Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

‘सवतकड्या’वर पर्यटकांचा ओघ; ई-पास रद्द केल्यामुळे नागरिकांची भटकंती

मुरूड ः प्रतिनिधी     मुरूड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील सुप्रसिद्ध असलेला सवतकडा येथील धबधबा पर्यटकांचे व स्थानिकांचे खास आकर्षण ठरत आहे. उंच धबधबा व त्यातून उडणारे तुषार पर्यटकांना आकर्षित करतात. राज्य शासनाने ई-पास रद्द केल्यामुळे मुरूडमध्ये आता पर्यटक तुरळक प्रमाणात दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने ठाणे व पनवेल येथील …

Read More »

‘कोमसाप’च्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार

माणगाव ः प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद माणगाव शाखेच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20करिता तालुक्यातील गुणवंत शिक्षक म्हणून मुकेश रमेश भोस्तेकर आणि संगीता व्यंकट सुरशेट्टे यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी शाखेच्या वतीने जिल्हा समन्वयक अ. वि. जंगम यांच्या सूचनेनुसार गुणवंत …

Read More »

शिवरायांसह हुतात्म्यांची अवहेलना; कर्जत पं.स.कार्यालयात पुतळे फाटक्या छपराखाली व अंधारात

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्याची अस्मिता समजले जाणारे हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील तसेच देशाची अस्मिता समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यांची कर्जत पंचायत समिती कार्यालयात परवड सुरू आहे. पंचायत समितीच्या दुमजली कार्यालयात प्रवेश केल्यावर एका बंद खोलीत हे पुतळे असून, त्या खोलीचे छप्पर फाटून काळपट पडले आहे. …

Read More »

कडावमध्ये कोंबडीचोरांचा सुळसुळाट; शेतकरी हैराण; पोलिसांत तक्रार दाखल

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील कडाव येथील शेतकर्‍यांच्या खुराड्यात असलेल्या गावठी कोंबड्या गायब होत आहेत. याबाबत त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन कोंबडीचोरांना पकडण्याची मागणी केली आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात, पण अशाच प्रकारे शेतीला पूरक जोडधंदा करणारे कडाव येथील शेतकरी व …

Read More »

पेण अर्बन बँकेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; ठेवीदारांनी वाचला समस्या, तक्रारींचा पाढा

अलिबाग ः प्रतिनिधी 598 कोटींच्या थकीत कर्जांची वसुली करा, जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत द्या, दर महिन्याला झालेल्या कार्यवाहीसाठी नियमित आढावा बैठका घ्या यांसारख्या मागण्या पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या वतीने मंगळवारी (दि. 8) जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या. या वेळी ठेवीदारांनी आपल्या समस्या आणि तक्रारींचा पाढाच जिल्हा प्रशासनासमोर …

Read More »

…अन्यथा आरपारची लढाई

विजयी मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांचा निर्धार नागोठणे ः प्रतिनिधी आंदोलनाची आम्हाला अजिबात हौस नाही, मात्र जनतेच्या हक्कांसाठी आमची लोकशासन संघटना बाहेर पडली तर हक्क मिळवून दिल्याशिवाय थांबत नाही. जगात जनशक्तीला कोणीही हरवू शकले नसून रिलायन्सने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत, तर पुढची लढाई आरपारची असेल, असा इशारा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे प्रदेश …

Read More »

तरुणांकडून भोराई मंदिराची साफसफाई

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ऐतिहासिक व अभेद्य असा सुधागड किल्ला कायम स्वच्छ राहावा यासाठी दुर्गप्रेमी नेहमीच प्रयत्नशील असतात. अतिवृष्टीमुळे सुधागड किल्ल्यावरील प्राचीन भोराई मातेच्या मंदिरात चिखल झाला होता. त्यामुळे सुधागड तालुक्यातील काही तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रविवारी (दि. 6) एकत्र येत भोराई मंदिराची स्वच्छता करून गाभार्‍यातील चिखलदेखील साफ केला. सुधागड किल्ल्याचे …

Read More »

चक्रीवादळात 32 टक्के बागायत क्षेत्र बाधित

नारळ, सुपारीसह आंब्याच्या बागा भुईसपाट मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील 2503 हेक्टर बागायत क्षेत्रापैकी 794 हेक्टर म्हणजेच जवळजवळ 32 टक्के बागायत क्षेत्र जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळात भुईसपाट झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. नारळ, सुपारीसारखे हुकमी पीक डोळ्यांंदेखत अस्मानी संकटाने हिरावले असून उर्वरित नारळाच्या झाडांचे उत्पन्न मिळण्यासाठी अद्याप सहा माहिने वाट …

Read More »

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन

अलिबाग ः प्रतिनिधी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि. 8) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अंतर्गत रायगड जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले. राज्यभर जिल्हा परिषद शिक्षकांनी हे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडून मागण्या मान्य करण्यासाठी …

Read More »

कर्जतमध्ये महिलांना धान्यवाटप

कर्जत : बातमीदार – कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे आदिवासी, कामगार, घरकाम करणार्‍या महिला तसेच विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिलांचा रोजगार हिरावला असल्याने त्यांना कुटुंब चालवणे कठीण होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर दिशा केंद्र संचलित व केंद्रीय समाज कल्याण बोर्ड दिल्ली यांच्या माध्यमातून चालवण्यात येणार्‍या ’सोबतीण’ कुटुंब सल्ला सहाय्य केंद्राच्या वतीने मदतीचा हात …

Read More »