Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

माथेरानच्या डोंगरातील वाड्या रस्ते आणि विजेच्या प्रतीक्षेत

वन जमिनीतून जागा देण्याची मागणी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात असलेल्या 12 आदिवासी वाड्या या रस्ता आणि काही वाड्या विजेपासून वंचित आहेत. येथील आजारी रुग्णाला आजही डोली करून आणावे लागत आहे. दरम्यान, आदिवासी संघटना या प्रश्नी आक्रमक झाल्या असून, त्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. कर्जत हा आदिवासीबहुल …

Read More »

रायगडात एनडीआरएफची टीम कायम तैनात असावी; जिल्हा प्रशासनाचा राज्य शासनाला प्रस्ताव

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात निर्माण होणारी आपत्तीजनक स्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात एनडीआरएफची टीम कायम तैनात असावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनासमोर ठेवला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. रायगडसह कोकणाला अनेकदा आपत्तीजनक स्थितीला सामोरे जावे लागते. 2005मधील अतिवृष्टीने दरडी कोसळून झालेली जीवितहानी व 2016मध्ये सावित्री पूल दुर्घटनेत …

Read More »

गणेशोत्सवातून कोरोनासंदर्भात प्रबोधन; नागोठण्यातील श्री सन्मित्र मित्र मंडळाची जनजागृती

नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागोठणे येथील श्री सन्मित्र मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात कोविड-19 प्रतिबंधक फलक लावून जनजागृती केली आहे. या मंडळाचे यंदाचे 47वे वर्ष असून, तीन वर्षांनंतर सुवर्ण महोत्सव आगळावेगळा व्हावा या दृष्टीने मंडळाचे सर्वच सदस्य आतापासूनच कामाला लागले आहेत. नागोठणे येथील श्री सन्मित्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाची …

Read More »

पुढच्या वर्षी लवकर या…! गौरी-गणपतीला भाविकांकडून भावपूर्ण निरोप

अलिबाग : प्रतिनिधी पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर लाडका बाप्पा तसेच गौरीमातेला भाविकांकडून गुरुवारी (दि. 27) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम व अटींचे पालन करून पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत विसर्जन करण्यात आले.ज्याच्या आगमनाची भाविक आतुरतेने वाट पाहत होते त्या सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचे शनिवारी घरोघरी …

Read More »

खोपोलीतील जुन्या इमारतींच्या बांधकामाचे ऑडिट होण्याची गरज

खोपोली : प्रतिनिधी सोमवारी महाड येथील पाच मजली रहिवासी इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. याची दखल घेत खोपोली शहरातील पंधरा  वर्षा वरील जुन्या रहिवासी इमारतीचे बांधकाम मजबुती ऑडिट होण्याची गरज सामाजिक संस्थांकडून व्यक्त केली जात आहे. खोपोली शहरातही माती भराव टाकून टोलेजंग रहिवासी संकुले उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. अनेक …

Read More »

रायगड जिल्ह्यात घरोघरी गौरीपूजन

सुवासिनींनी घेतला ओवसा कर्जत ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात गौरी-गणपती सणाला फार महत्त्व आहे. या सणाला कुठेही असलेला माणूस आपल्या घरी येतो. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. यंदा कोरोनाच्या सावटाखाली हा …

Read More »

महाड इमारत दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू

तब्बल 40 तासांनी बचावकार्य झाले पूर्ण महाड ः प्रतिनिधीसोमवारी महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली आणि संपूर्ण शहर हादरून गेले. अनेक जण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात होती. प्रशासनाकडून तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली व तब्बल 40 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नऊ जणांचा जीव वाचविण्यात यश …

Read More »

रायगड जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 213 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि 213 नव्या रुग्णांची नोंद मंगळवारी (दि. 25) झाली. दुसरीकडे 411 जण दिवसभरात बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, पेण तीन, उरण व श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि खालापूर व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल …

Read More »

सुधागडमध्ये खैराची अवैध वाहतूक

सहा जण अटकेत; वनविभागाची कारवाई पाली : प्रतिनिधीखैर वृक्षांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी सहा जणांना सुधागड वनविभागाच्या टीमने अटक केली असून, या गुन्ह्यातील दोन वाहने आणि लाकडे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पाली-खोपोली मार्गावर सुधागड तालुक्यातील वनक्षेत्र कानसळ गावानजीक सोमवारी (दि. 24) पहाटेच्या सुमारास पीकअप (एमएच 06-बीजी 2884) वाहनातून खैराच्या झाडाचे तुकडे …

Read More »

भीमाशंकर अभयारण्य परिसर इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर

कर्जत : बातमीदारकेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने भीमाशंकर अभयारण्याचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर केला आहे. या संदर्भात 2019मध्ये जाहीर केलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.भीमाशंकर अभयारण्य हे रायगड, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात 130 चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. या अभयारण्याबरोबरच आजूबाजूला असलेला 10 किलोमीटर हद्दीचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन बनविण्यात यावा, अशी …

Read More »