Breaking News

महत्वाच्या बातम्या

शाळेच्या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालावी

भाजप अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष विकास सोरटे यांची मागणी नवी मुंबई ः बातमीदार वाशी विभागातील सेक्टर 9 व 10 येथे होऊ घातलेल्या इमारत पुनर्विकास प्रकल्पांतर्गत होणार्‍या कामामुळे विभागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हे काम सुरू असलेल्या विभागात नवी मुंबईतील शाळा, कॉलेज व हॉस्पिटलही आहे, मात्र ऐन शाळेच्या वेळी या …

Read More »

गणपती बाप्पांचा नैवेद्यही महागणार!

भाज्यांचे दर चढेच; सामान्यांच्या खिशाला कात्री नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त श्रावण महिना सुरू होण्याआधीपासूनच वाढलेले भाज्यांचे दर उतरण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यात आता गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी भाज्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे भाज्यांचे दर आणखी चढे राहणार असल्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. घाऊक बाजारातच भाज्या महागल्याने …

Read More »

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरुप होणार -ना. रवींद्र चव्हाण

अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. २६) दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे …

Read More »

 भाजप तर्फे  मुरूडमध्ये गणपती सजावट स्पर्धा

मुरूड : प्रतिनिधी  भाजपच्या मुरुड तालुका युवती मोर्चा तर्फे गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत गणरायाच्या सभोवताली केलेल्या सर्वोत्तम सजावटीस बक्षीस देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना भाजप  जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. मुरूड शहरातील नागरिकांसाठी ही स्पर्धा असून …

Read More »

नेरळ ग्रामपंचायत मधील अतिरिक्त कामगार कपात करण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीमध्ये शंभरहुन अधिक कामगार काम करीत आहेत. शासनाच्या आकृतिबंधानुसार ग्रामपंचायतीमध्ये अतिरिक्त कामगार भरण्यात आले आहेत. या अतिरिक्त कामगारांना कमी करण्यात यावे, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार्‍यांनी  नेरळ ग्रामपंचायतीला दिले आहेत. मुंबईचे उपनगर म्हणून नेरळ विकसित होत आहे. शहरीकरणाकडे झुकलेल्या या गावातील नागरी समस्या सोडविण्याचा …

Read More »

नवघर-मानकिवली रस्ता गेला खड्ड्यात

ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यामधील माणकिवली गावातील रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, पावसामुळे रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे. हा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. माणकिवली ते नवघर, चिंचवली रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला गेला आहे. या रस्त्याची …

Read More »

अखेर नामांतर!

औरंगाबाद किंवा उस्मानाबादच्या नामांतराला कोणाचाच विरोध असण्याचे कारणच नव्हते. भारतीय जनता पक्ष तर त्याबाबत आग्रहीच होता. परंतु असे निर्णय न्यायालयात टिकण्याची खबरदारी घेणेही महत्त्वाचे असते. त्या हेतूनेच शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर आघाडी सरकारच्या संबंधित निर्णयांना अवैध ठरवले होते. आता पहिल्याच अधिवेशनात औरंगाबाद, उस्मानाबाद यांच्या नामांतरासोबतच नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि. …

Read More »

नुतन बांधकामाचा शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम

जेएसडब्लू फांउडेशनचे रेवदंडा को.ए.सो.माध्यमिक शाळेस योगदान रेवदंडा : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रेवदंडा येथील  माध्यमिक शाळेत जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या माध्यमातून  मुलींसाठी शौचालय उभारण्यात आले आहे. त्याचे नुकताच लोकार्पण करण्यात आले. या वेळी शाळेच्या प्रांगणात मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या वतीने रेवदंडा माध्यमिक शाळेत मुलींसाठी नविन शौचालय बांधण्यात आले आहे, …

Read More »

कर्जतच्या डॉ. नितीन आरेकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. नितीन आरेकर (कर्जत) यांच्या ’शब्दांकित’ आणि ’माझं क्षितिज’ या पुस्तकांचे मुंबईत प्रकाशन झाले. या वेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली रवींद्र नाट्य मंदिरमध्ये झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात संतोष जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. …

Read More »

जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गाव, वाड्या वस्त्यांवर मुबलक पाणी देण्याचे मोदींचे स्वप्न साकारणार

वावे गावात जनसंघ व विचार परिवार समन्वय सदस्यांशी साधला संवाद पाली : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होणार्‍या व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रत्येक योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी तळागाळातील लाभार्थी घटकापर्यंत जाऊन काम करा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी बुधवारी (दि. 24)कार्यकर्त्यांना केले. रायगड लोकसभा प्रवास योजना …

Read More »