कामकाज थंडावले; जनता मात्र हैराण पेण : प्रतिनिधी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्तपदांमुळे सर्वसामान्य जनतेची या कार्यालयाशी निगडीत असलेली बरीच कामे खोळंबली आहेत. अनेक फेर्या मारूनसुद्धा काम होत नसल्याने नागरिकांमध्ये या कार्यालयाच्या कामकाजाबद्दल प्रचंड असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. या कार्यालयातील रिक्तपदे वेळीच भरली नाही, आणि थंडावलेले कामकाज असेच राहिले …
Read More »दोन महिन्यांसाठी खोल समुद्रात मासेमारी बंदी
अलिबाग ः प्रतिनिधी येत्या 1 जून ते 31 जुलै या कालावधीत यंत्रिकी नौकांद्वारे खोल समुद्रात मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातली आहे. पावसाळ्यात खोल समुद्रात मुसळधार लाटा आणि वारा सुरू असतो, तसेच याच काळात सुरुवातीच्या महिन्यात समुद्री मासे प्रजनन करतात. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांसाठी सागरी किनार्यापासून 12 सागरी मैलापर्यंत खोल …
Read More »टंचाईचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज
अलिबाग ः प्रतिनिधी दुष्काळाचा सामना करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील गाव तलावांतील गाळ काढणे, विंधन विहिरींची कामेही त्वरित हाती घेऊन पूर्णत्वास न्यावीत, तसेच जलयुक्त शिवाराची कामे मेअखेर पूर्ण करावीत, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »कोकणात जाणार्या एसटी बसेस फुल्ल
पाली/बेणसे ः प्रतिनिधी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने चाकरमानी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्याचबरोबर पर्यटकही जिल्ह्यातील तसेच तळकोकणातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी कोकणाकडे मोठ्या प्रमाणात रवाना होत आहेत. परिणामी कोकणाकडे जाणार्या एसटी बसेस फुल्ल झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. खासगी वाहनांची संख्या वाढल्याने मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे गाड्यांना …
Read More »पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष स्वच्छता मोहीम
अलिबाग : प्रतिनिधी स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यातर्फे रविवारी (दि. 12) संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 14) आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेचे महत्त्व पटावे व आपले आरोग्य …
Read More »डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीसदस्यांचे श्रमदान ; श्रीवर्धनमधील शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ
श्रीवर्धन : प्रतिनिधी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी श्रीवर्धन शहरातील सार्वजनिक रस्ते आणि शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यांत आली. प्रतिष्ठानतर्फे मागील महिन्यात श्रीवर्धन तालुक्यातील स्मशानभ्ाूमी, कब्रस्तान व दफनभ्ाुमी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. रविवारी …
Read More »डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीसदस्यांचे श्रमदान ; स्वच्छता अभियानात सुधागडात 2336 श्रीसदस्यांचा सहभाग
पाली : रामप्रहर वृत्त स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणाच्या वतीने रविवारी सुधागड तालुक्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सकाळी 7 वाजल्यापासून श्रीसदस्यांनी झाडू, घमेल, कोयते, फावडे, पंजा आदी साहित्य घेऊन पाली शहर स्वच्छ केले. त्यामध्ये तहसील कार्याकाय, पोलीस ठाणे, दिवाणी न्यायालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, श्री बल्लाळेश्वर …
Read More »मुरूड येथे पिकअप टेम्पो पलटी; 21 जण जखमी
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील केळकर येथे किक्रेट मॅच खेळून महालोर गावातील मुले शनिवारी (दि. 11) रात्री 8 वाजता पिकअप टेम्पो (एमएच 06, बीजी 2145)तून घरी परत येत होती. काही अंतर गेल्यानंतर एका चढावावरील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी होऊन 21 जण जखमी झाले. त्यातील सहा जण गंभीर जखमी आहे. …
Read More »माणगावजवळ वॅगनरची टेम्पोला धडक
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेमपाले गावच्या हद्दीत रविवारी (दि. 12) सकाळी वॅगनर कारने टेम्पोला समोरासमोर ठोकर दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत. चालक अखिलेश मंगेश बोंबाडे (वय 22, रा. रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील टाटा एस कंपनीचा टेम्पो (एमएच 08, एपी 1748) या गाडीत …
Read More »वाहनाच्या धडकेत पादचारी ठार
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर डोलवी गावाजवळ शुक्रवारी (दि. 11) पहाटे 2.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसून पादचारी जखमी होऊन मृत पावल्याची घटना घडली आहे. सुरेंद्र नगिना चौरसिया (रा. डोलवी) असे या मृत पादचार्याचे नाव असून तो मुंबई-गोवा महामार्गावरुन पायी चालत जात होता. या अपघाताची खबर न देताच ट्रक …
Read More »