Breaking News

महत्वाच्या बातम्या

जळगावमध्ये भीषण टेम्पो अपघातरीं 15 मजुरांवर काळाचा घाला

जळगाव : प्रतिनिधीजळगाव जिल्ह्यात यावल-चोपडा रस्त्यावर किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात एक टेम्पो उलटून 15 मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. 15) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, पपई भरलेला आयशर टेम्पो रावेरकडे निघाला होता. मध्यरात्री 1च्या सुमारास रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात …

Read More »

पनवेल, उरणमध्ये बाप्पाचा जयजयकार; कोरोनाच्या नियमांचे पालन करीत माघी गणेशोत्सव उत्साहात

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्रीगणेश जयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. पनवेल, उरणमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येवून गणेशजयंती साजरी करतात, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत हा उत्सव साजरा करण्यात आला. आधी …

Read More »

सावधान! राज्यात कोरोना पुन्हा वाढतोय

औरंगाबाद : प्रतिनिधीराज्यात दररोज 500 ते 600ने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, अशी कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. काही ठराविक ठिकाणी खासकरून विदर्भ, मुंबईत रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नियम पाळावे लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे, तर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत राज्याचे …

Read More »

झुंजार त्रिशतकी विजयासह जोकोव्हिच उपांत्यपूर्व फेरीत

सिडनी : वृत्तसंस्थाजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पोटाच्या दुखापतीसह खेळताना ग्रँडस्लॅम कारकीर्दीतील 300वा विजय साकारला आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अलेक्झांडर झ्वेरेव्ह, सेरेना विल्यम्स यांनीही आगेकूच केली, मात्र डॉमिनिक थीमला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.जोकोव्हिचने स्वित्झर्लंडच्या 14व्या मानांकित मिलोस राओनिकला 7-6 …

Read More »

डॉक्टर्स असोसिएशनच्या क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण

खारघर : प्रतिनिधीपनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात झाले. स्पर्धेस दुसर्‍या दिवशी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, नगरसेवक तेजस कांडपिळे आदींनी भेट देत शुभेच्छा दिल्या.क्रिकेट स्पर्धेत पेण संघाने विजेतेपद पटकाविले, तर कर्जत संघ उपविजेता ठरला. उत्कृष्ट खेळाडू …

Read More »

दुसर्‍या कसोटीवर भारताची पकड

अश्विनचे दमदार शतक; इंग्लंड 3 बाद 53 चेन्नई : वृत्तसंस्था482 धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना दुसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवसअखेर इंग्लंडने 3 बाद 53 धावांपर्यंत मजल मारली. रविचंद्रन अश्विनच्या दमदार शतकानंतर भारताचा दुसरा डाव 286 धावांवर संपुष्टात आला. आता सामन्यातील दोन दिवसाचा खेळ शिल्लक असून, इंग्लंडला विजयासाठी 429 धावांची गरज आहे, …

Read More »

रायगडात माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा

पालीत फुलला भक्तिमळा पाली : प्रतिनिधी माघी गणेशोत्सवानिमित्त सुधागड तालुक्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी (दि. 15) रायगड जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उपनगर व अन्य शहरातून भाविक आले होते. त्यामुळे बल्लाळेश्वर मंदिर परिसर भाविकांनी फुलून निघाला होता. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. ठिकठिकाणाहून आलेल्या पालख्यादेखील …

Read More »

शिवकालीन पेठ किल्ला प्रवेशासाठी 50 रुपये शुल्क

कर घेऊ नये-स्थानिकांची मागणी; रोजगार बुडत असल्याने ग्रामस्थ संतप्त कर्जत : बातमीदार तालुक्यातील कोथळीगड म्हणजे पेठ किल्ल्यावर प्रवेशासाठी वन विभागाने 50 रुपयांचे शुल्क लावले आहे. त्यामुळे पर्यटक आणि गडप्रेमी यांचे गडावर फिरकणे बंद झाले असून, स्थानिक पेठ ग्रामस्थांचा रोजगार बुडाला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी शुल्क घेण्यास विरोध केला असून, प्रवेश शुल्क …

Read More »

कोर्टाची पायरी…

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषवलेली व्यक्ती न्यायपालिकेबद्दल नकारात्मक मत व्यक्त करत असेल तर ते निश्चितच गांभीर्याने घ्यायला हवे. परंतु न्या. गोगोई यांच्या त्या वक्तव्यामागे नेमके काय कारण असावे? न्यायपालिकेप्रती त्यांना अविश्वास व्यक्त करावयाचा आहे की आणखी काही कारण असावे, असे प्रश्न साहजिकच कोणाच्याही मनात उपस्थित होतात. सुमारे 137 कोटी लोकसंख्या …

Read More »

अश्विनची कमाल, इंग्लंड बेहाल!; दुसर्या दिवसाखेर भारताकडे 249 धावांची आघाडी

चेन्नई : वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवसाखेर भारताने दुसर्‍या डावात एका गड्याच्या मोबदल्यात 54 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारताने 329 धावा केल्यानंतर इंग्लंडचा डाव अवघ्या 134 धावांमध्ये आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेत पहिल्या डावाअखेर भारताला 195 धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसर्‍या डावात भारताचा सलामीवीर शुबमन …

Read More »