Breaking News

मुंबई – नवी मुंबई

अहंकार्‍यांना महाराष्ट्र झुकवणारच!

देवेंद्र फडणवीस यांचा मविआ सरकारला इशारा मुंबई : प्रतिनिधी मविआचे नेते अलीकडे कोणतीही कारवाई झाली तरी महाराष्ट्र झुकणार नाही, असा डायलॉग मारतात, पण मविआचे नेते म्हणजे महाराष्ट्र नव्हे. राज्यातील 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. तुमच्यासारख्या अहंकार्‍यांना हा महाराष्ट्र झुकवून दाखवेल, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला …

Read More »

ग्रामस्थांची सरसकट सर्वच घरे नियमित करा

आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली 250 मी. पर्यंतची घरे नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला व याबाबत शासन निर्णय आणला, परंतु नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे ‘आहे त्या स्थितीत’ सरसकट नियमित करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे …

Read More »

‘अभाविप’चा राज्य सरकारविरोधात घंटानाद

विद्यापीठ कायद्यातील बदल मागे घेण्याची जोरदार मागणी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने लोकशाही पायदळी तुडवून गोंधळाच्या वातावरणात शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारे बदल करून विद्यापीठ कायदा असंवैधानिक पद्धतीने पारित केला आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने सोमवारी (दि.28) मुंबई विद्यापीठात घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्य मंत्रिमडळाच्या …

Read More »

अखेर मिवआ सरकार झुकले

खासदार संभाजीराजे यांचे उपोषण मागे मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या दबावापुढे अखेर महाविकास आघाडी सरकार झुकले आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. 28) तीन दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले. राज्य सरकार आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्या …

Read More »

भाजपच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरे नियमित

नवी मुंबई ः भाजपच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय राज्याच्या नगरविकास विभागाने घेतला असून तसा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला आहे. सानपाडा येथे रविवारी  (दि. 27) पत्रकार परिषदेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची माहिती दिली. 1970च्या दशकात मुंबईला लागून नवी मुंबई उभारण्यासाठी …

Read More »

आजपासून भिवंडीत घुमणार कबड्डीचा दम; 69व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार

भिवंडी ः प्रतिनिधी ठाणे विरुद्ध परभणी, रत्नागिरी विरुद्ध पालघर या पुरुष, तर ठाणे विरुद्ध सिंधुदुर्ग, पुणे विरुद्ध सांगली या महिला गटातील लढतींनी 69व्या वरिष्ठ गट पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे बिगूल वाजणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली हिंदवी युवा प्रतिष्ठान व …

Read More »

बेलापूर गाव स्मार्ट व्हिलेजसाठी आमदार मंदा म्हात्रेंची ग्रामस्थांसह बैठक

नवी मुंबई : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री यांच्या गाव दत्तक योजनेच्या माध्यमातून नवी मुंबईतील सर्वच गावे स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. दिवाळे गावासोबतच आता बेलापूर गावही स्मार्ट होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांची बेलापूर गावातील राम मंदिर …

Read More »

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचे आमरण उपोषण

मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी शनिवार (दि. 26)पासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी उपोषणासंदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार …

Read More »

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडेंकडून अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान

महिला मोर्चाकडून पोलिसांत तक्रार नवी मुंबई : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल वाशी येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय जनता पक्ष संतप्त झाला आहे. या प्रकरणी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष दुर्गा डोख …

Read More »

महाविकास आघाडी सरकार हाय हाय!

मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी खारघर भाजपची निदर्शने खारघर ः रामप्रहर वृत्त राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक करून त्यांची कोठडीत रवानगी केली आहे. त्यांनी डी गँगसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. त्यामुळे खारघरमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जनसंपर्क …

Read More »