Breaking News

Ramprahar News Team

राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे शेतकर्यांचे नुकसान; रावसाहेब दानवे यांनी केली टीका

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारकडून मका आणि ज्वारीच्या आणखी खरेदीच्या परवानगीसाठी राज्य सरकार आवश्यक ती माहिती केंद्र सरकारला पुरवत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मका, ज्वारीच्या खरेदीबाबत हलगर्जीपणा दाखवणार्‍या महाआघाडी सरकारचा दुटप्पी चेहराच यातून उघड झाला आहे, अशी …

Read More »

फाफडा पॉलिटिक्स

येत्या 10 जानेवारीस शिवसेनेतर्फे गुजराती बांधवांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला खुद्द शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. या निमित्ताने मुंबईत होर्डिंगबाजी सुरू झाली असून, जलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा अशी घोषणा देण्यात येत आहे. हे सारे पाहून मुंबईतील मराठी माणूस सोडाच गुजराती बांधवांसदेखील हसू …

Read More »

‘त्या’ बलात्कार्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; बौद्धजन पंचायत समितीचे उरण पोलिसांना निवेदन

उरण : वार्ताहर पेण हद्दीतील आदिवासी समाजाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्त्या करण्यात आली. अशा नराधमास फाशीची शिक्षा द्यावी, असे निवेदन बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 843 यांनी बुधवारी (दि.6) उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांना दिले. निवेदनात असे नमूद केले आहे की, पेण हददीतील आदिवासी समाजाच्या …

Read More »

शिक्षकांचा सत्कार; क्रांतिज्योती महिला विकास फाऊंडेशनचा उपक्रम

पनवेल : वार्ताहर क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन म्हणून पनवेलमधील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व महिला वर्गाची फाऊंडेशनच्या सदस्यांनी महिलांना हळदी-कुंकू लावून ओटी भरली व कार्यक्रमाला प्रारंभ झाला. उपस्थित सर्व मान्यवरांनी …

Read More »

पत्रकार दिनानिमित्त पनवेलमध्ये विविध उपक्रम; आदिवासींना अन्नधान्य वाटप

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी (दि. 6) पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील दुर्गम भागातील फणसवाडी (खैरवाडी) येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटपाचा मदत कार्यक्रम करण्यात आला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या या ठिकाणी असणार्‍या आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून पनवेलमधील पत्रकारांकडून एक अनोखा संदेश …

Read More »

नामांतराचे नाटक

औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी सर्वप्रथम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1988मध्ये केली. तेव्हापासून हा वाद चालू आहे. गेल्या तीन दशकांमध्ये शिवसेना दोन वेळेला सत्तेवर होती. आजही औरंगाबाद महापालिकेत हा पक्ष सत्तेवर आहेच. तरीही सरकार दफ्तरी औरंगाबादचे संभाजीनगर काही होऊ शकलेले नाही. यंदा तेथील महापालिका निवडणूक उंबरठ्यावर आलेली असताना हा मुद्दा पुन्हा …

Read More »

जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सात वर्षांनंतर सुरू

अलिबाग : प्रतिनिधी येथील जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट मागील सात वर्ष बंद होती. त्यामुळे या रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असे. सामाजिक संस्थांनी ही लिफ्ट सुरु करावी, यासाठी रुग्णालय प्रशासनाला विनंती केली होती, अखेर ही लिफ्ट सुरु झाली असल्याने रुग्णांबरोबरच रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य …

Read More »

रायगड जिल्ह्यातील आगरदांडा, जीवना बंदरांना मिळणार नवसंजीवनी

अलिबाग : प्रतिनिधी केंद्राच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत कोकण किनारपट्टीवरील नऊ मासेमारी बंदरे विकसीत केली जाणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील आगरदंडा आणि जीवना या दोन बंदरांचा समावेश आहे. या बंदरांमध्ये मासे उतरवण्याच्या सुविधांसह पर्यटकांना उपयुक्त अशा सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे बंदरांना नवसंजीवनी मिळणार आहे. आतापर्यंत विकासापासून दूर राहिलेल्या या बंदर …

Read More »

रस्ता बनवा आणि फोडा हाच सिडकोचा धंदा

घरातील लहान मुलं एखादे खेळणे जोडल्यावर  टाळ्या वाजवते आणि मग लगेच ते तोडून टाकते, त्यावेळी त्यांचे सगळे कौतुक करतात. अशीच कौतुकाची थाप पाठीवर पडण्यासाठी ‘बालबुध्दी‘ असलेले सिडकोचे अधिकारी सध्या नवीन पनवेलमधील रस्ते बनवणे आणि ते लगेच फोडण्याचा खेळ करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रस्ता बनवा आणि फोडा हाच सिडकोचा …

Read More »

मृत्यूचा घाट सुरक्षिततेच्या मार्गावर; बोरघाटातील अपघात 50 टक्क्यांनी कमी, बळींची संख्याही घटली

खालापूर : अरुण नलावडे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात प्रमाण कमी व्हावे, याकरता महामार्ग पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या विशिष्ट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याने 2020या वर्षामध्ये या महामार्गावरील  अपघातांचे प्रमाण 50 टक्क्याने घटले आहे. राज्यातील महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्य वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार …

Read More »