Ramprahar News Team

महाडमध्ये शांतता समितीची बैठक

महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून येथील तहसील कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनाची तयारी आणि लोकांनी मांडलेल्या सूचना यावर चर्चा करण्यात आली. महाडमध्ये 19 आणि 20 मार्च रोजी चवदारतळे सत्याग्रह स्मृतिदिन गेली अनेक वर्ष साजरा होत आहे. याकरिता संपूर्ण राज्यभरातून भीमसैनिक मोठ्या संख्येने …

Read More »

रायगड जिल्ह्यातील मजूर संस्थां अडचणीत

अलिबाग : प्रतिनिधी तीन महिन्याचा कालावधी लोटूनही कोणत्याही मजूर कामगार सहकारी संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक निकष पूर्ण केल्याचे अहवाल सादर केले नाहीत. तसेच  सहाय्यक निबंधक यांच्या नोटीशींना उत्तरही दिले नाही. त्यामुळे या मजूर संस्थांना कामकाज सुरू ठेवण्यास स्वारस्य राहिलेले नाही, असा अहवाल सरकारकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे रायगड …

Read More »

नेरळ रेल्वे स्थानकातून निर्माण नगरी जाणारा रस्ता बंद होणार? मध्य रेल्वे प्रशासनाच्या सूचना

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाच्या कर्जत बाजूकडून बाहेर पडण्यासाठी दोन फुटाचा रस्ता खुला ठेवण्यात आला होता. मध्य रेल्वे कोणत्याही खासगी संस्थेला असा रस्ता देत नसताना देखील निर्माण ग्रुप ऑफ कंपनीचा बोर्ड नेरळ स्थानकात झळकत आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या असून प्रवाशांनी पादचारी पुलाचा …

Read More »

कर्जत तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदाची निवडणूक चुरशीची होणार

कर्जत : बातमीदार शिरसे आणि पाथरज या कर्जत तालुक्यातील दोन ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका 24 मार्च रोजी होत आहेत. पाथरजमध्ये 10 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर   गेल्यावेळी बिनविरोध झालेल्या शिरसे ग्रामपंचायतीमध्ये 15 वर्षानंतर प्रथमच सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने तेथील  निवडणुकीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी थेट सरपंच …

Read More »

सीमावर्ती भागात महाराष्ट्र अन् कर्नाटक पोलिसांचे संयुक्त चेकपोस्ट ः सुहास वारके

 सोलापूर ः प्रतिनिधी  सध्या राज्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्थेसाठी प्रशासनाने महामार्ग, सीमावर्ती भागावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस प्रशासनाची एक बैठकही झाली आहे. सीमावर्ती भागातून होणारी गुन्हेगारी कारवाई रोखण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पोलिसांचे संयुक्त चेकपोस्ट उभारण्यात येत असल्याची माहिती …

Read More »

कोस्टगार्ड अधिकार्‍याच्या पत्नीची फसवणूक

 मुंबई ः प्रतिनिधी  सायबर ठकाने मिझोरमला गाडी पोहचविण्याच्या नावाखाली कोस्टगार्ड अधिकार्‍याच्या पत्नीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवई येथे राहणार्‍या तक्रारदार यांचे पती हे कोस्टगार्डमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पतीचा मित्र मिझोरम येथे राहतो. …

Read More »

दहशतवाद-संवाद एकत्र राहू शकत नाहीत : सुषमा स्वराज

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था  पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याच्या भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही, असे पाकिस्तानला त्यांनी खडसावले आहे.  जोपर्यंत पाकिस्तान आपल्या जमिनीवर आश्रय …

Read More »

न्यूझीलंडमध्ये मशिदींत अंदाधुंद गोळीबार ; 49 जणांचा मृत्यू; 20 गंभीर जखमी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 49 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. ख्राईस्टचर्च येथे हा गोळीबार करण्यात झाला. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला होता. यासोबतच हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केले …

Read More »

यंदाच्या निवडणुकीत महिलाशक्ती निर्णायक

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात चार टप्प्यांत होणार्‍या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार 1 हजार पुरुषांमागे 925 महिला असे प्रमाण होते. …

Read More »

पासपोर्ट कार्यालय सुुरू झाल्याने नागरिकांना दिलासा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील पोस्ट कार्यालयाच्या इमारतीमध्ये पासपोर्ट विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी नवी मुंबईकरांची होणारी पायपीट यापुढे थांबणार आहे. गेली अनेक वर्षांपासून नवी मुंबईकरांना या कार्यालयाची प्रतीक्षा होती. शहरातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक प्रक्रियेकरिता ठाणे येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागत होते. यामध्ये त्यांचा …

Read More »