Breaking News

Yearly Archives: 2021

नवी मुंबईतील सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू होणार -आमदार मंदा म्हात्रे; नगरविकास खात्याने दर्शविला हिरवा कंदील

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील घरांचे थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात यावे, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. नगरविकास खात्यानेही या बाबत हिरवा कंदील दिला असून लवकरच सिटी सर्वेक्षणाची …

Read More »

सायन्स पार्कसाठी सिडको देणार नवी मुंबई महापालिकेला भूखंड

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाने नवी मुंबईतील नेरूळ येथील वंडर्स पार्क उद्यानाच्या भूखंडाची पोटविभागणी (सबडिव्हिजन) करून, विभाजित केलेला भूखंड हा नवी मुंबई महानगरपालिकेला सायन्स पार्क विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने सेक्टर-19ए, नेरूळ येथील भूखंड क्र. 50 हा नवी मुंबई महानगरपालिकेला चिल्ड्रन्स थिम पार्क विकसित करण्याकरिता भाडेकराराने …

Read More »

सिडकोविरोधातील आंदोलन म्हणजे नांदी -संतोष ठाकूर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आंदोलकांनी राज्य सरकारला एकजुटीची ताकद दाखवली, परंतु  राज्य सरकारने हे लक्षात घ्यावे की ही फक्त नांदी आहे, मात्र दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले नाही तर याचे रूपांतर निश्चितच वणव्यात होईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला …

Read More »

कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे करंजाडे वसाहतीत अँटीजेन चाचण्या

पनवेल : वार्ताहर करंजाडे वसाहतीत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने करंजाडे वसाहतीमध्ये कोरोना तपासणी सुरू करण्यासंदर्भात व वसाहतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता काय उपाययोजना करता येईल याबाबत भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदार विजय तळेकर, विभागीय अध्यक्ष समीर केणी, करंजाडे सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासमवेत सिडकोचे आरोग्य …

Read More »

‘दिबां’साठी एल्गार

लोकनेते दि. बा. पाटील यांच्यासाठी भूमिपुत्रांनी अखेर आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. ‘दिबां’च्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने गुरुवारी सिडको भवनाला घेराव घालण्यासाठी ठिकठिकाणाहून तब्बल एक लाखाहून अधिक भूमिपुत्र उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते. विमानतळाच्या नामकरणावरून विनाकारण नवा राजकीय वाद निर्माण करू पाहणार्‍या संधिसाधू राजकारण्यांना ही मोठीच चपराक म्हणावी लागेल. भूमिपुत्रांनी केलेल्या या आंदोलनामुळे राज्यकर्त्यांचे …

Read More »

पेण एसटी आगारातील कार्यशाळेची दुरवस्था; कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात

पेण : प्रतिनिधी दुर्गंधीयुक्त, अस्वच्छ परिसर आणि अपुर्‍या सोयी सुविधा यामुळे पेण एसटी आगारामधील कार्यशाळेतील  कामगारांचे आरोग्य धोक्यात आले असून, या परिस्थितीची माहिती असतानादेखील वरिष्ठ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचार्‍यांत नाराजी व्यक्त होत आहे. एसटीच्या पेण आगारातील कार्यशाळेच्या पत्र्याची शेड जुनी झाली असून, त्यातील काही पत्रे फुटले असल्याने पावसाचे …

Read More »

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी अनाथाश्रम शोधण्याची प्रशासनाची धावपळ; जिल्हाधिकार्‍यांकडून स्थळांची पाहणी

 कर्जत ़: बातमीदार कोरोनामुळे आई, वडिल गमालेल्या मुलांचा सांभाळ शासन करणार आहे. या अनाथ बालकांसाठी प्रशासनाने बालसुधारगृह आणि अनाथाश्रम यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कर्जत आणि नेरळ येथील स्थळांची पाहणी केली. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. यात अनेक लहानग्यांनी आपले आई-वडिल …

Read More »

किल्ले रायगडावर तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक साजरा

महाड : प्रतिनिधी दाट धुके आणि अधूनमधून पडणारा पाऊस अशा वातावरणात किल्ले रायगडावर बुधवारी (दि. 23) तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेकाचा तिथीनुसार येणारा वर्धापनदिन शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, कोकण कडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा …

Read More »

ऑनलाइन शिक्षण सुरू, पण स्मार्टफोन आणि इंटरनेटचे विघ्न

पाली : प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र स्मार्टफोनचा अभाव आणि इंटरनेटचा व्यत्यय यामुळे ऑनलाइन शिक्षण ग्रामीण, दुर्गम, आदिवासी वाडी व वस्तीवरील मुलांपर्यंत पोहचणे दुरापास्त झाले आहे. परिणामी कोणी स्मार्टफोन देते का स्मार्टफोन असे बोलण्याची वेळ पालक व शिक्षकांवर आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी व पालकांकडे  …

Read More »

आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे धरणे आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या रायगड शाखेतर्फे बुधवारी (दि. 23) अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या रायगड शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण निरगुडा, भारत मुक्ती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष विजय आवास्कर, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष समीर घासे, बुद्धिस्ट …

Read More »