा इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार्‍या विश्वचषकातून पाकिस्तान संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या बीबीसीआयची मागणी आयसीसीने फेटाळून लावली आहे. आयसीसीच्या नियमावलीमध्ये अशा कारणासाठी एखाद्या संघाला बहिष्कृत करण्याचा कोणताही नियम नाही. त्यामुळे बीसीसीआयच्या या मागणीला आयसीसीच्या बैठकीत पाठिंबा मिळाला नाही. 14 फेब्रुवारीच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरही भारताने पाकिस्तानला घेरण्याची …

Read More »

माथेरान राणीचा विस्टाडोम प्रवासी डबा फुल्ल..!

कर्जत : प्रतिनिधी नेरळ-माथेरान-नेरळ या माथेरान राणीसाठी आणण्यात आलेला विस्टाडोम प्रवासी डबा आज प्रवाशांच्या दिमतीला लावण्यात आला. 640 रुपये एवढे तिकीट असतानादेखील प्रवाशांनी मोठा प्रतिसाद देत या डब्याचा पहिला प्रवास फुल्ल होता. दरम्यान, त्या विस्टाडोम डब्यामधून थेट आरपार निसर्ग आणि आकाश न्याहाळत पर्यटकांना गारेगार प्रवास करता आला. पर्वतीय प्रवासाचा आनंद …

Read More »

सत्ताधार्यांच्या विकासकामात खोडा घालण्याचा विरोधकांचा प्रयत्न

पनवेल : प्रतिनिधी महानगर पालिकेत सत्ताधारी पक्षाने विकास कामाचा धडाका सुरू केल्याने राजकारण करण्यासाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विकासकामात खोडा घालण्यास सुरुवात केली असल्याचे नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या वक्तव्यावरून दिसत असल्याचे भाजपचे प्रवक्ते प्रकाश बिनेदार यांनी सांगितले. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत वडाळे तलावाच्या सुशोभीकरणासाठी 12 कोटीची निविदा काढण्याच्या …

Read More »

पनवेल मनपाचा शिलकी अर्थसंकल्प स्थायीत सादर

पनवेल : प्रतिनधी पनवेल महापालिकेचा शिलकी अर्थसंकल्प शनिवारी (दि. 2) स्थायी समितीत सादर करण्यात आला. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देऊन त्यासाठी 336 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांचेकडे सुपूर्द केला. …

Read More »

पनवेल मनपा हद्दीत 96 कोटींची विकासकामे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विविध ठिकाणी भूमिपूजने पनवेल : प्रतिनिधी सबका साथ, सबका विकास म्हणजे शेवटच्या व्यक्तिपर्यंत विकास पोहोचला पाहिजे त्यासाठी विकासाची दोन्ही चाके म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्र काम केले, तर जनसामान्यांचा फायदाच होतो याचा प्रत्यय पनवेलच्या नागरिकांना पाहायला मिळत असल्याचे रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी …

Read More »

वर्ल्डकपआधी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वर्ल्ड कप 2019 ला 100 पेक्षाही कमी दिवस राहिले आहेत. अशा वेळी भारतीय क्रिकेट टीमची अधिकृत किट पार्टनर असलेल्या छळज्ञशने टीम इंडियाची नवी जर्सी लाँच केली आहे. वर्ल्ड कप 2019 मध्ये टीम इंडिया हीच जर्सी घालून मैदानात उतरेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या हैदराबाद वनडे सिरीज आधीच्या …

Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची ठिकाणे बदलणार नाहीत

हैदराबाद : वृत्तसंस्था भारत-ऑस्ट्रेलिया वन-डे क्रिकेट मालिकेतील मोहाली व नवी दिल्ली येथे होणार्‍या सामन्यांची ठिकाणे बदलण्याचे कोणतेही नियोजन नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असल्यामुळे 10 मार्च रोजी मोहाली आणि 13 मार्च रोजी नवी दिल्ली येथे होणारे सामने अन्यत्र हलवण्याची चर्चा …

Read More »