प्राचीन काळात व्यापारी बंदर म्हणून प्रसिध्दीस असलेल्या चौलमध्ये पोर्तुगिजांनी सन 1505 मध्ये व्यापाराच्या निमित्ताने प्रवेश केला. चौल व रेवदंडासह कोर्लई या भागावर पोर्तुगिजांचे वर्चस्व होते. कोर्लई किल्ला निजामाच्या ताब्यातून हिसकावून घेत सन 1594 मध्ये कोर्लई किल्ला काबीज केला. कुंडलिका समुद्र खाडीत प्रवेश करणार्या जहाजावर लक्ष्य ठेवणे कोर्लईच्या टेकडी किल्लावरून सोपे …
Read More »झिराड येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दिवलांग, पनवेल, नांदईचा पाडा संघ विजेते
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील झिराड येथील साई क्रीडा मंडळ, महिला मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष खुल्या गटात श्री गणेश दिवलांग, तर महिलांमध्ये पनवेल संघाने विजेतेपद मिळवले. पंचक्रोशी गटात नांदई देवी नांदईचा पाडा हा संघ विजेता ठरला. खुल्या गटात अमिर धुमाळ, महिलांमध्ये रचना म्हात्रे, पंचक्रोशी गटात तुषार पाटील …
Read More »सुरेश लाडांना महामंडळ दिल्यास शिवसेनेचा विरोध; आमदार महेंद्र थोरवे यांचा इशारा
खोपोली ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सुरेश लाड यांना राज्य शासनाने महामंडळ दिल्यास कर्जत-खालापूर तालुक्यातील शिवसेनेचा त्यास विरोध असेल, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी एका स्थानिक वाहिनीशी बोलताना भूमिका स्पष्ट केलीय. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात राष्ट्रवादी व शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. …
Read More »नेरळ मानिवली येथे घरफोडी
सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख चोरले कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील मानिवली येथे घरफोडी होवून सोन्याच्या दागिन्यांसह एकूण चार लाखाची चोरी झाली आहे. दरम्यान चोरट्यांचा तपास पोलीस करत आहेत. अधिक वृत्त असे, महेंद्र तुकाराम गवळी हे आपल्या सासरवाडीला नेवाळी येथे (दि. 28)श्री सत्यनारायण पूजेसाठी गेले होते. या वेळी बंद घराच्या पडवीमधून …
Read More »रस्त्यासाठी आदिवासींचे उपोषण
अलिबाग-सागरमाची वाडीत जाण्यासाठी रस्ताच नाही अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग सागरगड माची येथील आदिवासीवाडीला जाणार्या रस्त्यासाठी निधी मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. बळवंत वालेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लाक्षणिक उपोषणात आदिवासी बांधव आणि ग्रामस्थ यात मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. अलिबाग तालुक्यातील सागरगड माची आदिवासी वाडीला …
Read More »निर्सगातूनच भूस्खलनाच्या धोक्याची पूर्वसूचना मिळते
डॉ. हिमांशू कुलकर्णी यांचे पाणी परिषद चर्चेदरम्यान प्रतिपादन पोलादपूर : प्रतिनिधी कुपनलिकेचा हॅण्डपंप, जमिनीतील जलस्त्रोत, पावसाचा जोर आणि पाळीव प्राण्यांचे वर्तन अशा काही बाबींमधून भूस्खलनाच्या धोक्याची नैसर्गिक पूर्वसूचना मिळू शकते. संभाव्य दरडप्रवण क्षेत्र ओळखून त्याठिकाणी पूर्व चेतावणी प्रणाली विकसित करावी लागेल, असे मत डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी व्यक्त केले. माणगाव …
Read More »सुधागड तालुक्यातील अवैद्य धंदे बंद
पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांची यांची माहिती पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली पोलीस स्थानकात नुकतीच पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांची बैठक संपन्न झाली. यावेळी विविध विषय व समस्यांवर चर्चा करण्यात आली. सुधागड तालुक्यातील मटका व्यवसाय व अवैद्य धंदे सर्वप्रथम बंद केले आहेत. तसेच गावठी दारू निर्मिती व विक्रीवर …
Read More »चौलच्या ताडगोळ्यांना पर्यटकांची पसंती
रसरशीत, आरोग्यदायी फळविक्रीतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध रेवदंडा : प्रतिनिधी चौलमधील ताडगोळे पर्यटकांची खास पसंती असून याची मोठी मागणी ऐन उन्हाळ्यात असते. चौल परिसरात ताडगोळ्यांची असंख्य झाडे असून ताडगोळे विक्रीतून मोठे उत्पन्न स्थानिक साधतात. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात ताडगोळे यांना थंडावा म्हणून पसंती असते.त्यामुळेच मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरातून तसेच परिसरातून आलेले …
Read More »कविवर्य नारायण सुर्वेंच्या नावाने दिलेला पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा
अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचे उद्गार कर्जत : बातमीदार समाजातील सर्वांच्या काळजाला भिडणार्या कविता देणारे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाने दिला गेलेला पुरस्कार हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाएवढेच आपल्यासाठी महत्त्वाच्या दर्जाचे असल्याचे उदगीर येथील 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.भारत सासणे यांनी सांगितले. पद्मश्री नारायण सुर्वे …
Read More »वर्षानुवर्षे येणार्या महापुरामुळे महाडकरांचा शासनाविरोधात आक्रोश
महाड : प्रतिनिधी महाडमध्ये 22 जुलै 2021 रोजी झालेल्या महापुरानंतर उपाययोजना करण्यात दिरंगाई होत असल्याने महाड पूरनियंत्रण समितीने शनिवारी (दि. 30) सरकारविरोधात आपला आक्रोश व्यक्त करीत मुंबई -गोवा महामार्ग रोखला. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 22 जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुराने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यातून सावरताना आठ …
Read More »