Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कडावमध्ये कोंबडीचोरांचा सुळसुळाट; शेतकरी हैराण; पोलिसांत तक्रार दाखल

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील कडाव येथील शेतकर्‍यांच्या खुराड्यात असलेल्या गावठी कोंबड्या गायब होत आहेत. याबाबत त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कोंबडीचोरांना पकडण्याची मागणी केली आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात, पण अशाच प्रकारे शेतीला पूरक जोडधंदा करणारे कडाव येथील शेतकरी व …

Read More »

पेण अर्बन बँकेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; ठेवीदारांनी वाचला समस्या, तक्रारींचा पाढा

अलिबाग ः प्रतिनिधी 598 कोटींच्या थकीत कर्जांची वसुली करा, जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत द्या, दर महिन्याला झालेल्या कार्यवाहीसाठी नियमित आढावा बैठका घ्या यांसारख्या मागण्या पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या वतीने मंगळवारी (दि. 8) जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या. या वेळी ठेवीदारांनी आपल्या समस्या आणि तक्रारींचा पाढाच जिल्हा प्रशासनासमोर …

Read More »

…अन्यथा आरपारची लढाई

विजयी मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांचा निर्धार नागोठणे ः प्रतिनिधी आंदोलनाची आम्हाला अजिबात हौस नाही, मात्र जनतेच्या हक्कांसाठी आमची लोकशासन संघटना बाहेर पडली तर हक्क मिळवून दिल्याशिवाय थांबत नाही. जगात जनशक्तीला कोणीही हरवू शकले नसून रिलायन्सने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, तर पुढची लढाई आरपारची असेल, असा इशारा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे प्रदेश …

Read More »

तरुणांकडून भोराई मंदिराची साफसफाई

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ऐतिहासिक व अभेद्य असा सुधागड किल्ला कायम स्वच्छ राहावा यासाठी दुर्गप्रेमी नेहमीच प्रयत्नशील असतात. अतिवृष्टीमुळे सुधागड किल्ल्यावरील प्राचीन भोराई मातेच्या मंदिरात चिखल झाला होता. त्यामुळे सुधागड तालुक्यातील काही तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रविवारी (दि. 6) एकत्र येत भोराई मंदिराची स्वच्छता करून गाभार्‍यातील चिखलदेखील साफ केला. सुधागड किल्ल्याचे …

Read More »

चक्रीवादळात 32 टक्के बागायत क्षेत्र बाधित

नारळ, सुपारीसह आंब्याच्या बागा भुईसपाट मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील 2503 हेक्टर बागायत क्षेत्रापैकी 794 हेक्टर म्हणजेच जवळजवळ 32 टक्के बागायत क्षेत्र जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळात भुईसपाट झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. नारळ, सुपारीसारखे हुकमी पीक डोळ्यांंदेखत अस्मानी संकटाने हिरावले असून उर्वरित नारळाच्या झाडांचे उत्पन्न मिळण्यासाठी अद्याप सहा माहिने वाट …

Read More »

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन

अलिबाग ः प्रतिनिधी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि. 8) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अंतर्गत रायगड जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. राज्यभर जिल्हा परिषद शिक्षकांनी हे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडून मागण्या मान्य करण्यासाठी …

Read More »

कर्जतमध्ये महिलांना धान्यवाटप

कर्जत : बातमीदार – कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे आदिवासी, कामगार, घरकाम करणार्‍या महिला तसेच विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिलांचा रोजगार हिरावला असल्याने त्यांना कुटुंब चालवणे कठीण होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर दिशा केंद्र संचलित व केंद्रीय समाज कल्याण बोर्ड दिल्ली यांच्या माध्यमातून चालवण्यात येणार्‍या ’सोबतीण’ कुटुंब सल्ला सहाय्य केंद्राच्या वतीने मदतीचा हात …

Read More »

चक्रीवादळात नुकसान झालेल्या साई विद्यालयास आर्थिक मदत

माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिरचे 3 जूनच्या निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शाळेला पूर्वपदावर आणण्यासाठी समाजसेवक कृष्णाजी महाडिक यांनी मुंबईतील सुमन रमेश तुलसी चरिटेबल ट्रस्टकडून एक लाख 65 हजार रुपये मिळवून दिले. या निधीतून विद्यालयाची दुरुस्ती करण्यात …

Read More »

माथेरानमध्ये महावितरणवर धडक

कर्जत : बातमीदार – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून माथेरानमध्ये महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. मीटर बंद असूनही रिडींग दाखवून बिल देणे, बिल भरलेले असूनही मागील महिन्यांची शिल्लक बिलात अधिक येणे, तक्रारींचे निवारण न होणे, वीज बिल भरणा कर्मचारी उपस्थित नसणे यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण …

Read More »

सुसह्य उन्हाळ्यासाठी आतापासूनच जलनियोजन आवश्यक

पोलादपूर : प्रतिनिधी – पावसाचे हस्त नक्षत्र शिल्लक असताना पोलादपूर तालुक्याने यंदा सरासरीच्या 98.54 टक्के सरासरी गाठली. दरवर्षी समाधानकारक पाऊस पडत असताना उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. ती दूर करण्यासाठी आतापासूनच व्यापक प्रयत्न सुरू करण्याची गरज आहे. पोलादपूर तालुक्याचे सर्वसाधारण पर्जन्यमान 3680 मिलीमीटर असून, दरवर्षीच्या सरासरीच्या 98.54 टक्के सरासरी गाठली आहे. यंदा …

Read More »