काही भीषण अपघातांमुळे लोकांच्या मनात समृद्धी महामार्गाविषयी गैरसमज निर्माण झाले असून विरोधकांनी केलेली बेजबाबदार विधाने त्यात भरच घालू शकतात. प्रत्यक्षात या महामार्गावरून प्रवास करण्याचा अनुभव घेतलेले लोक मात्र समृद्धी महामार्गावरील प्रवास सुखकर असल्याचेच सांगतात. महामार्गाच्या बांधणीत कुठलाही दोष नसून महामार्ग गुणवत्तापूर्ण असल्याची ग्वाही तज्ज्ञ जाणकारांनीही यापूर्वीच दिली आहे. आपल्या वाहनाचा …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या वेळेत वाढ
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे दोन हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि दोन हजार 950 सदस्यपदांच्या, तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 …
Read More »शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उलवे नोडमध्ये देवीचे पूजन उलवे नोड ः रामप्रहर वृत्त भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवार (दि. 15)पासून सुरुवात झाली आहे. उलवे नोड खारकोपर येथे जय बजरंग कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळांच्या वतीनेही नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणच्या देवीचे पूजन माजी खासदार लोकनेते …
Read More »पनवेलमधील दुंदरे, रिटघर, शिवणसईतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामध्ये ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली आहे. दुंदरे ग्रामपंचायत हद्दीतील दुंदरेसह रिटघर, शिवणसई येथील शेकाप कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. भाजप पनवेल तालुका व शहर …
Read More »दुर्दैवाचा घाला
नांदेड येथील सरकारी रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी निश्चितच धक्कादायक आहे. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी ठाण्यानजीकच्या छत्रपती शिवाजी सरकारी इस्पितळामध्ये एका रात्रीत 18 रुग्ण दगावले होते. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेवर पडणारे हे दुर्दैवाचे घाले तातडीने थांबायला हवेत यात शंकाच नाही. इस्पितळामधील हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याची चौकशी …
Read More »पनवेलमध्ये स्वच्छता मोहीम; आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग
पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वच्छतेला प्राधान्य देणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पनवेल परिसरातही रविवारी (दि. 1) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः हाती झाडू घेऊन पनवेल शहरातील कृष्णाळे तलाव येथे या मोहिमेत सहभाग घेतला. महापालिका तसेच भाजपच्या वतीने एक तारीख एक तास …
Read More »डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान : अलिबागमध्ये 2162 श्री सदस्यांचा सहभाग
अलिबाग ः प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सेवा पंधरवाडानिमित्ताने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 1) अलिबाग तालुक्यातील विविध गावांत 56 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले. श्री सदस्यांनी गावात जाणारे रस्ते, शाळा, मंदिर, स्मशानभूमी, बाजारपेठ, समुद्रकिनारा रस्ते चकाचक केले. या अभियानात 2162 श्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब …
Read More »स्वच्छतेसाठी पनवेलचे उपजिल्हा रुग्णालय आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दत्तक
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात स्वच्छता राखण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. यांच्या वतीने हे रुग्णालय दत्तक घेतल्याचे महापाालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता …
Read More »लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक
पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्य सरकारने केलेला ठराव वर्ष उलटून गेले तरी केंद्र सरकारकडे पाठविला गेला नाही. तो केंद्राकडे पाठवून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी यावर विचारविनिमय करण्यासाठी आगरी व तत्सम समाजातील सर्व आजी माजी आमदारांची बैठक येत्या काही …
Read More »पुनरागमनायच…
यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशीच मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलादचा सण आला आहे. मुस्लिम बांधवांच्याही मिरवणुका या दिवशी निघतात. गर्दीचे नियंत्रण थोडेतरी सुलभ व्हावे यादृष्टीने ईदची सुटी 29 तारखेला द्यावी अशी विनंती पोलीस दलानेच केल्यामुळे राज्य सरकारने अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशीही शासकीय सुटी जाहीर केली आहे. समाजामध्ये बंधुभाव आणि एकोपा वाढावा यासाठीच हे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper