पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30वर कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30वर पोहचली असून दोन नवीन रुग्णांची त्यात भर पडली आहे. कर्जत शहर आणि ग्रामीण भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला असून ते दोन्ही रुग्ण तरुण असून आपल्या घरातून अंबरनाथ, बदलापूर असे रोज ये-जा करीत आहेत. कर्जत शहरातील मुद्रे …
Read More »निसर्ग चक्रीवादळाने मुरूडमध्ये घरांचे नुकसान
मुरूड : निसर्ग चक्रीवादळाने घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार कोलमडले आहेत. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न नुकसानग्रस्तांना पडला आहे. (छाया : सुधीर नाझरे)
Read More »रेवदंडा परिसरात घरांसह बागा, आमराईचे नुकसान
Nisarga Cyclone रेवदंडा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रेवदंडा, चौल, नागाव परिसरात घरांसह नारळ व सुपारीच्या बागा, तसेच आमराईचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून राज्य शासनाने वादळग्रस्तांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या चक्रीवादळाच्या पूर्वसूचनेनुसार संचारबंदी घोषित करण्यात आली होता. समुद्र …
Read More »मुरूड वीज मंडळाला नुकसानीचा ‘शॉक’
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यात झालेल्या वादळामुळे वीज मंडळाचे सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. 250हुन जास्त विद्युत खांब, तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरसुद्धा निकामी झाले असल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान 15 दिवसांचा अवधी लागेल, असे मुरूड वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी म्हटले आहे. वादळ झाल्यापासून मुरूड …
Read More »पावसाळ्यात थंडी वाजून ताप आल्यास सावधान!
आरोग्य प्रहर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सर्वाधिक उद्भवत असलेल्या आजारांमध्ये कावीळ हा आजारसुद्धा आहे. काविळीमुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते तसेच त्वचेचा रंग पिवळा पडतो. रक्तातील हिमोग्लोबीन कमी झाल्यामुळे अशी समस्या उद्भवते. शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर बिलीरुबिन नावाचा पिवळ्या रंगाचा पदार्थ बाहेर येतो. हा पदार्थ लिव्हरमधून फिल्टर होऊन बाहेर येत असतो. याचे …
Read More »चक्रीवादळामुळे रायगड जिल्हा उद्ध्वस्त
वीज नाही, पाणी नाही, संपर्कही नाही! रोहेवासीयांची बिकट अवस्था रोहे : प्रतिनिधी रोहा शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातल्यानंतर अतोनात नुकसान झाले आहे. चक्रीवादळ थांबले, परंतु त्याचे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. अनेक ठिकाणी विद्युत तारा, खांब पडल्याने वीजपुरवठा बंद आहे. नळपाणी पुरवठा बंद पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे …
Read More »वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे त्यात अधिकच भर पडली आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्यांना नुकसानभरपाई देताना नैसर्गिक आपत्तीचे पारंपरिक नियम न लावता राज्य शासनाने विशेष पॅकेज द्यावे, …
Read More »कर्जतमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा कहर
तालुक्यातील 3000 घरांचे नुकसान कर्जत : बातमीदार – निसर्ग चक्रीवादळाने कर्जत तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागालाही फटका बसला आहे. या चक्री वादळासह मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली असून अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले होते. तालुक्यात साधारण 3000 घरांचे नुकसान झाले असून अगणित झाडे उन्मळून पडली आहेत. तालुक्यातील मुख्य वीज वाहिन्या नेणारे …
Read More »निसर्ग चक्रीवादळाचा रायगडला तडाखा
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असतानाच बुधवारी (दि. 3) जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. सोसाट्याच्या वार्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरांची छपरे उडाली. त्यामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झाडे रस्त्यावर पडल्याने काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात आली …
Read More »निसर्ग चक्रीवादळ आज रायगड जिल्ह्यात धडकणार
किनारपट्टीवर विशेष दक्षता अलिबाग : प्रतिनिधीअरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ बुधवारी (दि. 3) रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात धडकणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले असून, …
Read More »