Breaking News

मुंबई – नवी मुंबई

वीज कनेक्शन तोडणीला स्थगिती

भाजपच्या दणक्याने लाखो नागरिकांना दिलासा मुंबई : प्रतिनिधीकोरोना काळात पाठविण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांचा मुद्दा विरोधी पक्ष भाजपने मंगळवारी (दि. 2) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदारपणे उपस्थित केला. वीज बिले थकल्यामुळे राज्य सरकार शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित करतेय. सरकारच्या जुलमी निर्णयाविरोधात भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत सुरुवातीला विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून निषेध नोंदविला. …

Read More »

उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान

माय मराठी फाऊंडेशनचा पुढाकार नवी मुंबई ः वार्ताहर नवी मुंबई शहरातील विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा माय मराठी फाऊंडेशनकडून घरोघरी जाऊन सन्मान करण्यात आला.कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने नियोजित कार्यक्रम रद्द करून घरीच उत्कृष्ट कार्य करणार्‍यांचे कौतुक केल्याचे माय फाऊंडेशनचे अध्यक्ष मंगेश मिस्किन यांनी सांगितले. शिक्षण, पोलीस, …

Read More »

पक्षी, प्राण्यांना पाणी पिण्याची व्यवस्था

सर्पमित्रांचा स्तुत्य उपक्रम नवी मुंबई : प्रतिनिधी उन्हाळ्याचे चटके सुरू झाल्यानंतर सर्वच सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. मानव कोणत्याही प्रकारचे कष्ट करून पाण्याची भूक भागवतो, परंतु पक्षी व प्राण्यांना अपेक्षित असे उन्हाळ्यात पाणी मिळतेच असे नाही. म्हणून येथील सर्पमित्र व सामाजिक वृत्तीच्या नागरिकांनी एकत्र येऊन गवळी देव परिसरात 20 मातीची …

Read More »

‘धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा’

मुंबई : प्रतिनिधी ज्या प्रकारे फक्त सरकार टिकवण्यासाठी किंवा आघाडी टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठिशी घातले जातेय, ते चुकीचे असून मी त्याचा निषेध करते, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर आणि अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे, तसेच संजय राठोड यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडेंनीदेखील राजीनामा द्यायला …

Read More »

युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का

पबमधील व्हिडीओ शेअर करीत मनसेचा सवाल मुंबई : प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा निर्बंध लादण्याची वेळ आली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन सरकार, प्रशासनाकडून करण्यात येत आहे, मात्र अनेक ठिकाणी नियमांना हरताळ फासला जात असल्याचे समोर आले …

Read More »

भाजपचा सभात्याग; राज्य सरकारचा निषेध

वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्यांवरून अधिवेशनात पहिल्याच दिवशी घमासान मुंबई : प्रतिनिधीविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार (दि. 1)पासून सुरू झाले. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यांवरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मंडळावरील नियुक्त्यांसंदर्भात आक्रमक चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारचा निषेध करीत सभात्याग केला.विधानसभेतील विरोधी …

Read More »

योगिता राठोड ठरली मिस नवी मुंबई 2021

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मिस नवी मुंबईच्या 10व्या पर्वाचा अंतिम सोहळा शनिवारी (दि. 27) वाशी येथील फोर पॉईंट हॉटेल मध्ये कोविड विषयक खबरदारी घेत मोठ्या थाटात झाला. या वेळी सोळा सौंदर्यवतीनी आपल्या दिलखेच अदानी परीक्षक व प्रेक्षकांना मोहून टाकले. वेगवेगळ्या तीन फेर्‍या स्पर्धेची उत्कंटा वाढवत होती शेवटी मिस नवी …

Read More »

कोरोना काळात डोळ्यांच्या समस्यांत वाढ

उपचारांना विलंब; आजार बळावले नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये उपचारांमध्ये झालेला विलंब आणि जीवनशैलीत झालेले बदल यामुळे डोळ्यांच्या समस्यांचे गांभीर्य आणि आजार बळावले आहेत. विशेषतः ज्येष्ठांच्या बाबतीत हा परिणाम अधिक आहे. कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये न गेल्यामुळे गेल्या काही महिन्यात मोतीबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये पाच पट वाढ झाली आहे, असे …

Read More »

भाजपच्या वाढत्या दबावानंतर अखेर वनमत्री राठोड यांचा राजीनामा

मुंबई ः प्रतिनिधीपूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दबाव वाढल्यानंतर अखेर रविवारी (दि. 28) मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन वनमंत्री राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक …

Read More »

मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई ः भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. राज्यातील सत्ताधारी नेत्यांमध्येही इच्छाशक्ती दिसून येत नाही, असा घणाघात उदयनराजे भोसले यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारची भूमिका मांडली. राज्यातील आधीच्या फडणवीस …

Read More »