पनवेल ः रामप्रहर वृत्त कामगारांच्या हितासाठी सदैव कार्यरत असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी उरण येथील कामगार नेते सुरेश पाटील यांची निवड झाली आहे. भारतीय पोर्ट अॅण्ड डॉक मजदूर महासंघाची दोन दिवसीय बैठक नुकतीच कोचीन (केरळ) येथे पार पडली. या बैठकीत सुरेश पाटील यांच्या नावाची घोषणा सर्वानुमते करण्यात आली. या …
Read More »चिपळे, शांतिवन पुलांना धोका?
पनवेल ः बातमीदार गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाढी नदीला आलेल्या महापुरामुळे येथील चिपळे व शांतिवन पुलाला धोका निर्माण झाला आहे. चिपळे पुलाचे स्टील खाली लोंबकळले आहे, तर शांतिवन येथील पुलावरून पाणी गेल्यामुळे काही ठिकाणी डांबर वाहून गेले. काही ठिकाणी पुलावर पाण्याचे बुडबुडे निघू …
Read More »खारघर ः कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने खारघर येथील भाजप कार्यालयाशेजारील मोंट ब्लँक येथे दोन दिवसांच्या खारघर फेस्ट महोत्सवाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. या वेळी मीनलताई मोहाडीकर व संस्थेच्या पदाधिकारी, सदस्या उपस्थित होत्या. (छायाः लक्ष्मण ठाकूर)
Read More »द्वेष पसरवणार्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत पंतप्रधान मोदींची ’मन की बात’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी उत्सुक आहेत. बंदूक-बॉम्बपेक्षा विकासाची ताकद अधिक आहे. जे लोक द्वेष पसरवत आहेत, त्यांचा हेतू कधीच साध्य होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ’मन की बात’मध्ये म्हणाले. या वेळी मोदींनी पाणी संकट, चांद्रयान-2चे प्रक्षेपण, जल धोरणांसह विविध योजनांचा उल्लेख या कार्यक्रमात …
Read More »कर्नाटकात भाजपाला ‘अच्छे दिन’ काँग्रेस अन् जेडीएसचे 14 आमदार अपात्र
बंगळुरू ः वृत्तसंस्था कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याने आता वेगळेच वळण घेतले आहे. कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर रविवारी (दि. 28) विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या 14 बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी तीन आमदारांना अपात्र घोषित केले होते. …
Read More »‘50 आमदार संपर्कात’
मुंबई ः प्रतिनिधी शरद पवारांनी भाजपवर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, की आपले नेते पक्ष का सोडून जात आहेत. आम्ही कुणालाही धमकावलेले नाही किंवा कोणावरही दबाव आणलेला नाही, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. विरोधी पक्षातील म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीतील जवळपास 50 आमदार, नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही गिरीश महाजन यांनी केला आहे. चित्रा …
Read More »‘चांगल्या लोकांनाच पक्षात प्रवेश’
नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केलेल्या जोरदार टीकेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ’दबाव टाकून लोकांना पक्षात घेण्याची भारतीय जनता पक्षाला गरज नसून, शरद पवार यांच्या पक्षात लोक का राहायला तयार नाहीत, यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आत्मचिंतन करावे’, …
Read More »उलवे ः येथील डीव्हीसी स्पोर्ट्स या दुकानाच्या उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 28) झाले. या वेळी भाजपचे अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्रप्रदेश सचिव तथा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष अकबर सय्यद, दुकानाचे मालक दीपक चौधरी, मनिष नारखडे, अकबर लांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (संबंधित वृत्त पान …
Read More »परशुराम घाटातील दरड हटवली ; महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू कोकण रेल्वेही रुळावर
रत्नागिरी ः प्रतिनिधी परशुराम घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. 16 तासांपासून येथे वाहने अडकली होती. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. तब्बल 16 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील एकेरी वाहतूक रविवारी (दि. 28) सुरु झाली. मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडला झोडपून काढले होते. चिपळूण येथे परशुराम घाटातही दरड कोसळल्याने मुंबई-गोवा …
Read More »अतिवृष्टीचे सहा बळी ; रायगडात पावसाचा जोर ओसरला
अलिबाग ः प्रतिनिधी दोन दिवस रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यात सहा जणांचा बळी गेला. सहाही जणांचे मृतदेह सापडले आहेत. जून महिन्यापासून नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा शोध सुरू आहे. रविवारी (दि. 28) पावासाचा जोरही कमी झाला. पूरही ओसरला. त्यामुळे रायगडकरांना काहीसा दिलासा मिळाला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper